लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चा 49 वा स्थापना दिवस उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात साजरा करीत संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 1 day ago
भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर नगर परिषदेत ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा; सफाई कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्डचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
लायन्स क्लब अमळनेरचा सामाजिक पुढाकार ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप; ग्रामीण भागातील मातांना बसभाड्याचीही मदत
अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येची दखल घेत लायन्स क्लब, अमळनेर यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. जून २०२६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अमळनेर तालुक्यात ३७ बालके तीव्र कुपोषित (SAM) आणि २१४ बालके मध्यम कुपोषित (MAM) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लबने पुढाकार घेत ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले.
शुक्रवारी (दि. १७) सकाळी जी. एस. हायस्कूल येथील लायन्स हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात प्रत्येक बालकाला २०० ग्रॅम प्रोटीन पावडर आणि राजगिरा लाडू देण्यात आले. विशेष म्हणजे, दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व मातांना लायन सुनील चौधरी यांच्या वतीने बसभाडे देऊन आर्थिक मदतीचाही हात पुढे करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद, जळगावचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, पंचायत समिती, अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संदीप जोशी, महेंद्र पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमंतराव भदाणे यांनी कुपोषण ही केवळ उपचारांची नव्हे, तर सामाजिक आणि आरोग्यविषयक जाणीवेची समस्या असल्याचे सांगितले. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत माता व बालकाच्या पोषणाची विशेष काळजी घेणे, बालकांना पचनशक्ती वाढविणारा सकस आहार देणे आणि कुटुंब नियोजनाबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा सेवाभावी कार्यासाठी लायन्स क्लब, अमळनेरचे विशेष कौतुक करत समाजसेवेचा हा वसा अखंड सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले यांनी, “समाजातील वंचित, गरजू आणि गरजवंत घटकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. समाजसेवा हीच आमची खरी ओळख आणि परंपरा आहे,” असे सांगितले.
अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी लायन्स क्लब सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही देत गरजूंसाठी मदतीचे दरवाजे कायम खुले असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता पाटील यांनी मानले.
यावेळी सुनील चौधरी, दिनेश मणियार, चंद्रकांत महाजन, विजय पारख, प्रितेश पारख, जितेंद्र जैन, महावीर पहाडे, प्रदीप जैन, प्रकाश जैन, राज जैन, रोनक दोधिवाला यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.



पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा ४९ वा स्थापना दिवस जल्लोषात; विद्यार्थ्यांच्या उत्साहात दुमदुमले शाळेचे प्रांगण
अमळनेर : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि सर्वांगीण विकासाची परंपरा जपणाऱ्या पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा ४९ वा स्थापना दिवस (वर्धापन दिन) अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक तोरणे, पुष्पपाकळ्यांच्या रांगोळ्या आणि मनमोहक सजावटीने नटलेल्या शाळा परिसरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद लुटला.
सकाळच्या मंगलमय वातावरणात शाळेचे प्रांगण उत्सवी स्वरूपात सजविण्यात आले होते. प्रवेशद्वारावर स्वागत रांगोळ्या काढून मान्यवर अतिथी आणि पालकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून शाळा पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष इंजिनिअर कमलेश जिजाबराव महाजन तसेच सहसचिव ॲडव्होकेट मीनाक्षी विशाल राठोड उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळेच्या शिक्षकांनी संस्थेच्या गौरवशाली ४९ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. शाळेच्या प्रगतीचा इतिहास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती प्रभावी शब्दांत मांडण्यात आली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्याचा सोहळा. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जल्लोषात “पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चिरायू होवो” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपहार म्हणून पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावट, परिसर सुशोभीकरण, फलक लेखन व कलात्मक मांडणी कलाशिक्षक अनंत बागल यांनी साकारली. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्ही. जी. बोरोले यांनी केले.
या यशस्वी सोहळ्यासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. एस. अमृतकर, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, विनायक सूर्यवंशी, सविता पारधी, राजश्री पाटील, वाय. पी. ओवे, रोहन मुंदडा तसेच समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
४९ वर्षांची यशस्वी परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अखंड वाटचाल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली कटिबद्धता याचा प्रत्यय या भव्य व प्रेरणादायी स्थापना दिन सोहळ्यातून पुन्हा एकदा आला.



लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून आकारली जाणारी ‘लोकवर्गणी’ आणि पाणीपट्टीवरील वार्षिक शुल्कावर लावण्यात येणारे २ टक्के व्याज या दोन्ही मुद्द्यांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, या दोन्ही वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी करत मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांना शुक्रवारी (दि. १७ जुलै) निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून ‘लोकवर्गणी’ या नावाखाली कोणताही कायदेशीर आधार नसताना बेकायदेशीर व बळजबरीची वसुली करत आहे. त्यामुळे ही आकारणी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, सन २०२४-२५ पासून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही नगरपरिषद ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर २ टक्के दराने व्याज आकारत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही व्याज आकारणीही त्वरित रद्द करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दि. १७ डिसेंबर २०२४, २२ एप्रिल २०२५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजी याच विषयावर दिलेल्या निवेदनांनंतर प्रशासनाकडून ‘यापुढे लोकवर्गणी व २ टक्के व्याज आकारले जाणार नाही’ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.
दोन्ही प्रकारची वसुली तात्काळ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय केला जाईल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अॅड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




