महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 hours ago
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 3 days ago
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
अमळनेर : |, दि. ५ ऑगस्ट : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या वतीने नवीन सभासद नोंदणीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध संदेशांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर येथे नवीन सभासद बनविण्याबाबत अथवा त्यासाठी अर्ज भरण्याबाबत अद्याप संस्थेने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही संदेशांवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच त्यास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने स्पष्ट केले आहे की, सभासद नोंदणीसंदर्भातील कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी व इच्छुकांनी केवळ संस्थेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.



महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना तातडीची मदत; “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख” – रोटे. महेश पाटील
अमळनेर | प्रतिनिधी
दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरासह परिसरातील अनेक भाग जलमय झाले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू व संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला.
दि. २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लबच्या वतीने नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले. याशिवाय लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गरजूंसाठी कपड्यांचेही वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात तातडीने मदत पोहोचविल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
या सेवाभावी उपक्रमावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, चेलाराम सैनानी, विजय माहेश्वरी, अभिजीत भांडारकर, डॉ. राहुल मुठे, प्रीतपाल सिंग बग्गा, रोहित सिंघवी, राजेश बेदमुथा, कीर्ती कुमार कोठारी, पूनम कोचर, सौरभ जैन, प्रतिक जैन, देवेंद्र कोठारी, प्रतीक खंडेरिया, विनोद थोरात, सचिन चोपडा, किरण कुंभार तसेच अन्य रोटरी सभासद उपस्थित होते.
या मदतकार्याचे नियोजन अभिजीत भांडारकर, देवेंद्र कोठारी व रोनक संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने फूड पॅकेट व कपड्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना रोटे. महेश पाटील म्हणाले, “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख आहे. गरजूंच्या मदतीसाठी रोटरी क्लब भविष्यातही अशाच प्रकारे सदैव तत्पर राहील.”
वरील वृत्त पी.आर.ओ. मकसूद बोहरी यांनी कळविले आहे.



स्मार्ट मीटरच्या वाढत्या तक्रारींवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक; महावितरणला निवेदन देत पारदर्शकतेची जोरदार मागणी दुप्पट-तिप्पट वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्याची अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही
अमळनेर | प्रतिनिधी
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या वतीने महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मान. धनंजय धांडे साहेब यांना मंगळवारी (४ ऑगस्ट २०२६) सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तसेच वीज कायदा २०२३ नुसार प्रत्येक ग्राहकाला योग्य माहिती, संपूर्ण पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे अपेक्षित आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती पारदर्शकता दिसून येत नसल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतने स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती ग्राहकांना देण्यात यावी, मीटरबाबत शंका उपस्थित झाल्यास त्याची तपासणी कोणत्या अधिकृत प्रयोगशाळेत केली जाते याची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, तसेच मीटर अचूक असल्यास त्याचे तांत्रिक फायदे ग्राहकांना प्रत्यक्ष तपासणीद्वारे समजावून सांगावेत, अशी मागणी केली. याशिवाय ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशीही ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
यावेळी मान. धनंजय धांडे साहेब यांनी ग्राहकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी स्मार्ट मीटर विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या माध्यमातून ग्राहकांना तांत्रिक माहिती देऊन त्यांच्या सर्व संभ्रमाचे पूर्णपणे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे, सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.




