संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 hours ago
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
अमळनेर :- आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शरीरातील पिंपळे रस्त्यावरील देशमुख नगर एक व दोन समोरील नवीन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण देशमुख नगर परिसर जलमय झाला असून नवीन रस्ता तयार झाल्यामुळे या रस्त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय नाही, रस्त्याचा उतार व्यवस्थित नाही. या रस्त्याचे काम नियोजन शून्य झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पाऊस पडल्यावर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी येथील रहिवासी एन एस पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.
देशमुख नगर, पिंपळे रोड येथील नवीन रस्त्याचे बांधकाम झाल्यामुळे उर्वरित कॉलनीत साठलेलं पावसाचे पाणी घरापर्यंत येत असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. वयोवृद्ध नागरिक व लहान मुले यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.


संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
अमळनेर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंदिरातील लाकडी रचना तसेच ऑइल पेंट ने रंगरंगोटी केली असल्यामुळे आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीत ही आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दल, पालिका प्रशासन, पोलीस, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बोरी नदीच्या दोन्ही काठावर केलेल्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली अन्यथा सराफ बाजारातील अरुंद रस्त्यांमुळे मदत कार्य कठीण झाले असते.
दरम्यान आज सकाळी संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन हभप प्रसाद महाराज पंढरपूर कडे रवाना झाले होते. आग लागल्याची माहिती मिळूनही त्यांनी दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेनुसार वारी सुरूच ठेवली आहे.
घटनास्थळी अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, डी वाय एस पी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, यांच्यासह प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन बंब व खाजगी पाण्याचे टँकरही मागविण्यात आले होते. आग विझविण्याचा कामात विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटना, हिंदू मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या भीषण आगीत संस्थानाचे मोठे नुकसान झाले असले तरी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती सुरक्षित राहिले आहेत. मंदिराचा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
अमळनेर | प्रतिनिधी
समाजसेवा, वैद्यकीय, आर्थिक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या मान्यवरांचा लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात भव्य गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाप्रती असलेली निष्ठा, सेवाभाव आणि विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण योगदानामुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य होत असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित व्यक्तींचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांना सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, सीए राजेश शाह, सीए अजय हिंदुजा, सीए रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव जयेश गुजराथी यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करत समाजहितासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


