पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 hours ago
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!

अमळनेर( हृदयनाथ मोरे ) 30 जुलै च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार माजवला. काही तासांतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वर्षानंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महावितरण चे अनेक ट्रांसफार्मर पाण्याखाली गेल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. पावसाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. पिंपळे नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीच्या मागील संरक्षक भिंतीला भगदाड पडून पाणी थेट आत घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धान्याच्या गोण्या वाहून गेल्या काही गोण्या पाण्यात भिजल्या यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे रोडवरील शिवांश हब येथे पाणी घुसून दुकानातील मालाचे नुकसान झाले. गलवाडे रोड परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले तसेच प्रचंड नुकसान झाले.
एकंदरीतच अमळनेर शहरावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या वेळी अंमळनेरकर नागरिक मदतीला धावले नसते तरच नवल…! अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची तातडीने व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंसाठी औषधे, प्रथमोपचार याची व्यवस्था करण्यात आली होती.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, जय निल फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञात, अज्ञात अनेक नागरिकांनी ज्याला जशी जमेल तशी मदत करून या कठीण प्रसंगी अमळनेरवर कोणतेही संकट आले तर आम्ही ते परतावून लावू या भावनेने काम केले.
आता जनजीवन पूर्व पदावर येत असून शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच अमळनेर वासीयांकडून माफक अपेक्षा.



पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
अमळनेर (प्रतिनिधी):
पैलाड भागातील मातंगवाडीजवळील केडी गायकवाड हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीमुळे मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. मुसळधार पावसामुळे ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात मातंगवाडीतील अनेक गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. ही विदारक परिस्थिती पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.

शाळेत कार्यरत असताना त्या रोजच या वस्तीतील कुटुंबांचे हालअपेष्टा व गरिबी जवळून पाहत होत्या. मात्र पुरामुळे महिलांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे व अन्य वस्तू वाहून गेल्याचे दृश्य पाहून त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.
घरी परतल्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासरे, तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांच्या सहकार्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी भाजी-भाकरी, खिचडी आदी अन्नपदार्थ तयार करून मातंगवाडीत जाऊन गरजू कुटुंबांना वाटप केले. अन्नासोबतच त्यांनी प्रेमाचे दोन शब्द देत महिलांचे सांत्वन केले आणि संकटाच्या काळात धीर दिला.
पूराच्या पाण्यात अनेक महिलांचे कपडे वाहून गेल्याने सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्याही मातंग समाजातील भगिनींना वाटप केल्या. त्यांच्या या संवेदनशील व मानवतावादी कृतीचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या वस्तीत त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात, त्याच वस्तीतील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.
सौ. मंदाकिनी सुनील भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी असून, समाजकार्यात त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून गौरविले आहे.
या समाजकार्याबद्दल प्रताप छबुलाल साळी, नगरसेवक यांनी सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याने समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.



चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणातून महापुरुषांना अभिवादन; सरस्वती शिशुवाटीकेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी उलगडला महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी वारसा
अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील सरस्वती शिशुवाटीका येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांमधून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी शाळेतील प्रियंका बनसोडे, राधिका मोरे, नीरज बाविस्कर, तन्मयी पाटील, हर्षाली संदानशिव आणि दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणातून महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी व बोधपर प्रसंग सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास सौ. किरण भदाणे, सौ. माहेश्वरी राजपूत, सौ. काजल राठोड आणि सौ. आम्रपाली संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.




