डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 14 hours ago
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा
Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा
अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव
भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर : तालुक्यातील कन्हेरे येथे भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाचे आगमन होताच शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले.
बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या हस्ते विधिवत भूमीमातेचे पूजन करण्यात आले. विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती आणून एकत्रित पूजन केल्याने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक व सामाजिक रंग प्राप्त झाला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मनोहर तायडे, तसेच मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी स्पष्ट करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध गावांमधून संकलित मातीचे एकत्र पूजन करण्यात आले.
कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे शेती, शेतकरी व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, रायझोबियम व बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध जैविक शेती उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
या अभियानांतर्गत जनजागर रथाने कन्हेरेसह फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री या गावांनाही भेट देत शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागर निर्माण केला. ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती प्रसारित करत, पत्रके वाटप करून आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला.
भूमीमातेच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
अमळनेर : प्रबुद्ध विहार, अमळनेर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक नेते श्री. मनोहर नाना निकम यांच्या शुभहस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला खौशी येथील अरुण बापू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चिंधू दादा वानखेडे, तसेच संजय सूर्यवंशी (पारोळा) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नव्हते, तर ते सर्वसामान्य जनतेचे नेते होते. मानवता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश त्यांनी समाजाला दिला असून त्यांच्या विचारांवरच देशाची वाटचाल सुरू आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी या महान महामानवाला कोटी कोटी प्रणाम करून अभिवादन करण्यात आले. 🙏
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमळनेर (जळगाव) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.या
वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनील पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनील भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ‘जय भीम’ तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एकूणच, सामाजिक समता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत ही जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

