अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेर भावसार क्षत्रिय समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
पत्रकार, विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका उपअध्यक्षपदी नियुक्ती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम
अमळनेरमध्ये समाजकार्य पंधरवड्यात संविधान जागर
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच ज्ञात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेल,” अशी भावपूर्ण ग्वाही डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी दिली.
डॉ. दिगंबर महाले यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते. प्रारंभी महात्मा फुले यांचे गीत दिशा संदानशिव, उषा देवरे व डी. ए. पाटील यांनी सादर केले.
यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन तसेच युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील, तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, “अमळनेरच्या विकासासाठी केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची गरज आहे. पाणी, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे डी. ए. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षकांचे नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. दिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


साने गुरुजींच्या विचारांचा दीपस्तंभ हरपला; प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांना अमळनेरकरांची भावपूर्ण आदरांजली विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने आदरांजली सभा; मान्यवरांनी व्यक्त केला कृतज्ञ भाव
अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे प्राचार्य डॉ. अरविंद सराफ सर यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आदरांजली सभा आयोजित करण्यात आली.
या आदरांजली सभेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सीनियर सिटीजन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्रसेवा दल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप कॉलेज प्राध्यापक संघटना तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.
प्राचार्य डॉ. सराफ यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि कर्मभूमीच्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या साधेपणातला मोठेपणा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे त्यांनी अमळनेरच्या जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
यावेळी दर्शना पवार, बजरंग लाल अग्रवाल, ॲड. ललिता पाटील, सोमानी सर, वासुदेव देसले, प्रकाश शेठ पारेख, एएनआयचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, मकसूद बोहरी, प्राचार्य व्ही. ए. पाटील, प्रा. वाय. बी. पाटील, नवसारीकर सर, भगतसिंग परदेशी, चेतन सोनार आदींनी मनोगत व्यक्त करून डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉ. सराफ यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साने गुरुजींच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही उपस्थितांनी व्यक्त केली.
सभेच्या वातावरणात डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. त्यांच्या कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षण व समाजसेवेचा विचार रुजविणाऱ्या एका समर्पित व्यक्तिमत्त्वाला अमळनेरकरांनी अश्रुपूर्ण नयनांनी दिलेली ही आदरांजली ठरली.


अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी):
स्थानिक नगरपरिषद अमळनेर, जिल्हा जळगाव येथे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश कंडारे आणि नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल बेंडवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आयोग व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
या बैठकीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे सुरक्षा साहित्य जसे की झाडू, तगारी, पावडी, हँड ग्लोव्हज आणि मास्क वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत घरे मिळावीत, ते राहत असलेली शासकीय निवासस्थाने त्यांच्या मालकी हक्काने नाव करून घरभाडे बंद करावे आणि सर्व कर्मचांची सेवापुस्तके अद्ययावत केली जावीत, अशा विविध विषयांवर भर देण्यात आला.
याव्यतिरिक्त, सन २००५ नंतर सेवेत रुजू होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम व इतर थकबाकी तात्काळ देणे, काही कर्मचाऱ्यांच्या ग्रेज्युटीमधून नगरपरिषदेने कपात केलेल्या रकमा परत करणे, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र किंवा सेवेत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नियमानुसार पेन्शन लाभ देणे आणि लाड-पागे वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करून पात्र वारसांना नेमणूक आदेश देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर आयोग व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. या बैठकीस नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख, संघटनेचे पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



