अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 hours ago
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
Top 10 News
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका; आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे दोन तास जीवावर उदार बचावकार्य

अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहराची धडकी भरली. नाल्याला आलेल्या प्रचंड पुरामुळे एका घरात अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व शर्थीच्या बचाव मोहिमेमुळे सर्व कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीलगतच्या नाल्याला अचानक पूर आला. काही क्षणांतच परिसरात छातीएवढे पाणी साचले आणि एका घरात पाणी घुसल्याने कुटुंबीय पूर्णपणे अडकून पडले. घरामध्ये एक महिन्याचे चिमुकले बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय असे अनेक जण जीव मुठीत धरून उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते.
घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी धावून पोहोचले.
पुराच्या पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळी तयार करून बचाव पथकाने तब्बल दोन तास जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यातून मार्ग काढत अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
या बचाव मोहिमेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना सुरक्षितपणे जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या धाडसी आणि वेळेवर पार पडलेल्या बचाव मोहिमेमुळे एक संपूर्ण कुटुंब नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आरोग्य विभाग व अग्निशमन दलातील किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांच्या धैर्य, तत्परता आणि सेवाभावाचे शहरभरातून कौतुक होत आहे.
पुराच्या संकटात जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी बचावकार्यामुळे अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे.



अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी

अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याला अक्षरशः जलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधार पावसामुळे बोरी नदीला महापूर आला असून नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्य, अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचेही नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
बोरी नदीने धोक्याची पातळी गाठली
सततच्या पावसामुळे बोरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदीपात्रात किंवा पुलांवर जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शाळा, महाविद्यालये, व्यापारी आस्थापने आणि दैनंदिन व्यवहारांवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे.
प्रशासन सतर्क
महसूल, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.



अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
अमळनेर | प्रतिनिधी
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सन्मान अभियान” अंतर्गत शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीपाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला.
शिबिरात उपविभागीय अधिकारी, मयूर भंगाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक, कोते तहसीलदार, रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती तसेच महसूल, ग्रामविकास, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, समाजकल्याण, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या समाधान शिबिरात महसूल, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांची जागेवरच सुनावणी करून अनेक प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर सेवानिवृत्त शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करणारे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




