नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!” – पूरग्रस्त अमळनेरला मंत्री गिरीष महाजन यांचा दिलासा महापुरानंतर शासनाची तातडीची हालचाल; पूरग्रस्तांना ₹१० हजारांची मदत, पंचनामे व पाणीपुरवठ्यासाठी विशेष निधीची घोषणा
अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहराला महापुराने दिलेल्या तडाख्यानंतर राज्य शासनाने तातडीने मदतीची भूमिका घेतली असून, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासादायक संदेश देत सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
महापुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करताना नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.
महत्त्वाचे निर्णय
प्रत्येक पात्र पूरग्रस्त कुटुंबाला तातडीची ₹१०,००० मदत देण्यात येणार.
घर, शेती, जनावरे व इतर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश.
शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी डीपीडीसीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, पूरग्रस्त नागरिक तसेच अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासनही देण्यात आले.
जयनिल फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव
महापुराच्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघ यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत अन्न व पिण्याच्या पाण्याची मदत पोहोचविल्याबद्दल जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष कौतुक केले.
आमदार अनिल पाटील यांची ग्वाही
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “महापुरामुळे अमळनेरकरांवर मोठे संकट आले आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासह पूरग्रस्तांना शासनाची प्रत्येक योजना आणि मदत वेळेत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”
महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेला तातडीचा दिलासा, मदतीच्या घोषणा आणि पुनर्वसनासाठी सुरू झालेली यंत्रणा यामुळे पूरग्रस्त अमळनेरकरांना मोठा आधार मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!

अमळनेर( हृदयनाथ मोरे ) 30 जुलै च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार माजवला. काही तासांतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वर्षानंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महावितरण चे अनेक ट्रांसफार्मर पाण्याखाली गेल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. पावसाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. पिंपळे नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीच्या मागील संरक्षक भिंतीला भगदाड पडून पाणी थेट आत घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धान्याच्या गोण्या वाहून गेल्या काही गोण्या पाण्यात भिजल्या यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे रोडवरील शिवांश हब येथे पाणी घुसून दुकानातील मालाचे नुकसान झाले. गलवाडे रोड परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले तसेच प्रचंड नुकसान झाले.
एकंदरीतच अमळनेर शहरावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या वेळी अंमळनेरकर नागरिक मदतीला धावले नसते तरच नवल…! अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची तातडीने व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंसाठी औषधे, प्रथमोपचार याची व्यवस्था करण्यात आली होती.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, जय निल फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञात, अज्ञात अनेक नागरिकांनी ज्याला जशी जमेल तशी मदत करून या कठीण प्रसंगी अमळनेरवर कोणतेही संकट आले तर आम्ही ते परतावून लावू या भावनेने काम केले.
आता जनजीवन पूर्व पदावर येत असून शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच अमळनेर वासीयांकडून माफक अपेक्षा.



पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
अमळनेर (प्रतिनिधी):
पैलाड भागातील मातंगवाडीजवळील केडी गायकवाड हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीमुळे मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. मुसळधार पावसामुळे ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात मातंगवाडीतील अनेक गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. ही विदारक परिस्थिती पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.

शाळेत कार्यरत असताना त्या रोजच या वस्तीतील कुटुंबांचे हालअपेष्टा व गरिबी जवळून पाहत होत्या. मात्र पुरामुळे महिलांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे व अन्य वस्तू वाहून गेल्याचे दृश्य पाहून त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.
घरी परतल्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासरे, तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांच्या सहकार्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी भाजी-भाकरी, खिचडी आदी अन्नपदार्थ तयार करून मातंगवाडीत जाऊन गरजू कुटुंबांना वाटप केले. अन्नासोबतच त्यांनी प्रेमाचे दोन शब्द देत महिलांचे सांत्वन केले आणि संकटाच्या काळात धीर दिला.
पूराच्या पाण्यात अनेक महिलांचे कपडे वाहून गेल्याने सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्याही मातंग समाजातील भगिनींना वाटप केल्या. त्यांच्या या संवेदनशील व मानवतावादी कृतीचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या वस्तीत त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात, त्याच वस्तीतील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.
सौ. मंदाकिनी सुनील भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी असून, समाजकार्यात त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून गौरविले आहे.
या समाजकार्याबद्दल प्रताप छबुलाल साळी, नगरसेवक यांनी सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याने समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.




