अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
Featured 50_aachonline.org_txt general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
Top 10 News
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
अमळनेरात सराफ बाजारातील घराला लागली आग
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेर : मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते होते” असे प्रतिपादन डॉ लीलाधर पाटील यांनी केले महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संविधान जागर अभियान व मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित संयुक्त कार्यशाळेत ते बोलत होते प्रताप महाविद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या जात वर्ग व लिंगभावावर आधारित शोषणाचे मूळ शोधून शोषणतंत्र आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून उलगडून दाखवले. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानव मुक्तीचे व शोषण विध्वंसनाचे तत्त्वज्ञान मांडले. यावर उपाय म्हणून एका सुसंवादी, चिकित्सक व विवेकावर आधारित शिक्षण शिक्षण पद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला व अमलात देखील आणला. या देशातील शेतकऱ्यांच्या दुःखाला व शोषणाला वाचा फोडण्याचे काम तसेच पुरुषप्रधान जातीव्यवस्थेत शोषित असलेल्या महिलांना आवाज देणे हे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी या या तत्त्वांवर जगून प्रत्यक्ष कृतीतून संपूर्ण शोषणमुक्तीचा कृती कार्यक्रम दिल. आपल्या डोक्यात तर्क विवेक आणि चिकित्सा आणि हृदयात करुणा दया आणि मानवता यासारख्या तत्त्वांना घेऊन आदर्शवत जीवन जगणारे फुले या नवीन पिढीला समजावून सांगितल्यास एका सुदृढ व विवेकाधीष्टीत समाजाची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. महात्मा फुले यांच्या जीवनातील घटनांना जरी विशिष्ट स्थळ आणि वेळेची चौकट असली तरी त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानाला ही चौकट नाही आणि म्हणून त्यांच्या या द्विशताब्दी वर्षात या तत्त्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आव्हानही डॉ. पाटील यांनी केले.
युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले की, ” महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्षात २०o व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन, पथनाट्य, परीक्षा, गीते इत्यादी कार्यक्रम जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात राबवून सुमारे 2 लाख नागरिक, विद्यार्थी,महिला, शेतकरी, कष्टकरी यांचे पर्यंत पोहोचण्याचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले तर दिशा संदा न शिव, भारती कोळी, श्रद्धा रे रा, निवेदिता कापडणेकर, उषा देवरे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील,अशोक बिऱ्हाडे, प्रा अशोक पवार यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ हर्षवर्धन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि आपण वर्षभर महात्मा फुले विषयी जे कार्यक्रम आयोजित कराल त्यात प्रताप कॉलेजचा सहभाग असेल, मदत व सहकार्य असेल, असे सांगून कार्यशाळेच्या आयोजकांचे अभिनंदन केले.
कार्यशाळेला पाचोरा कॉलेजचे माजी प्राचार्य बी एन पाटील, प्रा सुभाष पाटील, संदीप घोरपडे,सोमचंद सदा नशिव,डॉ भारती पाटील खलील देशमुख,वसुंधरा लांडगे, रामेश्वर भदाणे, योगेश पाटील, नगरसेविका योगिता पाटील, आरती पाटील,रियाज मौलाना, भीमराव महाजन,, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ सरवदे,वाल्मीक मराठे, डी एम पाटील, ईश्वर महाजन, पुरुषोत्तम माळी, रामकृष्ण महाजन,प्रकाश महाजन,आशा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम बाबुराव ठाकरे,श्रद्धा रे रा,दिशा संदानशिव,निखिल रांजणकर, अशोक बिऱ्हाडे,,सोपान भवरे गोकुळ पाटील,,गुणवंत पवार आदींनी परिश्रम घेतले प्रा डॉ राहुल निकम यांनी आभार प्रदर्शन केले प्रताप महाविद्यालयाचे साने गुरुजी सभागृह खचून भरले होते खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या..
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
अमळनेर (दि. २२ एप्रिल २०२६) — स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या माध्यमातून अमळनेर नगर परिषदेतर्फे कचरा वेचकांसाठी एक व्यापक कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायं. ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला.
या कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील घंटा गाडी चालक, मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी व सुपरवायजर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.
प्रशिक्षणासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त कुशाग्र फाऊंडेशनच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात नमस्ते योजना, NULM, ई-श्रम कार्ड, आधार नोंदणी, बचत गट स्थापन, घनकचऱ्यातील उद्योजकतेच्या संधी तसेच RRR केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कचरा वेचकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा होता. तसेच जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत जनजागृती करण्यात येऊन उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर तसेच युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, घनकचरा सुपरवायजर श्री. खलील शहा व राजेंद्र गोलहीत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे, अमळनेरची ठाम वाटचाल!
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
अमळनेर : “आज उना आखजिना सन… त्याले दीना आम्ही आहेरना मान!” या पारंपरिक ओळींना साजेसा सामाजिक उपक्रम अमळनेर शहरात पाहायला मिळाला. आखाजीच्या पावन निमित्ताने अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम यांच्या पुढाकारातून होतकरू विद्यार्थ्यांचा घरगुती सत्कार करून एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील पैलाड येथील उदय अरुण सोनार या गुणवंत विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयात नियुक्ती मिळवली असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. याचबरोबर ते यूपीएससी परीक्षेची तयारीही करत आहेत. त्यांच्या या यशाचा गौरव करत आखाजीच्या पारंपरिक ‘आहेर’ पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री. प्रशांत निकम, नगरसेवक श्री. पंकज भोई तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उदय सोनार यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, उदय यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या मातोश्रींचाही समाजसेवक श्री. मनोहर निकम यांच्या हस्ते सन्मान करून ‘मातेचा गौरव’ ही सुंदर परंपरा जपण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मनोहर निकम यांनी केली. त्यानंतर श्री. प्रशांत निकम, श्री. कैलास भोई, वानखेडे सर आणि लांडगे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. सत्कारमूर्ती उदय सोनार यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व आगामी यूपीएससी वाटचालीसाठी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या उपक्रमाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुक व्यक्त करण्यात आले. होतकरू आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला अमळनेर शहराचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम, श्री. पंकज भोई, समाजसेवक श्री. मनोहर निकम, श्री. हिरामण कणखरे, प्रा. श्री. गणेश पवार, भूषण भदाणे, महेश पाटील, चंदू वानखेडे, विजय वानखेडे, गौतम मोरे सर, जयवंतराव पाटील, नरसिंहराव वाघ, दशरथ लांडगे, कैलास भोई, बाळू बिराडे, विश्वासराव पाटील सर तसेच पतंजली महिला ग्रुपच्या सदस्यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, पारंपरिक आखाजी सणाला सामाजिक भानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

