“एक पेड माँ के नाम” उपक्रमातून हरित अमळनेरचा संकल्प; रोटरी क्लबच्या वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 hours ago
पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून रु. ७५ लाख १८ हजारांचे (५० टक्के) अनुदान उपलब्ध होणार असून, उर्वरित निधी बाजार समितीकडून उभारला जाणार आहे.
राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदानाची रक्कम दोन समान हप्त्यांत वितरित करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्या मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जातील. बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच शेतकरी भवनाचा देखभाल-दुरुस्ती खर्च, वीज, पाणी, मनुष्यबळ व इतर सर्व खर्च संबंधित बाजार समितीनेच उचलायचा असून, त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी मिळणार नाही.
या शेतकरी भवनासोबत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ देखील राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रति भोजन ४० रुपयांचे अनुदान मिळणार असून, बाजार समितीच्या सहभागातून शेतकऱ्यांना केवळ नाममात्र ५ रुपयांत भोजन उपलब्ध होणार आहे. याशिवाय शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी पुरुष, महिला तसेच हमाल-मापाडी यांच्यासाठी मुक्काम, विश्रांती आणि आवश्यक मूलभूत सुविधांचीही व्यवस्था या भवनात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये अमळनेरचा समावेश झाला आहे. पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबत समाधान व्यक्त करताना अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांनी सांगितले की, *”सातत्यपूर्ण तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या दीड कोटींच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्काम, विश्रांती, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. या कामासाठी पणन मंत्री ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”
या प्रकल्पाबद्दल सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील तसेच संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी शेतकरी भवनाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read More अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर
“एक पेड माँ के नाम” उपक्रमातून हरित अमळनेरचा संकल्प; रोटरी क्लबच्या वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर | प्रतिनिधी
वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत रोटरी क्लब अमळनेर यांच्या पुढाकाराने “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण अभियान २०२६ मोठ्या उत्साहात पार पडले. वृक्षसंवर्धन, हरित अमळनेर आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट अमळनेर, पर्यावरण सखी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील आणि वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त केकऐवजी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी आपल्या सुप्रसिद्ध “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या संगोपनासाठी भेट दिले. हे सेंद्रिय खत वृक्षांची वाढ अधिक जोमदार व निरोगी होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी “एक पेड माँ के नाम” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले आणि रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
या अभियानात विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया!” हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.



पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
अमळनेर :- शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसर तसेच संपूर्ण अमळनेर शहरावर शोक कडा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत पावलेल्या मुलांची नावे अनुक्रमे मानव बंटी रत्नांनी, कार्तिक विकी उधवानी, आणि दिनेश विजय पंजवानी अशी आहेत. आज दुपारच्या सुमारास हे तिघेही मित्र खदानित एकत्र पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.




