ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 12 hours ago
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर भावसार क्षत्रिय समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम
अमळनेरमध्ये समाजकार्य पंधरवड्यात संविधान जागर
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी वेगाने; आढावा बैठकीत रणनीतीवर सविस्तर चर्चा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांची अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट
अमळनेर : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष एड. श्री अविनाश भालेराव यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सर्व विभागांच्या जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दि. २३/८/२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट देत पक्ष संघटना व अनुसूचित जाती विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
या वेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक कामाची माहिती दिली. तालुक्यातील एकूण बुथ संख्या, प्रत्येक बुथवर नियुक्त करण्यात आलेले बी. एल. ए., तसेच त्यांच्या वयोमानासंदर्भातील माहिती त्यांनी यावेळी सादर केली. पक्षाची बूथपातळीवरील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ठाकरे सर, एड. प्रशांत संदानशिव यांनी सहभाग घेतला. विशेषतः अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाची संघटना अधिक प्रभावीपणे उभी करण्याबाबत एड. श्री अंकुश कटारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.
अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर
अनुसूचित जाती विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष श्री भगवान संधान शिव यांनी अमळनेर तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीच्या कामकाजासंदर्भात आवश्यक माहिती दिली. यावेळी श्री सईद तेली, दिनेश पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत अनुसूचित जाती विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या विभागाची तळागाळापर्यंत मजबूत संघटना उभारणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अनुसूचित जाती समाजातील नागरिकांशी सातत्याने संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांना व अडचणींना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीला अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस श्री राहुल मोरे, अनिरुद्ध साळवे, राजेंद्र भोसले, अनंत बागुल यांनीदेखील सहभाग नोंदविला. तसेच तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू भाट, तुषार संधान शिव, प्रवीण पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बूथपातळीपासून संघटना बळकट करण्याचा निर्धार
आगामी काळात अमळनेर तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथपातळीपासून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विशेषतः अनुसूचित जाती विभागाला अधिक सक्रिय करून समाजातील विविध घटकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा आणि पक्षाचे संघटनात्मक कार्य पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आढावा बैठकीमुळे अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या आगामी संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
डी. एल. सोशल फाउंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळणार बळ
अमळनेर : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उदात्त उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून आतापर्यंत विविध शाळांमधील तब्बल १,००० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत पोहोचविण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य यासह विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्य वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण करणे, हा ‘ज्ञानदीप अभियानाचा’ व्यापक हेतू आहे.
आता ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी
‘ज्ञानदीप अभियानाला’ अधिक व्यापक आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या दिशेने डी. एल. सोशल फाउंडेशनने अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’
‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या ‘ज्ञानदीप अभियानाने’ आतापर्यंत १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. आता आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या निर्णयामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद देणारे ज्ञानदीप अभियान हे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या अभियानातून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच ज्ञात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेल,” अशी भावपूर्ण ग्वाही डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी दिली.
डॉ. दिगंबर महाले यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते. प्रारंभी महात्मा फुले यांचे गीत दिशा संदानशिव, उषा देवरे व डी. ए. पाटील यांनी सादर केले.
यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन तसेच युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील, तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, “अमळनेरच्या विकासासाठी केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची गरज आहे. पाणी, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे डी. ए. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षकांचे नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. दिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



