Top 10 News
🏆 राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्काराने ग्रामपंचायत गांधलीचा गौरव
हॉटेल चिन्मय ला लागली आग, शेतातील चारा जळून खाक
अमळनेर तालुक्यात उष्णतेचा कहर पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू : प्रशासन सतर्क
अमळनेर नगरपालिकेचा पाणीपुरवठा उशिराने होणार
पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
🏆 राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्काराने ग्रामपंचायत गांधलीचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत गांधली यांनी शासनाच्या महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023-24 मध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” या गटात तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या या यशामुळे संपूर्ण अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सातारा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री शंभूराज देसाई, माननीय उदयनराजे भोसले व माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री एन. आर. पाटील, ग्रामपंचायत गांधलीचे प्रथम नागरिक तथा आदर्श सरपंच श्री भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रमोद पाटील, श्री गुणवंत सोनवणे व श्री नितीन पाटील उपस्थित होते.
ग्रामपंचायत गांधलीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच श्री भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रमोद पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावाच्या विकासासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली ही राज्यस्तरीय पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी साहेब तसेच प्रकल्प संचालक लोखंडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
गृह संकुल उभारणीच्या कार्यात ग्रामपंचायत गांधली येथील लाभार्थी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, घरकुल कक्षातील अभियंते व ऑपरेटर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या एकजुटीच्या व सामूहिक प्रयत्नांच्या बळावरच ग्रामपंचायत गांधलीला राज्यस्तरावरील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हॉटेल चिन्मय ला लागली आग, शेतातील चारा जळून खाक
अमळनेर ( प्रतिनिधी) शहराबाहेरील धार मारवड रस्तावरील चिन्मय हॉटेलच्या मागील शेतात आग लागल्याने शेतातला काढलेला गहू, मका जळून खाक झाला आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने चिन्मय हॉटेलला देखील आग लागली. तेथील मोठ्या झाडांना ही आग लागली. हॉटेलची आग विझविण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले मात्र वारा सुरू असल्याने शेतातील गहू चाऱ्याची आग जोरात पसरत होती. माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी हॉटेलचे मालक श्याम बागुल यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांनी तात्काळ तिन्ही अग्निशमन बंब रवाना केले. कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जाफर पठाण, वासिम पठाण, आनंदा झिंबल, सत्यम संधनशिव, मच्छिंद्र चौधरी, भिका संधनशिव, आकाश बाविस्कर, आकाश संधनशिव, अजय बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न करून केशवनगर पर्यंत गेलेली आग नियंत्रणात आणली.



