रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेरचे आध्यात्मिक वैभव आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आता शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने आणि राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने मंदिराचे भव्य-दिव्य नवनिर्माण करण्यात येईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मंदिर परिसराच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.
मंदिराला भेट दिल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी थेट भडगाव येथे वारीमध्ये सहभागी होत परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेतली. यावेळी मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मंदिराचे विश्वस्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रद्धास्थानाचे वैभव पूर्ववत करण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर पाठपुरावा
मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिर हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र स्थळाचे नवनिर्माण अत्याधुनिक सुविधा आणि पारंपरिक वास्तुशैली जपत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
विश्वस्त मंडळासोबतही पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. दुर्घटनेच्या वेळी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आमदारांनी अग्निशमन विभागाचे विशेष कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत प्रसाद महाराजांशी थेट संवाद; पुनर्बांधणीसाठी शासनाची ठाम भूमिका
दुर्घटनेमुळे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना या घटनेमुळे दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधताना दिली.
भडगाव येथे आमदार अनिल पाटील हे महाराजांच्या भेटीस गेले असताना त्यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराजांशी थेट संवाद साधत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांकडे ₹१५ कोटींच्या विशेष निधीची मागणी
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधिमंडळातही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपत्कालीन निधीची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन या विषयावर सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर परमपूज्य संत प्रसाद महाराज म्हणाले, “साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो वारकरी भक्तांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नाही. मंदिराचे वैभव पूर्ववत उभे राहील, असा पूर्ण विश्वास आहे.”
महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील दिंडीकडे मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Read More विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा
अमळनेरकरांना शुद्ध पाण्याची मोठी भेट! वर्षानुवर्षे प्रलंबित जलकुंभ स्वच्छतेचा धडाका; नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेच्या कामाला अखेर वेग आला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून जलकुंभ स्वच्छतेची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभाची यशस्वी साफसफाई पूर्ण करण्यात आली असून, आता तांबेपुरा येथील जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. यानंतर शहरातील उर्वरित सर्व जलकुंभ टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ
शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या मोहिमेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांची ‘आरोग्य प्रथम’ भूमिका
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलकुंभ स्वच्छता मोहिमेस तातडीने मंजुरी दिली. “शहरवासीयांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही,” या भूमिकेतून त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत कामाला गती दिली.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे नियोजन
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवत जलकुंभ स्वच्छतेचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
दिलेला शब्द पाळला; कैलास नामदेवराव पाटील यांच्यावर नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव
नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व जलकुंभांची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी प्रथम कोर्टमागील जलकुंभाची साफसफाई पूर्ण केली आणि आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून दिलेला शब्द खऱ्या अर्थाने पाळला आहे.
तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे स्वागत करत जाहीरपणे आभार व्यक्त केले. “काम असावे तर असे!” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
जलस्रोतांच्या नियमित स्वच्छतेमुळे शहरवासीयांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नगरपरिषदेची ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.


महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त अमळनेरमध्ये वर्षभर ‘विशेष वक्ता’ उपक्रम महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर; प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र, बक्षीस व सन्मान
अमळनेर, प्रतिनिधी : “गुलामगिरीतून मुक्त व्हा” असा क्रांतिकारी संदेश देणारे समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त (2026–2027) युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने वर्षभर ‘विशेष वक्ता’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम 5 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे.
एप्रिल 2027 पर्यंत प्रत्येक रविवारी महात्मा फुले यांच्या जीवनकार्य, सामाजिक क्रांती आणि विचारांचा अभ्यास करून त्यावर आधारित 10 मिनिटांचे प्रभावी मनोगत सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागीचा विशेष प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा नसून पहिलीतील विद्यार्थ्यांपासून ते 90 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची अमळनेर तालुक्यात ‘विशेष वक्ता’ म्हणून नोंद करण्यात येणार असून, भविष्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून संधी उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दर रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत ‘अभ्यासिका’, प्रा. अशोक पवार, 28, विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथे उपस्थित राहावे. या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9422278256



