समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 21 hours ago
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
Top 10 News
समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरात केंद्र व राज्य सरकारविरोधात पेटवली क्रांतीची मशाल महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचा भव्य मशाल मोर्चा; शेतकरी, बेरोजगारी, महागाईसह विविध प्रश्नांवर सरकारला घेरले
अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात अमळनेर शहरात महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते
तिरंगा चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा सुभाष चौक, पाच कंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, ऍड. शकील काझी, रियाज मौलाना, चंद्रशेखर भावसार आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार तसेच स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या मशाल मोर्चात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. तीलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, योजना पाटील, आरती पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, मकसूद पठाण, एड. कौस्तुभ पाटील, प्राचार्य लीलाधर पाटील, बसपाचे गौतम मोरे, अतुल डोळस, चिंधु, वानखेडे योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, रज्जाक शेख, विजय पाटील, वासू पाटील, गिरीश पाटील यांच्यासह विविध पक्ष व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.
क्रांती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी आणि मशालींनी अमळनेर शहरातील वातावरण दुमदुमून गेले.



समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
अमळनेर : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता खेडकर यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सचिन ज्ञानेश्वर साळवे, यामिनी तुकाराम माळी आणि निलेश साईराम भोये या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून आदिवासी समाजाची जीवनशैली, समृद्ध संस्कृती, भाषा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नाते यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या परंपरा, संघर्ष आणि सांस्कृतिक वैविध्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.
यावेळी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी आदिवासी समाजाच्या विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती दिली.
याचवेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. जे. एस. सोनवणे, संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. भरत खंडागळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. आर. ढगे, डॉ. एस. आर. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यामिनी तुकाराम माळी या विद्यार्थिनीने केले.
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, क्रांती दिनाचा प्रेरणादायी इतिहास आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ज्ञानक्षेत्रातील योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
अमळनेर : पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र सखाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण रमेश महाजन यांनी रवींद्र मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
पत्रकारांच्या हितासाठी तसेच संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोरे यांनी संघटनेची उद्दिष्टे, नियम व धोरणांचे पालन करून प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यात पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या रवींद्र मोरे यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, रवींद्र मोरे यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.




