श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 21 hours ago
राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 21 hours ago
पाणीटंचाईच्या संकटात नगरसेवक दीपक चौगुले यांची धावपळ; प्रभाग ६ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या अंधजन कल्याण मंडळाचा भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचा कार्यक्रम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेर शहरात डास प्रतिबंधक फवारणी व मलेरिया ऑइल टाकण्याची प्रभावी मोहीम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम; शहरात शैक्षणिक चळवळीची संकल्पना
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
बाप एक अधिष्ठान’ निबंध व वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा चौधरीची दुहेरी बाजी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….
राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन उत्साहात संपन्न
पाणीटंचाईच्या संकटात नगरसेवक दीपक चौगुले यांची धावपळ; प्रभाग ६ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप
स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या अंधजन कल्याण मंडळाचा भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचा कार्यक्रम
अमळनेर शहरात डास प्रतिबंधक फवारणी व मलेरिया ऑइल टाकण्याची प्रभावी मोहीम
जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
बाप एक अधिष्ठान’ निबंध व वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा चौधरीची दुहेरी बाजी
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
एनएसयूआयचे अमळनेर येथे जोरदार आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर, दि. १४ ऑगस्ट : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी तसेच परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने अमळनेर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांची निष्पक्ष, सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नीटसारख्या देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेबाबत कथित गैरप्रकार समोर आल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत करून परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनादरम्यान नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा द्यावी, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर एनएसयूआयच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हक्क आणि गुणवत्ताधारित शिक्षणव्यवस्थेसाठी एनएसयूआय आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनाला एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष ऍड. कौस्तुभ पाटील, तालुकाध्यक्ष उमेश संधान शिव, शहराध्यक्ष जयेश पाटील, प्रभारी प्रवीण पाटील, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांच्यासह संदीप घोरपडे, मनोज पाटील, तुषार संधान शिव, महेश पाटील, अशोक पवार, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ बोरसे, कृष्णा चौधरी, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, विलास भिल, पप्पू भिल, करण भिल, निंबाजी भिल यांच्यासह एनएसयूआय व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….
खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.,
या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण पुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या वेळी मंचवर सौ जया ज़ैन , उपमुख्याध्यापक एस आर शिंगांणे, श्रीमती भारती आठवले , पर्यवेक्षक एस पी वाघ , कु. समिक्षा जैन ,श्री शाम पवार ,शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना , प्रतिज्ञा , संविधान ,वंदे मातरम् घेऊन झाली.मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्र गीत , राज्य गीत म्हणून करण्यात आली.
शाळेमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व नुकत्याच आईस स्केटिंग हॉकी राष्ट्रीय स्तरावर डेहराडून उत्तराखंड येथे खेळलेल्या कुमारी नूतन किशोर भोई हिचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या दिवसाचे वातावरण हे देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर व ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांची आठवण करून देशाला पुन्हा नवीन एका दिशेने नेण्यासाठी देशाचा सुजाण नागरिक व देशाच्या प्रगतीसाठी , व कॉपीमुक्त अभियानासाठी सर्व विद्यार्थिनींनी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांनी आज प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.



राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन उत्साहात संपन्न
अमळनेर (दि. १५ ऑगस्ट) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०१ वाजता सुभाष चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या क्षणीच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची ही आगळीवेगळी आणि प्रेरणादायी परंपरा अमळनेर शहरात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जपली जात आहे.
यंदाच्या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिका कल्पना मोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. मध्यरात्रीचा शांत परिसर राष्ट्रगीताच्या स्वरांनी भारावून गेला. उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी शहरातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक मध्यरात्री सुभाष चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अमळनेरकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्र सेवा दलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि मध्यरात्री झेंडावंदनाच्या परंपरेचे महत्त्व याबाबत गौतम मोरे यांनी प्रास्ताविकात केले. स्वातंत्र्य केवळ राजकीय सत्तांतर नसून सामान्य माणसाला स्वाभिमान, समान संधी, न्याय आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळवून देणारी व्यापक संकल्पना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर प्रा. अशोक पवार यांनी आजच्या काळातील स्वातंत्र्य आणि देशातील सद्यस्थिती यावर सविस्तर भाष्य केले. संविधानाने दिलेली स्वातंत्र्याची मूल्ये, लोकशाहीची जबाबदारी, सामाजिक समता आणि नागरिकांची भूमिका यांचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता आपल्या संविधानिक मूल्यांचे आणि सामाजिक जबाबदारीचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस व्हावा, असे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर शेतीमाला ला भाव,शिक्षण,रोजगार,आरोग्य, सामान संधी यासाठी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारे अजून काही करू शकली असती, मात्र अजून खूप पुढे जावे लागेल. प्रत्येकाला स्वातंत्र्याचं महत्व समजून सांगावे लागेल. आपल्या शहरातून देशासाठी सात देशभक्तांनी जीवाचे बलिदान दिले. त्यांना आज स्मरून त्यांना अभिवादन करून, स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो.
कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पू साने गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि मानवतावादी विचारांची प्रेरणा देणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
त्यानंतर पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याजवळ ‘खरा तो एकाची धर्म’ हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या मानवतावादी विचाराने उपस्थित वातावरण अधिक भावपूर्ण झाले. जात, धर्म, पंथ आणि भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, प्रेम आणि बंधुभाव जपण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला.
राष्ट्र सेवा दलाच्या या मध्यरात्रीच्या झेंडावंदनाची परंपरा केवळ ध्वजारोहणापुरती मर्यादित नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाही-सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी असलेली बांधिलकी व्यक्त करणारी परंपरा म्हणून अमळनेरच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची ठरली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उदय खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती गाला, दिलीप सोनवने,डॉ. मिलिंद वैद्य,सुधाकर देशमुख,अमोल येवले, दीपक चव्हाण,शिवाजी महाजन,तुषार संदानशिव,भीमराव संदानशिव, भालचंद्र सनेर,संजय पाटील,अशोक पाटील,धर्मेश निकुंभ, प्रशांत बडगुजर,
आरीफ भाया, विजयेंद्र शिरसाळे, हरिश देशमुख.प्रशान्त चव्हाण आणि मित्र परिवार
आदींनी विशेष सहकार्य केले.
मध्यरात्रीच्या या झेंडावंदनामुळे अमळनेर शहरात स्वातंत्र्यदिनाची सुरुवातच देशभक्ती, सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि मानवतेच्या विचारांनी झाली. गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आगामी पिढ्यांपर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




