डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 22 hours ago
सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय
डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक
सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय
‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ विषयावर विद्यार्थ्यांची चुरशीची स्पर्धा
अमळनेर : समग्र शिक्षा जिल्हा परिषद गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर सर उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्यासाठी सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने आणि भारताच्या ऊर्जा विकासाची दिशा यावर प्रभावीपणे मते मांडल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. नंदा पाटील मॅडम व श्री. आकाश पाटील यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेत डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेरच्या मयुरी संदीप महाजन हिने प्रथम क्रमांक पटकावला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरच्या मोहक मुकेश साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या सोहम अमोल भोसले याने तृतीय क्रमांक पटकावला. एस. एस. पाटील हायस्कूल, लोंढवेच्या जयेश निंबा पाटील याची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.
विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री वानखेडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. यशोदीप बागल यांनी केले.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, नंदा पाटील व आकाश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री. दीपक महाजन सर, सौ. वैशाली पाटील मॅडम, श्री. हर्षल पवार, सौ. भारती पाटील मॅडम, एन. डी. पाटील, सौ. एस. एस. कसबे मॅडम, सौ. डिंपल देसाई मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा विज्ञान मेळावा प्रेरणादायी ठरला.



डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक
भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय या विषयावर प्रभावी मांडणी; गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन
अमळनेर : समग्र शिक्षण जिल्हा परिषद जळगाव व गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी शाळेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेची कुमारी मयुरी संदीप महाजन हिने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर प्रभावी मांडणी करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब यांच्या हस्ते मयुरी महाजन हिला बक्षीस देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांना नवी ओळख मिळाली आहे.
मयुरी महाजन हिने विषयाचा सखोल अभ्यास करून भारतीय ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच त्यावरील संभाव्य उपाय यांची प्रभावी मांडणी केली. तिच्या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांनी दाद देत तिला प्रथम क्रमांक बहाल केला.
या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.
मयुरीच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान विषयात अभ्यास, प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
मयुरी महाजन हिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मयुरी महाजन हिच्या या यशासाठी शाळेतील सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक तसेच कर्मचारी बंधू-भगिनींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.



अमळनेर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाहनधारकांची कसरत; बालके, विद्यार्थी व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न — नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.
यासोबतच शहरात भटक्या कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान बालके, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शाळा, बाजारपेठ, रुग्णालये तसेच रहिवासी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त, भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रभावी मोहीम, तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, अमळनेर नगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




