अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
general Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 20 hours ago
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
Featured 50_aachonline.org_txt general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
Top 10 News
एन.एम.एम.एस. परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झळाळता यशस्वी ठसा
अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
एन.एम.एम.एस. परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झळाळता यशस्वी ठसा
अमळनेर : येथील खा. शि. मं. संचलित द्रौ. रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. या परीक्षेत तब्बल सहा विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्यासह गुणवत्ता (मेरिट) यादीत स्थान मिळवले असून त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोक्षदा भूषण पाटील, मयुरी संदीप पाटील, ऐश्वर्या अजय पाटील, रोहिनी बाळू शिरसाठ, वैष्णवी महारू पाटील व केतकी पंकज देशपांडे या विद्यार्थिनींनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
या गुणवंत विद्यार्थिनींचा शाळेत विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्रजी जैन यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ, ज्येष्ठ लिपिक श्री शाम पवार, श्री के. आर. बाविस्कर तसेच परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या या यशस्वी परंपरेमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
अमळनेर : तालुक्यात दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगींमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रांजणे आणि देवळी या गावांतील शेतांमध्ये लागलेल्या आगींनी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहिली घटना रांजणे येथे दुपारी सुमारे 12:35 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश धुडकू पाटील आणि सतीलाल नीलकंठ पाटील यांच्या शेतात अचानक आग भडकली. क्षणातच ज्वारीच्या पिकांनी पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाढत्या तापमानामुळे किंवा इतर काही कारणांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रविंद्र पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना सतर्क केले.
दरम्यान, दुसरी घटना देवळी येथे दुपारी सुमारे 3:45 वाजता घडली. चांदणी कुरे आणि मनोज पाटील यांच्या ज्वारीच्या शेतात लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणात पिके भस्मसात झाली.

दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी फारुख शेख, जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, मच्छिंद्र चौधरी, वासिम पठाण आणि आकाश बाविस्कर यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
या आगींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अशा घटनांची शक्यता वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या या भीतीच्या वातावरणात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक१६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड; शाळेत जल्लोष, पेढे वाटप अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने
अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (एन.एम.एम.एस.) परीक्षेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदा अभूतपूर्व यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेच्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्ता यादीत तब्बल १५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. याशिवाय साने गुरुजी कन्या हायस्कूलची एक विद्यार्थिनी देखील गुणवत्ता यादीत झळकली आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील आणि पूरब राजू खंगार यांचा समावेश आहे. तसेच संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात भर घातली.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा १००० रुपये, अशा एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश असून साने गुरुजी विद्यालयाने या उद्दिष्टाला साजेसे यश मिळवले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिक्षक डी. ए. धनगर यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी दिले. कन्या हायस्कूलमधील विद्यार्थिनी संजना अहिरे हिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले, तर दीपक महाजन यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी तसेच मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. आगामी स्पर्धा परीक्षांमध्येही असेच यश मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ॲड. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य हे यशामागील प्रमुख घटक असल्याचे सांगितले. विराज पाटील या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत आपल्या अनुभवांची मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठीच करावा, असे आवाहन करत या शिष्यवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

