साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर महाराज : साळी समाजाच्या आराध्यदैवताचा जन्मोत्सव आज उत्साहात
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचे रविवारी आयोजन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याची संधी
अमळनेर : विद्यार्थ्यांसह कला व संस्कृतीची आवड असलेल्या नागरिकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी ‘मूर्तिकार व्हा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रोड, अमळनेर येथे होणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याचे प्राथमिक तंत्र, आकारनिर्मिती आणि कलाकुसरीची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीकलेची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमामुळे सहभागींच्या कलागुणांना वाव मिळणार असून, पारंपरिक मूर्तीकलेविषयी आकर्षण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.
सहभागींसाठी आवश्यक साहित्य
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी सोबत एक किलो शाडू माती, लाकडी फळी, वाटी, प्लास्टिकचा डबा, रिकामी रिफिल, रद्दी वर्तमानपत्र, पेन्सिल, पाण्याची बाटली आदी साहित्य आणावे.
कला, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त राज्यस्तरीय सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी आयोजित या समारोहाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
यंदाचा ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार’ जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर ‘सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार’ माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख रक्कम आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे होते.
अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वैचारिक दिशा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावरून येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले.
“सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणारे सर्वच मेसेज खरे नसतात. मेसेजची खात्री करावी. प्रसंगी लायब्ररीत जाऊन संदर्भ शोधावा. त्यातून आपली वैचारिक बैठक तयार होईल. देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘जेन-झी’वर (Gen Z) आहे. विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे,” असे शमिभा पाटील यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, “द्वेषापेक्षा संवादाला महत्त्व द्या. अफवांपेक्षा सत्याची पडताळणी करा. व्यक्तीपूजेपेक्षा विचारांना आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व द्या. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आपल्या आचरणात रुजल्यास संविधानाला अभिप्रेत असा समाज निर्माण होईल.”
‘पाण्याच्या प्रश्नावर माणसे तयार करणे हेच योगदान’ — उज्वलकुमार चव्हाण
सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जलसंवर्धनाच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे तयार केली, हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आम्ही देखील महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणली आहे. गावात पाण्यासाठी झटणारी माणसे तयार करणे ही आमची प्रेरणा आहे.”
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावून घ्यावी, जीवनमूल्यांच्या जडणघडणीसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा, तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मिलन म्हात्रे यांनी जागविल्या साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणी
दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या व आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचे स्मरण करत त्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, अनिता पाटील, सुनील पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘साथी संदेश’ वक्तृत्व स्पर्धेत प्रशांत बेले प्रथम
स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित ‘साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत’ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रशांत चिंतामण बेले (संभाजीनगर) याने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी संजय मोरणकार (मालेगाव) हिने द्वितीय, तर रुपेश जयंत पाटील (जळगाव) याने तृतीय क्रमांक मिळविला. कल्याणी संदीप पाटील (अमळनेर) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. राज्यस्तरीय ‘साथी संदेश वक्तृत्व करंडक’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली.
साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापक राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी व संजय नेरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील आणि श्रीमती शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.
सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचार, जलसंवर्धन, विद्यार्थी प्रबोधन आणि प्रभावी वक्तृत्वाला व्यासपीठ देणारा हा स्मृती समारोह अमळनेरच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.


जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी जगदीश गाढे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर/जळगाव : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
जगदीश गाढे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत सातत्याने पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गाढे यांच्या नियुक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून जळगाव शहरात पक्ष संघटनेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्दल महानगराध्यक्ष जमील शेख, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हरून नकवी, डॉ. ऐश्वर्या राठोड, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, धनंजय चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष जगदीश गाढे यांनी व्यक्त केला.



