दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
द्रौ. रा. कन्या शाळेत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत फुटबॉल पूजन करून विद्यार्थिनींमध्ये क्रीडाभावना जागृत; विश्वचषक स्पर्धेला दिल्या शुभेच्छा
अमळनेर | प्रतिनिधी
जगभरातील अब्जावधी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभानिमित्त खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फुटबॉल व प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यार्थिनींमध्ये क्रीडेप्रती जागरूकता निर्माण करण्यात आली.
फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि रोमांचक खेळ मानला जातो. फिफा विश्वचषक हा केवळ क्रीडा स्पर्धा नसून विविध देशांच्या संस्कृती, कौशल्य आणि संघभावनेचा जागतिक उत्सव आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून भारतातही फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफीचे वैशिष्ट्य, फुटबॉल खेळाचा इतिहास तसेच जागतिक स्तरावरील या स्पर्धेचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची क्षमता विकसित होते, यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, सौ. संजीवनी देशमुख, श्री. राजेश बिर्हाडे, श्री. प्रविण पुरकर तसेच आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी फिफा विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा देत विद्यार्थिनींना नियमित खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळ हा केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित नसून तो जीवन जगण्याची कला शिकवतो. क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.”
फुटबॉल पूजन, क्रीडा जनजागृती आणि विश्वचषक स्पर्धेबाबत माहितीपर संवादामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींनीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
उपशीर्षक:”खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग; क्रीडाभावनेतून घडते सक्षम व्यक्तिमत्त्व” – सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम.


पर्यावरण संवर्धन व शेतकरी बांधवांसाठी संवेदनशील नागरिकांचे श्रमदान; लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेवर सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी साधला निशाणा.

अमळनेर | प्रतिनिधी
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा मानवतेचा संदेश देणारे थोर समाजसेवक, साहित्यिक आणि राष्ट्रसेवक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमळनेरमध्ये त्यांच्या विचारांचा जिवंत वारसा अनुभवायला मिळाला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. ११) स्मारक परिसरातील रस्त्याची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि श्रमप्रतिष्ठेचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून साने गुरुजींना कृतीतून अभिवादन केले.
उपक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, खान्देशातील श्रमसंस्कार छावण्यांतून घडलेली तरुणाई, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मारक परिसरातील रस्ता अनेक ठिकाणी खराब झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे आणि रस्ता समतल करण्याची कामे श्रमदानातून पूर्ण केली. लोकसहभागाच्या बळावर सार्वजनिक प्रश्न सोडविण्याचा आदर्श यावेळी पाहायला मिळाला.
या उपक्रमासाठी स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील, अमेय मुंदडा, डॉ. विकास हरताळकर, नगरसेवक अनिल महाजन, चेतन सोनार तसेच माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले.
सकाळी ६ वाजेपासून सुरू झालेल्या श्रमदानात डॉ. मिलिंद वैद्य, गोपाळ नेवे, चेतन भोई, शुभम पवार, प्रथमेश कोठावदे, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, शिव निकम, सुनील वाघमोडे, डॉ. अतुल चौधरी, तुषार पाटील, किशोर महाजन, हेमंत बडगुजर, प्रणव पाटील, विक्रांत पाटील, दर्शना पवार, लोकेश वाणी, हेमंत भामरे, भागवत गुरुजी, डॉ. दिनेश पाटील, उमेश चौधरी, सुनील पाटील, संदीप चौधरी, सतीश देशमुख, रोहित चौधरी, डॉ. संदीप सराफ, गौरी सराफ, मनीष सराफ, आर. पी. पवार यांच्यासह असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमातून साने गुरुजींनी दिलेला श्रमप्रतिष्ठा, लोकसहभाग, समाजसेवा आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपला गेला. स्मृतिदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी केवळ अभिवादन न करता समाजहितासाठी श्रमदानाचा मार्ग स्वीकारत साने गुरुजींच्या विचारांना खऱ्या अर्थाने उजाळा दिला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त करताना, भविष्यातही लोकहित आणि समाजविकासासाठी अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

पर्यावरण संवर्धन, शेतकरी हित आणि सामाजिक बांधिलकी जपत संवेदनशील नागरिकांनी श्रमदानातून आपले कर्तव्य पार पाडत समाजापुढे आदर्श निर्माण केला. यावेळी नागरिकांनी केवळ श्रमदानच नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेबाबतही परखड भूमिका मांडली.
“खरंतर सध्या आपण निवडून दिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींची कर्तव्यभावना हरवत चालली आहे. जनतेचे प्रश्न सोडविताना अहंकार आणि दंभ वाढताना दिसतो. जणू काही ते जनतेवर उपकारच करत आहेत, अशी भावना निर्माण होत आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, कोणताही आमदार, खासदार किंवा मंत्री स्वतःच्या खिशातून खर्च करून जनतेची कामे करत नाही. लोकांची कामे करण्यासाठी त्यांना मानधन, विविध सुविधा आणि निवृत्तीनंतर पेन्शनची तरतूद असते. त्यामुळे जनसेवा ही त्यांची जबाबदारी असून त्याकडे उपकाराच्या दृष्टीने पाहिले जाऊ नये.
यावेळी लोकशाहीतील मतदारांच्या भूमिकेवरही भर देण्यात आला. “जोपर्यंत मतदार पैसे, प्रलोभने आणि व्यक्तिपूजेला बळी पडत राहतील, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. नागरिकांनी विधायक मुद्दे, मुलभूत सुविधा आणि विकासाच्या आधारावर मतदान करणे आवश्यक आहे. तरुणाई, शेतकरी आणि महिला यांनी पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन करण्यात आले.
समाजातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धन, शेतकरी प्रश्न आणि मुलभूत गरजांशी संबंधित विषयांवर लवकरच व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेवटी, “पाठीचा कणा ताठ असलेल्या आणि तो ताठ करण्याची इच्छा असलेल्या सर्व भाऊ-बहिणींना सोबत घेऊन समाजहिताच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच राहील. जनतेचा विश्वास, स्नेह आणि प्रेम हीच माझी खरी संपत्ती असून त्याच बळावर मी ठामपणे उभी आहे,” असा भावनिक संदेश देण्यात आला.
द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींची ७६ वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरीखरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’चा संदेश विद्यार्थिनींनी केला आत्मसात
अमळनेर | प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, समाजसेवक आणि मानवतावादी विचारवंत परमपूज्य सानेगुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या अमर गीतातून मानवतेचा संदेश देणाऱ्या सानेगुरुजींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी त्यांच्या जीवनकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत समाजाला प्रेम, बंधुभाव आणि समतेचा संदेश देणाऱ्या या महान विभूतीस विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, श्री. राजेश बिर्हाडे तसेच श्री. प्रविण पुरकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सानेगुरुजींच्या राष्ट्रसेवा, सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर करून सानेगुरुजींच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
सानेगुरुजींच्या प्रेरणादायी जीवनातून विद्यार्थिनींनी प्रेम, त्याग, सेवा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार आत्मसात करावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



