महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
हॉटेल चिन्मय ला लागली आग, शेतातील चारा जळून खाक
अमळनेर ( प्रतिनिधी) शहराबाहेरील धार मारवड रस्तावरील चिन्मय हॉटेलच्या मागील शेतात आग लागल्याने शेतातला काढलेला गहू, मका जळून खाक झाला आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने चिन्मय हॉटेलला देखील आग लागली. तेथील मोठ्या झाडांना ही आग लागली. हॉटेलची आग विझविण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले मात्र वारा सुरू असल्याने शेतातील गहू चाऱ्याची आग जोरात पसरत होती. माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी हॉटेलचे मालक श्याम बागुल यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांनी तात्काळ तिन्ही अग्निशमन बंब रवाना केले. कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जाफर पठाण, वासिम पठाण, आनंदा झिंबल, सत्यम संधनशिव, मच्छिंद्र चौधरी, भिका संधनशिव, आकाश बाविस्कर, आकाश संधनशिव, अजय बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न करून केशवनगर पर्यंत गेलेली आग नियंत्रणात आणली.


अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न 250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ
प्रतिनिधी | अमळनेर
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सादर करण्यात आलेल्या *‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’* या भव्य महानाट्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महानाट्याचे दोन्ही प्रयोग उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. ऐतिहासिक प्रसंग, थरारक सादरीकरण आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे संपूर्ण सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी १० वाजता महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी प.पू. संत प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते जयनिल फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण करून फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील, खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, जितेंद्र ठाकूर, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरून राजश्री पाटील उपस्थित होते.
यावेळी संत प्रसाद महाराज यांनी आशीर्वचन देत युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनीही जयनिल फाऊंडेशनच्या सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे खास युवकांसाठी हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात तरुणांना केंद्रस्थानी ठेवून जयनिल फाऊंडेशन कार्य करणार आहे.”
संस्कृती फाऊंडेशनचे निकेश राजपूत यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे आभार मानले.
या महानाट्यात तब्बल २५० कलाकारांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक कलाकार अमळनेरमधील होते. स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनने केला. कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने आणि उत्कट संवादफेकीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अक्षरशः जिवंत झाला.
महानाट्यातील अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. सभागृहात “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय” च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगावेळी अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. महानाट्य संपल्यानंतर संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसमोर अनेकांनी नतमस्तक होत संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशनचे कौतुक केले.


