खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 4 days ago
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
Top 10 News
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अतिवृष्टीग्रस्त अमळनेरला तातडीने आर्थिक मदत द्या; नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दिलासा द्यावा – तालुका काँग्रेसची मागणी
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; शेतकरी, व्यापारी, कामगारांसह १२०० ते १५०० कुटुंबांना मदतीची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी
दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व सर्व समाजघटकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात दि. ३ ऑगस्ट रोजी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा. तहसीलदार अमळनेर तसेच मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट रोजी शहरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बोरी नदीकाठावरील उत्तरेकडील रेल्वे पुलापासून दक्षिणेकडील माळी मढीच्या मागील भागापर्यंत, संताजी नगर, मार्केट कमिटीच्या मागील व आतील परिसरासह विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान बोरी नदीकाठावरील रियाझ मौलाना यांच्या वीटभट्टीचे तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तसेच नदीकाठावरील नागरिकांचे धान्य, डाळी, कपडे, अंथरूण-पांघरूण व दैनंदिन वापराच्या वस्तू पुराच्या पाण्यात पूर्णतः भिजून खराब झाल्या असून अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांसमोर अन्न, निवारा व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर धान्य भिजून खराब झाले असून संपूर्ण परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय प्रसाद नगर, भालेराव नगर, संताजी नगर, गलवाडे रोड, ताडेपुरा, पहिलाड आदी भागांतील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून पुराचे पाणी थेट रस्ते, वस्त्या आणि घरांमध्ये घुसल्याचा आरोपही काँग्रेसने निवेदनातून केला आहे. या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्यातील सुमारे १२०० ते १५०० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून उभी पिके धोक्यात आली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून शेतरस्ते (पाणंद) उद्ध्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहर व ग्रामीण भागात दुर्गंधी पसरू लागली असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ यांसारख्या आजारांचा तसेच डास, माशा व कीटकांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि त्वचारोगांचा धोका वाढल्याबद्दलही निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देताना अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, मगन वामन पाटील, पी. वाय. पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या मांडल्या.
मा. तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देताना डॉ. रवींद्र पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, अधिकार पाटील, लोटन चौधरी, तुषार संधान शिव यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची माहिती देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.
तर मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्यासमोर राजेंद्र भिकन पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, एड. रज्जाक शेख, लोटन पाटील, सुधाकर भैसे, कैलास पाटील यांनी बोरी नदीकाठावरील नागरिकांच्या अडचणी मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी राजू भाट, साईद तेली, तोशिब तेली, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील यांची उपस्थिती होती.



प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला आयएमए अमळनेर शाखेचा तीव्र विरोध प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन;
अमळनेर : राज्य शासनाकडून प्रस्तावित बीएचएमएस व सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अमळनेर शाखेने तीव्र भूमिका घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करत ४ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन यांच्यासह शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेमुळे वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता, उपचारांची शास्त्रीय पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारपद्धती, निदान आणि औषधोपचार हे केवळ त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच केले जाणे आवश्यक असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.
तसेच अशा प्रकारच्या नोंदणी प्रक्रियेमुळे आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संघटनांशी व्यापक चर्चा करावी, रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आयएमए अमळनेर शाखेने केली आहे.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी , माजी आमदार डॉ . बी एस पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणी, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्करतसेच शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.



खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
अमळनेर : |, दि. ५ ऑगस्ट : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या वतीने नवीन सभासद नोंदणीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध संदेशांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर येथे नवीन सभासद बनविण्याबाबत अथवा त्यासाठी अर्ज भरण्याबाबत अद्याप संस्थेने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही संदेशांवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच त्यास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने स्पष्ट केले आहे की, सभासद नोंदणीसंदर्भातील कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी व इच्छुकांनी केवळ संस्थेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.




