NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
दोन दिवसांपासून सारबेटे बुद्रुक अंधारात; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
महिला विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन’; इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनजागृती उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव येथे महिलांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.
उपक्रमादरम्यान स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी महिला विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.
ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत महिला विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.
यावेळी विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. महिला विद्यार्थिनींना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
उपक्रमाच्या शेवटी महिला विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. त्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे उपक्रम प्रभावी ठरला. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले.
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर पारोळा नगर परिषदेत आढावा बैठक उपाध्यक्ष मा. मुकेशजी सारवान यांच्या उपस्थितीत कामगारांच्या अडी-अडचणींवर सकारात्मक चर्चा; निवेदनांवर योग्य निर्णय घेण्याचे आदेश
पारोळा : पारोळा नगर परिषद, पारोळा येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच त्यांच्या विविध अडी-अडचणींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. मुकेशजी सारवान साहेब – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोग, मुंबई तसेच त्यांचे विशेष कार्य अधिकारी मा. राजेश सोनवणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवा विषयक प्रश्न तसेच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडी-अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी भारतीय सफाई कामगार संघटना, जळगाव यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस – संतोष संदानशिव यांच्यासह दिपक संदानशिव, राजेश कल्याणी, जगदीश संदानशिव, सुनिल गढरे, मिलींद संदानशिव, करण चव्हाण व इतर संघटना पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात निवेदने सादर केली.
सदर निवेदनांमधील मागण्यांवर मा. आयोग साहेबांच्या आदेशान्वये कामगारांच्या हिताचा विचार करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सफाई कामगारांच्या समस्या व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. याच उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), जळगाव जिल्हा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी डी. ए. धनगर, भैय्यासाहेब मगर, पुष्पा भोजू पाटील, अनिता सौंदाणे, समाधान देविदास निकम आणि जावेद अख्तर शेख हबीब या कर्तृत्ववान शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रज्जाक शेख आणि संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून, भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजाचे शिल्पकार आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कार्याचा तसेच NSUIच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व संघटनात्मक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमास धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, पी. एस. बागुल, सत्तार तेली, प्रताप पाटील, गजेंद्र साळुंखे, एस. डी. देशमुख, उमेश संदानशिव, रोहिदास कपडे, रोहिदास दाजी, ताराचंद सूर्यवंशी, नरेश चव्हाण, भगवान संदानशिव, अजय भिल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि समाजनिर्मितीच्या कार्याचा सन्मान आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांचे NSUIच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

