विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 28 minutes ago
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 35 minutes ago
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
जवखेडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन जनजागृती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
जवखेडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन जनजागृती
नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अमळनेर : अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांच्या मालकीच्या हॉटेल पायलच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश बिराडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण व भिका संतांची यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
सकाळच्या वेळेत गोडाऊनला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने वेळ न दवडता केलेल्या जलद कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील समजू शकला नसून, संबंधित विभागाकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



भारतीय सैनिकांच्या मनोधैर्यासाठी अमळनेरमध्ये ‘आप’चा अनोखा उपक्रम; १००० हून अधिक विद्यार्थ्यांचे ‘भाऊ-बहीण’ म्हणून दिलेले प्रेम १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाला थेट जवानांपर्यंत पोहोचणार!
अमळनेर:भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन या पवित्र सणांचे औचित्य साधून अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी एक अत्यंत अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांमधील तब्बल १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या त्यागावर व धैर्यावर आधारित निबंध आणि पत्रलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आपले जवान सीमेवर अत्यंत बिकट परिस्थितीत अहोरात्र जागून देशाचे संरक्षण कसे करतात, त्यांच्या या त्यागामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांच्या लेखणीतून पाझरला देशप्रेमाचा सोहळा
या निबंध व पत्रलेखन स्पर्धेत अमळनेर शहरातील कन्या शाळा, साने गुरुजी हायस्कूल, जी. एस. हायस्कूल आणि के. डी. गायकवाड हायस्कूल या शाळांमधील इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भाग घेतला. जवानांच्या संघर्षाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या. “तुमच्यामुळेच आमचा प्रत्येक दिवस सुरक्षित आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
रक्षाबंधन व १५ ऑगस्टलाच सैनिकांना मिळणार विद्यार्थ्यांची ही अनोखी भेट!
विद्यार्थ्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने लिहिलेले हे सर्व निबंध आणि भावुक संदेश रक्षाबंधन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) थेट सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. “एक भाऊ-बहीण म्हणून आम्ही पाठवलेली ही छोटीशी भेट” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हे संदेश लिहिले आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना स्वातंत्र्यदिनी आणि रक्षाबंधनालाच आपल्या देशातील तरुण पिढीचे हे प्रेम व पाठिंबा मिळाल्याने त्यांचे मनोबल नक्कीच द्विगुणित होईल.
आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.



विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
अमळनेर : विश्व हिंदू परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अमळनेर येथील डॉ. संजय शाह यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मितेश कामदार यांची जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर संघटनेने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या कार्याचा अनुभव, संघटनात्मक क्षमता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
या नियुक्तीचे अमळनेर शहर व परिसरातील विश्व हिंदू परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या नियुक्तीमुळे अमळनेरच्या सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




