अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेर मध्ये प्रथमच प्रातः कालीन संगीतमय मैफिलीचे आयोजन
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान
अमळनेर मध्ये प्रथमच प्रातः कालीन संगीतमय मैफिलीचे आयोजन
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
अमळनेर :- येथील नगरपरिषदेच्या ‘ अग्निशमन विभागातर्फे ‘ दिनांक 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अमळनेर साजरा झालेल्या आखाजी महोत्सवात ‘ अग्निशमन सप्ताह अंतर्गत ‘ जनजागृती पर स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलमध्ये अग्निशमन विभागाचे विविध प्रकारचे बचावासाठी लागणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तेथे ठेवण्यात आलेल्या विविध उपकरणांची माहिती नागरिकांना करून देण्यात येत होती.
नागरिकांना अग्निशमन विभाग काय आहे हे कसे कार्य करते, सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. नागरिकांनी प्रत्यक्ष साहित्य पाहून अग्निशमन विभाग आपल्या सेवेसाठी किती तत्पर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या सर्व उपकरणांची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिराडे, जाफर पठाण, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदनशिव यांनी करून दिली.
अग्निशमन विभागाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीच्या मासिक जनजागर सोहळ्याची अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या अभियानाचा शुभारंभ वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, दि. 19 मार्च 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. महिनाभर चाललेल्या या जनजागर उपक्रमाची सांगता समारंभपूर्वक पार पडली.
सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील, कृषी विभागाचे अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे एकत्रीकरण करून करण्यात आली. या मातीपासून मंडल तयार करून मंत्रोच्चाराच्या माध्यमातून भूमी शुद्धीकरण व अभिमंत्रण विधी पार पडला. गणपती पूजन, संकल्प आणि विधिवत पूजा करून भूमी अभिमंत्रित करण्यात आली.

यानंतर ही अभिमंत्रित माती पाकिटांमध्ये भरून उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी देण्यात आली. यावेळी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी माती संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच हा संदेश गावागावांत पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.या अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
अमळनेरच्या मातीतून उठलेला आवाज आता थेट जागतिक व्यासपीठावर घुमला आहे—आणि त्यामागे आहे एक तरुण, संवेदनशील आणि जिद्दी चेहरा: शंतनू वाघमारे

अमळनेर : छोट्या शहरातील वास्तव, सामान्य माणसांच्या अडचणी आणि हवामान बदलाचा थेट परिणाम—हे सगळं आता केवळ स्थानिक चर्चेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांनी हा आवाज थेट ग्लोबल सिटिझन असेंब्ली (GCA)पर्यंत पोहोचवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात जगभरातील नागरिक हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेवर विचारमंथन करतात. या प्रतिष्ठित मंचावर शंतनू यांनी अमळनेर आणि आसपासच्या भागातील वास्तव मांडत स्थानिक समस्यांना जागतिक परिप्रेक्ष्यात स्थान मिळवून दिले.
स्थानिक ते जागतिक — आधार संस्थेची साथ
या प्रवासात *आधार संस्था* यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आवश्यक कागदपत्रे, समन्वय, आणि स्थानिक माहिती उपलब्ध करून देत संस्थेने शंतनूंना भक्कम पाठबळ दिले. ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये हवामान बदलाचे भासणारे परिणाम—जसे वाढती उष्णता, अनियमित ऋतू, आणि त्याचा शेती व रोजंदारीवर होणारा परिणाम—हे सर्व मुद्दे प्रभावीपणे मांडले गेले.
भाषांतरापलीकडे जाऊन आवाजाला दिली ताकद
शंतनू यांचे योगदान केवळ भाषांतरापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्थानिक लोकांच्या भावना, अनुभव आणि संघर्ष जागतिक पातळीवर स्पष्ट आणि प्रभावीपणे पोहोचवले. त्यामुळे चर्चेत केवळ तांत्रिक किंवा धोरणात्मक मुद्दे नव्हते, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्याचा वास्तव देखील समोर आले.
रिक्षाचालक किशोर पाटील यांचा आवाजही पोहोचला जगभर
या सत्रांमध्ये अमळनेरचे रिक्षाचालक किशोर पाटील यांनी स्वतःचे अनुभव मांडले. त्यांच्या साध्या पण वास्तववादी शब्दांतून हवामान बदलाचे दैनंदिन आयुष्यावर होणारे परिणाम स्पष्ट झाले.
“आम्ही मोठ्या शब्दांत बोलत नाही, पण बदल दिसतोय… ऋतू बदलले आहेत, उष्णता वाढली आहे, आणि त्याचा आमच्या कामावर परिणाम होतो,” असे किशोर पाटील यांनी सांगितले.
शंतनूंनी त्यांच्या या भावना आणि अनुभवांना जागतिक मंचावर पोहोचवले—आणि त्यामुळे ‘सामान्य माणूस’ही या चर्चेचा केंद्रबिंदू बनला.
हवामान बदल आणि अन्न व्यवस्था — एक महत्त्वाची कडी
या चर्चांमध्ये हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेतील संबंधावरही सखोल विचारमंथन झाले. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, अन्न उत्पादनातील अनिश्चितता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
अमळनेरचा अभिमान — जागतिक स्तरावर ठसा
शंतनू वाघमारे यांचा हा सहभाग केवळ वैयक्तिक यश नाही, तर अमळनेरसारख्या छोट्या शहरासाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांनी दाखवून दिले की, स्थानिक स्तरावरचे प्रश्न आणि अनुभव योग्य व्यासपीठ मिळाल्यास जागतिक चर्चेतही प्रभाव निर्माण करू शकतात.
“किशोरसारख्या लोकांचे आवाज जगापर्यंत पोहोचले पाहिजेत. हवामान बदलाचा खरा परिणाम आकड्यांमध्ये नाही, तर लोकांच्या आयुष्यात दिसतो,” असे शंतनू वाघमारे यांनी ठामपणे सांगितले.
निष्कर्ष : अमळनेरच्या मातीतील वास्तव आता जागतिक चर्चेचा भाग बनले आहे. शंतनू वाघमारे यांची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे—कारण बदलाची सुरुवात नेहमी आपल्या आसपासच्या जगातूनच होते.

