अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न
तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ₹२५ लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने धार व मालपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे. रस्ते, पाणी व वीज या सुविधा सक्षम केल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होत नाही. धार–मालपूर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना वर्षभर सुलभ व सुरक्षित प्रवास करता येईल.”
या समारंभास धार व मालपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
ग्रामस्थांच्या वतीने आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेती उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन व्यवहारांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी, धार व मालपूर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान
अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथे आज दि १७ रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान शॉटसर्किट मुळे सुमारे साडेतीन बिघे जमिनीवरील मक्याला आग लागून सुमारे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.
टाकरखेडा येथील शेतकरी कैलास आत्माराम पाटील यांच्या साडेतीन बिघे शेतातील मका दुपारी शॉट सर्किट मुळे जळून खाक झाला आहे त्या ठिकाणी शेतकरी नितीन कैलास पाटील,अमोल संजय पाटील, सतीश सुरेश पाटील,मनोहर विश्वास पाटील,संजय शिवाजी पाटील आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.त्यानंतर महावितरण कंपनीचे सखाराम भिल,पंकज पाटील,तलाठी प्रफुल्ल पाटील,कृषिसहाय्यक श्री. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचे फोटो काढले.
सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी कैलास पाटील व गावकऱ्यांनी केली आहे.
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा
टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश
अमळनेर:-तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवरही गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला गती देण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
सदर बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. तसेच समिती सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आपल्या भागातील अडचणी मांडल्या, त्यावर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक म्हणजे केवळ आढावा नव्हे, तर शेतकरी व ग्रामीण विकासासाठी घेतलेली ठोस दिशा देणारी पावले असल्याचे स्पष्ट झाले.
सदर बैठकीत मयूर भंगाळे (उपविभागीय अधिकारी अमळनेर), रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर), डॉ.उल्हास देवरे (तहसीलदार पारोळा), एन.आर पाटील (गटविकास अधिकारी अमळनेर), विजयकुमार देवरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख पारोळा), भूषण कदम (गटविकास अधिकारी पारोळा), नीना बाविस्कर (सा.का अधिकारी पारोळा), वैशाली जडे (शाखा अभियंता पंचायत समिती पारोळा), आकाश भाई (ए.पी.ओ पंचायत समिती पारोळा), एस.एस खर्डे (विस्तार आधिकारी पंचायत समिती अमळनेर), डी.जी जाधव (मं.कं अ पारोळा), प्रकाश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक अमळनेर- एस डी पी ओ कार्यालय), महेश जाधव (सहायक म.अधिकारी पारोळा), ए.जे.परदेशी (सहाय्यक म. अधिकारी अमळनेर), जितेंद्र बुवा (ए.पी ओ रोजगार हमी योजना पारोळा), वाय.ए.वंजारी (उप कृषी अधिकारी अमळनेर), ए.आर कोठावदे (उप कृषी अधिकारी अमळनेर ), एस.पी.गावित (उपअधीक्षक भूमी अभिलेख अमळनेर), एस.बी.देसले (आर.एफ.ओ पारोळा), एम.डी चव्हाण (एच.क्यू.ए), एच.के.पाटील (उपअभियंता बां.वि. जिल्हा परिषद अमळनेर), पी.ए.पाटील (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), गांगुर्डे साहेब (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), एस.व्हि.पाटील (ज्युनिअर इंजिनिअर पीडब्ल्यूडी पारोळा) इत्यादी अधिकारी वर्गासह अनिल सिसोदे (समिती सदस्य), रिता बाविस्कर (समिती सदस्य), गौरव उदय पाटील (समिती सदस्य), चेतन काशिनाथ पाटील (समिती सदस्य), महारु आत्माराम पाटील (ग्रामस्थ), सुरेश देवचंद पाटील (ग्रामस्थ), ललित भूपेंद्र बाविस्कर (ग्रामस्थ) आदी उपस्थित होते.
दरम्यान शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणी टंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

