डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 hour ago
दोन दिवसांपासून सारबेटे बुद्रुक अंधारात; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 20 hours ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. याच उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), जळगाव जिल्हा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी डी. ए. धनगर, भैय्यासाहेब मगर, पुष्पा भोजू पाटील, अनिता सौंदाणे, समाधान देविदास निकम आणि जावेद अख्तर शेख हबीब या कर्तृत्ववान शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रज्जाक शेख आणि संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून, भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजाचे शिल्पकार आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कार्याचा तसेच NSUIच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व संघटनात्मक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमास धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, पी. एस. बागुल, सत्तार तेली, प्रताप पाटील, गजेंद्र साळुंखे, एस. डी. देशमुख, उमेश संदानशिव, रोहिदास कपडे, रोहिदास दाजी, ताराचंद सूर्यवंशी, नरेश चव्हाण, भगवान संदानशिव, अजय भिल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि समाजनिर्मितीच्या कार्याचा सन्मान आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांचे NSUIच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांची जबाबदारी; संघटन विस्तारासाठी सक्रिय कार्य करण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने राज्य संघटक श्री. किशोर रायसाकडा व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश विसपुते यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
प्रा. डॉ. गाढे यांनी खान्देश विभागात पत्रकारिता क्षेत्रासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संघटनात्मक वाढीसाठी व विस्तारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे व नियमावलीचे पालन करून उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे वाढविणे, पत्रकार बांधवांना संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करणे तसेच संघटनेचा विस्तार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या अनुभवाचा, कार्यक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा संघटनेच्या भविष्यातील वाटचालीस निश्चितच लाभ होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री. किशोर रायसाकडा यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी राज्य समन्वयक संजय जी. भोकर, राज्य अध्यक्ष नितेश सोमाणी, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोठे आणि राज्य संघटक किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
जळगाव | प्रतिनिधी
डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले.
सत्रादरम्यान स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.
ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.
यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

