अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
अमळनेर :- शहरात पोलिसांनी दोन जुलै रोजी पहाटे मोठी कारवाई करत कोंबिंग ऑपरेशन राबवून वॉन्टेड आरोपी, गुटखा विक्रेते, गावठी दारू विक्रेते यांच्याविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत बारा वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली असून गावठी दारू गुटखा यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद ककाळीज, भगवान शिरसाट, कविता ठाणगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र वलाटे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत तीन आरसीपी पथके, अमळनेर डिबीचे 50 कर्मचारी, उपविभागातील 30 कर्मचारी, एलसीबी चे बारा कर्मचारी तसेच चोपडा येथील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पहाटे शाळेतील ते सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी 110 गुन्हेगारांच्या घरांची तपासणी केली त्यापैकी 70 गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आढळून आले. त्यातील 52 जणांची माहिती नोंदवून त्यांना ताकीद देण्यात आली. न्यायालयात गैरहजर असलेल्या सहा आरोपींना अटक वॉरंट बजावून ताब्यात घेण्यात आले तर बारा वॉन्टेड आरोपींनाही अटक करण्यात आली. तसेच फरशी रोड परिसरातील आकाश बाबुलाल सोनवणे (20) याच्याकडून वीस हजार रुपयांचा तर सिंधी कॉलनीतील सुगनामल किसनचंद बठे जा (75) याच्याकडून सुमारे 60 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
दरम्यान साने नगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, चांदणी कुऱ्हे, कंजरवाडा, पिंपळी, पैलाड या भागातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून सुमारे सव्वा लाख रुपयांची गावठी दारू व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच हातभट्ट्याही उध्वस्त करण्यात आल्या.
दरम्यान शहरात पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून शहरातील काही भागात सुरू असलेल्या अवैध धंदे, सट्टा मटका, यांच्यावरही कारवाई करून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत वेधले शासनाचे लक्ष
अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह तथा महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले.
अमळनेर शहरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे व सुमारे 250 वर्षांची परंपरा असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान उत्तर महाराष्ट्रात प्रचलित असून संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर वारकरी संप्रदायाचा झेंडा महाराष्ट्रभर फिरवीत असतात.
याच पवित्र वाडी मंदिरात दिनांक 1जुलै च्या रात्री आगीची दुर्दैवी घटना घडली असून यात मंदिरातील सुमारे 250 वर्षाचे गाभाऱ्याचे वैभव जळून नष्ट झाले आहे.सुदैवाने मंदिर व देव सुरक्षित राहिले आहेत.तरी देखील सुमारे 15 कोटी पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.या घटनेमुळे मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद करण्यात आले आहे.
परंतु याच महिन्यात 25 जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी महोत्सव असून अमळनेरचे हे वाडी मंदिर प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असल्याने आषाढीला हजारो भाविक विठ्ठल रुखमाई च्या दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे लवकरात लवकर या मंदिराचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे.
मंदिर संस्थानचे झालेले नुकसान,आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धा लक्षात घेता.मंदिर संस्थानची तातडीने पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी याचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पुर्ण करून पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून याचा तातडीने तीर्थक्षेत्र विकास मध्ये समावेश करावा आणि तसा प्रस्ताव शासनाकडे तातडीने मागवावा अशी विनंती आ.अनिल पाटील यांनी केली.


अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
अमळनेर :- आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शरीरातील पिंपळे रस्त्यावरील देशमुख नगर एक व दोन समोरील नवीन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण देशमुख नगर परिसर जलमय झाला असून नवीन रस्ता तयार झाल्यामुळे या रस्त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय नाही, रस्त्याचा उतार व्यवस्थित नाही. या रस्त्याचे काम नियोजन शून्य झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पाऊस पडल्यावर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी येथील रहिवासी एन एस पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.
देशमुख नगर, पिंपळे रोड येथील नवीन रस्त्याचे बांधकाम झाल्यामुळे उर्वरित कॉलनीत साठलेलं पावसाचे पाणी घरापर्यंत येत असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. वयोवृद्ध नागरिक व लहान मुले यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.



