अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर एसटी आगारात अत्याधुनिक ५ नव्या बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधांचा प्रवास!
अमळनेर : अमळनेर एसटी आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ५ नव्या बसेसची भर पडली असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
अशोक लेलंड कंपनीच्या या नवीन बसेस ३ बाय २ आसनरचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसने उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, बसच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, माईक प्रणाली, बॅक कॅमेरा, एअर सस्पेन्शन तसेच बीएस-६ मॉडेलचे अत्याधुनिक इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसोबतच अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
अमळनेर आगाराने आणखी ५ नवीन बसेसची मागणी केली असून, त्या मंजूर व्हाव्यात यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वीही त्यांच्या प्रयत्नांतून अमळनेर आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या होत्या. या नव्या बसेसच्या समावेशामुळे अमळनेर आगारातील एकूण बसेसची संख्या आता ७५ वर पोहोचली आहे.
लोकार्पणानंतर आमदारांनी केली बस सवारी
लोकार्पणानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह नव्या बसमध्ये प्रवास करून बसेसची पाहणी केली. यावेळी उपस्थितांनी नव्या बसेसचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.
पंढरपूर यात्रेसाठी एसटीला मोठी पसंती
सध्या पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी आषाढी महोत्सवानिमित्त एसटी सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज ३ ते ४ बसेस पंढरपूरकडे रवाना होत असून, ग्रामीण भागातून ४० ते ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रवाशांना शासनाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सवलतींचाही लाभ दिला जात आहे.
याशिवाय पंढरपूर यात्रेसाठी अमळनेर आगारातून १२ बसेस इतर आगारांकडे उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.
लोकार्पण सोहळ्यास कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाऊंटंट अमोल पाटील तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



“अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”
अमळनेर : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या शेतकरी रूपातील बैलगाडी हाकतानाच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रेरणा स्मारकाचे जयंतीनिमित्त लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या स्मारकाचे पूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, “अजितदादांचे हे प्रेरणा स्मारक केवळ पुतळा नसून शेतकऱ्यांसाठी कष्ट, धैर्य, वक्तशीरपणा आणि विकासाची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. येणाऱ्या पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे हे स्मारक कायम प्रेरणादायी राहील.”
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाच्या पुढाकारातून हे स्मारक साकारण्यात आले आहे. शेतकरी रूपातील बैलगाडीवर स्वार असलेल्या अजितदादा पवार यांच्या प्रतिमेमुळे ग्रामीण जीवनाशी असलेली त्यांची नाळ अधोरेखित करण्यात आली आहे.
याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने ‘बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले. या केंद्रातून केवळ शासकीय शुल्कात विविध ऑनलाइन योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे उद्घाटनही आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात सभापती अशोक पाटील म्हणाले की, “अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांच्या विचारातून आणि आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे प्रेरणा स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच बाजार समितीच्या बांधकामाधीन व्यापारी संकुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याचाही मानस आहे.”
या सोहळ्यास सौ. जयश्री पाटील, अशोक पाटील, सुरेश पिरन पाटील, संभाजी पाटील, गणेश भामरे, सचिन पाटील, सुषमा देसले, भोजमल पाटील, समाधान धनगर, भाईदास भिल, डॉ. अनिल शिंदे, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश अमृतकार, रणजित शिंदे, भागवत पाटील, चेतन राजपूत, प्रा. मंदाकिनी भामरे, रिता बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, कविता पवार, शोभाताई गढरे, सुरेश विक्रम पाटील, एल. टी. पाटील, राजू फापोरेकर, जितू ठाकूर, विजय पाटील, मुख्तार खाटिक, हेमंत पवार, जितेंद्र झाबक, निलेश भांडारकर, अनिल अहिरराव, दिनेश शेलकर, अलीम मुजावर, गौरव पाटील तसेच सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रणजित शिंदे यांनी मानले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उभारण्यात आलेल्या या शेतकरी प्रेरणा स्मारकामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.


Read More “अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”
“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता “लावलेले प्रत्येक झाड जगलेच पाहिजे” हा दृढ संकल्प करत जयनिल फाउंडेशनने अमळनेर शहरात भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाची सुरुवात केली आहे. “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” हा संदेश देत फाउंडेशनने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा दाखवली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अमळनेर शहर अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावे, तसेच भावी पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण लाभावे या उद्देशाने शेकडो वृक्ष लागवडीचा संकल्प जयनिल फाउंडेशनने केला आहे.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणानंतर झाडांची जबाबदारी स्वीकारणे. अनेक ठिकाणी झाडे लावली जातात; मात्र त्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन जयनिल फाउंडेशनने प्रत्येक वृक्षासाठी ट्री गार्ड, वेळोवेळी खत, आवश्यकतेनुसार पाणी आणि नियमित निगा राखण्याचा निर्णय घेतला असून झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
यावेळी जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे खरे रक्षण करायचे असेल तर केवळ वृक्षारोपण करून उपयोग नाही, तर प्रत्येक झाड जगवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आमचा भर केवळ लागवडीवर नसून वृक्षसंवर्धनावर आहे. या पावसाळ्यात अमळनेर अधिक हिरवेगार करण्यासाठी आम्ही व्यापक वृक्षलागवड आणि संगोपन मोहीम राबवणार आहोत.”
यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले. “आज जिवंत ठेवलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या वृक्षारोपण अभियानात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलिस काँस्टेबल सुनिल पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील, पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शहरभरातून या उपक्रमाचे कौतुक होत असून “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा प्रभावी संदेश देणारा जयनिल फाउंडेशनचा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील आणि दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या या अभियानामुळे अमळनेरच्या हरित भविष्यास नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
Read More “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

