दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये संताप; एन.मुक्टो.कडून काळ्या फिती लावून तीव्र निषेध
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 10 hours ago
अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
चैतन्य संदानशिव हल्लाप्रकरण तापले; आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी समाजबांधवांचा एल्गार! मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा; प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा, घोषणांनी अमळनेर दणाणले
अमळनेर | प्रतिनिधी
देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी गुरुवारी संताप व्यक्त करत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने महाराणा प्रताप चौक ते प्रांत कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा”, “मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी तसेच अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या चैतन्य राजेंद्र संदानशिव यांना जातीवाचक शिवीगाळ करत तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रकरणाचा निष्पक्ष, जलद व सखोल तपास करण्याची मागणी केली. भारतीय न्याय संहितेतील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच पीडित आणि साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजबांधवांनी दिला.
यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव व विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



‘माझ्यावरील आरोप बिनबुडाचे’; माजी आमदार शिरीष चौधरींचे पत्रकार परिषदेत खंडन, आमदार अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्वतःवरील विविध आरोपांचे ठामपणे खंडन करत, ते राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना शिरीष चौधरी यांनी, “माझ्याविरुद्ध करण्यात येणारे आरोप हे वस्तुस्थितीशी विसंगत असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय द्वेषातून माझी प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा आरोप केला.
यावेळी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विकासकामे, प्रशासन आणि विविध स्थानिक मुद्द्यांवर गंभीर आरोप केले. तसेच जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेनंतर अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, दोन्ही नेत्यांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मांडलेले दावे असून, संबंधित आरोपांवर आमदार अनिल पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत उपलब्ध झाली नव्हती. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.



दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये संताप; एन.मुक्टो.कडून काळ्या फिती लावून तीव्र निषेध
अमळनेर | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवित विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली.
महाविद्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनात प्राध्यापकांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचा निषेध केला. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी, “शांततापूर्ण आंदोलन करणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक आणि लोकशाही अधिकार असून, त्यावर अशा प्रकारे निर्बंध आणणे किंवा दडपशाही करणे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
तर एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील यांनी, “विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर हिंसात्मक कारवाई करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे सांगितले.
यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवान भालेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, प्रा. डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात अमळनेरमध्ये झालेल्या या निषेध आंदोलनातून लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली.




