सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाहनधारकांची कसरत; बालके, विद्यार्थी व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न — नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.
यासोबतच शहरात भटक्या कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान बालके, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शाळा, बाजारपेठ, रुग्णालये तसेच रहिवासी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त, भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रभावी मोहीम, तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, अमळनेर नगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
अमळनेर : येथील सरस्वती शिशुवाटीका या पूर्व प्राथमिक शाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रधानाचार्य सौ.किरण भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गान,राष्ट्रगीत व राज्य गीताचे विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक गायन केले व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सुभेदार किशोर ठाकरे व रा.स्व.संघाचे तालुका सहकार्यवाह अॅड.विशाल महाजन यांची उपस्थिती होती. सुभेदार किशोर ठाकरे यांनी आपल्या सेवा काळात विविध मोहिमेत घेतलेला सहभाग व त्यात आलेले अनुभव कथन केले. मागील वर्षी झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” मध्ये घेतलेल्या सहभागाचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. सैनिकी सेवेत तरूणांनी सहभागी व्हावे यासाठी लहानपणापासून तयारी करणे आवश्यक आहे असे सुभेदार किशोर ठाकरे यांनी सांगितले.अॅड.विशाल महाजन यांनी शालेय जीवनातील संस्कार व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात उपयुक्त ठरतात.विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचा पाया मजबूत होण्यास शिक्षणाबरोबर संस्कार देणा-या अशा शाळांमुळे मदत होते असे उद्गार काढले.
*सांस्कृतिक कार्यक्रम*
वेशभूषा सादरीकरणात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा करून त्यांच्या विचारांचे प्रकटीकरण केले. यात भारत माता, सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,
पंडित जवाहरलाल नेहरू,
सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई,सैनिक,पोलीस आदी भुमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. चिमुकल्या वक्त्यांची देशभक्तीपर भाषणे,सामूहिक व वैयक्तिक नृत्य अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला पालक बंधू भगिनी, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रविंद्र पाटील,
दिनेश नाईक,मनोहर सोनवणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक वर्ग,परिसरातील नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमात सौ.आम्रपाली संदानशिव यांनी स्वागत गीत सादर केले.सौ.माहेश्वरी राजपूत व सौ.काजल राठोड यांनी सुत्रसंचालन केले तर सौ.किरण भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रति,
मा.संपादक/प्रतिनिधी
कृपया वरील वृत्त प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती.



हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अमळनेर : अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांच्या मालकीच्या हॉटेल पायलच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश बिराडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण व भिका संतांची यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
सकाळच्या वेळेत गोडाऊनला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने वेळ न दवडता केलेल्या जलद कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील समजू शकला नसून, संबंधित विभागाकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.




