अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 hours ago
अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
अमळनेर | प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने सभागृह उत्साहाने फुलून गेले.
जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर एनएसयूआयचा भव्य विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेवरील विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार , प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे , काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पश्चिम) अविनाश भालेराव, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हनुमंत पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षा घोटाळ्यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या घटनांचा निषेध व्यक्त केला आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
भाऊसाहेब आजबे यांनी एनएसयूआयचा इतिहास, संघटनेची कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संघटनात्मक ताकद वाढवून सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना अॅड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एनएसयूआयची शाखा स्थापन करून संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राजकारणाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन
अमळनेर | प्रतिनिधी :
शहरातील दाजीबा नगर परिसरात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
मृताचे वर्णन
वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे
रंग: सावळा
उंची: अंदाजे ५ फूट ३ इंच
चेहरा: लांबट
नाक: सरळ
केस: काळे
अंगावरील कपडे: निळसर रंगाचा टी-शर्ट व राखाडी (ग्रे) रंगाची पॅन्ट
ओळखण्याची खूण: उजव्या हातात स्टीलचे कडे व लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ५६/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वरील वर्णनातील तरुणाची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणालाही कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांच्याशी ७३०४१६६१४८ या मोबाईल क्रमांकावर किंवा अमळनेर पोलीस स्टेशन च्या ०२५८७-२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!
अमळनेर | प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. केंद्राच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, यापूर्वी निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांसह आता एकूण ११ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे प्रताप महाविद्यालयासह संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला यामुळे मोठी दाद मिळाली आहे.
मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी
मयुर भगवान पाटील
अविनाश विकास पाटील
मंगलेश सुनील पाटील
विकास इंदल बेहरे
या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, चिटणीस प्रा. पराग पाटील, सहचिटणीस डॉ. व्ही. बी. मांटे, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, करिअर काउन्सेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. निलेश पवार, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. कैलास निळे, डॉ. माधव भुसनर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विजय साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विवेक बडगुजर, तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील आणि अतुल धनगर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाभावी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सेलिंग सेंटरने अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून, या यशामुळे भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.


