जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ताततीने दुष्काळी सवलती व मदत देण्याबाबत निवेदन सादर…
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 14 hours ago
बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 14 hours ago
अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 15 hours ago
महिला विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन’; इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनजागृती उपक्रम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; भाविकांना दर्शन, तीर्थप्रसादाचे निमंत्रण
अमळनेर : श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विधीवत साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी या अलौकिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिराच्या इतिहासात हा दिवस सर्वांत मोठा आणि परम पवित्र मानला जातो. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात अतिशय भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण असणार आहे.
दिवसभरातील कार्यक्रम
पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवे ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला जाईल. यानंतर दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचेही आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाधुपारती होईल.
भाविकांना आवाहन
श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.
काय आहे मंदिराचे वेगळेपण?
खानदेशची भूमी गौरवान्वित करणारे हे मंदिर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील एकमेव मूर्ती आणि पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. तसेच परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित आणि भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित विश्वातील एकमात्र मंदिर आहे.
जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ताततीने दुष्काळी सवलती व मदत देण्याबाबत निवेदन सादर…
जळगांव : जळगांव जिल्ह्यातील यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पावसातील खंड, पावसाचे अनियमित स्वरूप व सततची उष्णता यामुळे जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भांगामध्ये पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून खरीप पिकांची वाढ खुंटलेली आहे. शेतक-यांनी बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी मोठा खर्च केलेला असताना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जनावरांच्या चा-याबरोवर पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.
जळगांव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करता प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी व पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतक-यांसाठी तातडीने मदत व सवलती देण्यात याव्यात ही नम्र विनंती.
प्रमुख मागण्या
१) जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा.
२ ) जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना हेक्टरी ५००००/- रूपये नुकसान भरपाई मिळावी.
३) पात्र शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबधीत विमा कंपनीने तातडीने कार्यवाही करावी.
४) पावसाअभावी निर्माण होणारी जनावरांच्या चा-याची समस्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध करून देण्यात यावा.
५) शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या सर्व सवलती व योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा.
६) शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ उर्वरीत यादी जाहीर करून शेतक-यांचा खात्यावर पैसे जमा करावे.
७) मागील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेला नुकसानाचे पैसे तात्काळ शेतक-यांना दयावे.
८ ) शेतक-यांचा मुलांना फी माफी व एस. टी. पास सवलत देण्यात यावी.
९) नियमित कर्मफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे.
जळगांव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शासनाकडे योग्य तो प्रस्ताव पाठवावा ही नम्र विनंती.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप खोडपे सर, विकास पवार, वाय एस महाजन सर, ईजाज मलिक, कल्पिताताई पाटील, सुनिल भैय्या माळी, विलास पाटील, डॉ सुभाष देशमुख, किरणभाऊ राजपूत, अन्वर खाटीक, राजु मोरे, गणेश पाटील, भगवान सोनवणे, मजहरभाई पठाण, रईस खाटीक, प्रा एन डी पाटील, विनायक पाटील, प्रतिभाताई शिरसाट, सुमनताई बनसोडे, माधुरीताई पाटील, कलाताई शिरसाट, नारायण चौधरी, प्रा गोपाल पाचवणे, नईम खाटीक, संजय जाधव, दिलीप ताकवाले, वाल्मिक आमले, अकबर खान अजमिरी खान, लक्ष्मणराव पाटील, रियाज देशमुख, मोहित पवार, राजेंद्र चौधरी, फहरान खान इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन
अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून दोन-तीन ठिकाणी बिबट्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः नंदगाव शिवारात एकावर हल्ला आणि परिसरातील शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आणि अंतुर्ली परिसरात डोळे चमकणारा प्राणी दिसल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय ढेकू रस्ता येथेही बकऱ्या चारणाऱ्याला दिसल्याची वार्ता पसरली.तसेच कालही पिळोदा ,धुपी ,देवळी शिवारात बिबट्याचा वावर आढळून पपईच्या शेतात तो लपला व त्यांनतर पळाला नंतर मक्याच्या शेतात दिसला,अशी वार्ता पसरल्याने शेतकरी भयभीत होऊन मजूरही घाबरलेले होते,.याठिकाणी देखील वन अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल होऊन सर्वत्र पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांचेशी संपर्क साधून संपुर्ण माहिती जाणून घेत त्यांना अधिक दक्ष होण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच जनतेला महत्त्वाचे आवाहनही केले आहे.
काय म्हणाले आमदार अनिल पाटील ?
“अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी ही बाब केवळ अफवा समजून बेसावध राहू नये, तसेच विनाकारण पॅनिक होऊन घाबरूनही जाऊ नये.सर्व नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना सोबत २-३ जणांनी जावे, हातात बॅटरी, काठी ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये. आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.”
वन विभाग सतर्क, दोन पिंजरे लावले
आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाला सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून पिंजऱ्यात सावज म्हणून बकरी कोंडण्यात आली आहे.मात्र रात्री-अपरात्री शेतरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे आणि वर्दळीमुळे तो हिंस्त्र प्राणी पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. लवकरात लवकर बिबट्याचा वावर असेलच तर त्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा दिला जाईल. नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

