भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 4 hours ago
ट्रेंडीग
बातम्या
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा; शहरासह परिसरातून उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग घेत सामाजिक ऐक्य आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला.
स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI काकडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदनशिव, सिद्धार्थ शिसोदे तसेच पत्रकार किरण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत युवक, युवती आणि विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पुरुष गटात नाशिकच्या तेसज सपकाळे यांनी उत्कृष्ट धाव करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगावचे खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप उमटवली. विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५००० आणि ३००० रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
महिला गटातही स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. उन्नती पाटील यांनी प्रथम, आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्यासह अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप सदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी सहकार्य केले.
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता नगराळे, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणारे प्रभावी व्यासपीठ ठरली.
भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भगवान महावीर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा सहभाग
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेंटर, युवती सभा आणि आई जिजाऊ अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान परीक्षा उत्साहात संपन्न झाली. भगवान महावीर, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.

सकाळी १० ते ११:३० या वेळेत पार पडलेल्या या परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ज्ञानस्पर्धेला रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, रेक्टर डॉ. अमित पाटील, डॉ. माधव भुसनर, प्रा. भानुदास गुलाले व डॉ. आर. सी. सरवदे यांच्या हस्ते पूजन पार पडले.
यावेळी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या कार्यालयातही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेमक्या वेळेत सामान्य ज्ञान परीक्षेला सुरुवात झाली. कार्यक्रमास सीसीएम प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. धनंजय चौधरी, प्रा. सुनिल पाटील, प्रा. पंकज तायडे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रवी बाळसकर, डॉ. अनिल झळके, डॉ. रामदास सुरळकर, प्रा. दिपक कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बालाजी कांबळे, दिलीप शिरसाट, पराग पाटील, प्रा. हिमांशू गोसावी, विशाल अहिरे, डॉ. राखी घरटे, प्रा. इशिता घोष आणि तुषार संजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी रुपये १०००, द्वितीयसाठी ७०० आणि तृतीयसाठी ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सीसीएमसी विभागात होणार असून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ! जनतेचा आवाज आता आणखी बुलंद!
“आवाज जनतेचा, जागर सत्याचा” — लोकजागर न्यूजसोबत नव्या पर्वाची सुरुवात!
प्रिय वाचकहो, सस्नेह नमस्कार
गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. 2001 साली पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथे पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर अमळनेर येथे विविध दैनिकांमध्ये काम केले तसेच दोन वर्षे स्वतःचे साप्ताहिक यशस्वीपणे चालविले.
काही वैयक्तिक कारणांमुळे पत्रकारितेतून थोडा काळ विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा नव्या उर्जेने, नव्या जोमाने लेखणी हातात घेत आहे.
“लोकजागर न्यूज” या वेब पोर्टलच्या माध्यमातून मी पुन्हा आपल्यासमोर येत आहे.
जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सत्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून (14 एप्रिल 2026)
“लोकजागर न्यूज” या ऑनलाईन वेब पोर्टलचा शुभारंभ करत आहोत.
काही वर्षांच्या खंडानंतरही, तीच जिद्द, तोच उत्साह आणि काहीतरी वेगळं करण्याची तीच धडपड!
सामाजिक बांधिलकी जपत, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता आम्ही सातत्याने करत राहू.
“लोकजागर” च्या माध्यमातून तुमचा आवाज देशभर पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.
धन्यवाद!
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत…
हृदयनाथ मोरे
मुख्य संपादक
लोकजागर न्यूज


