एन.एम.एम.एस. परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झळाळता यशस्वी ठसा
general Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
general Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
Featured 50_aachonline.org_txt general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
तहसीलदारांच्या नावाने मागितली लाच रंगेहात दोघे जेरबंद
एन.एम.एम.एस. परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झळाळता यशस्वी ठसा
अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
तहसीलदारांच्या नावाने मागितली लाच रंगेहात दोघे जेरबंद
अमळनेर :- तालुक्यात तहसीलदारांच्या नावाने पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी रंगेहात पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा गौण खनिज ( वाळू ) वाहतुकीचा व्यवसाय असून, मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून दोन ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी आरोपी रामराव हरचंद पाटील( वय 64, रा. लोन पंचम, ता. अमळनेर) व जितेंद्र राजेंद्र पाटील( वय 26 रा. झाडी, पोस्ट शिरसाळे, ता. अमळनेर) यांनी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने प्रत्येक ट्रॅक्टर मागे पंचवीस हजार रुपये अशी एकूण 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपींनी लाचेची मागणी कायम ठेवली त्यापैकी 25 हजार जितेंद्र पाटील यांनी पंचा समक्ष स्वीकारले. त्यावेळी पथकाने त्यांना रंग हात पकडले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वात पार पडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करीत आहेत.
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
जळगाव, दि. 27 एप्रिल (जिमाका) — “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” हे अभियान केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. जळगाव जिल्ह्याने या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धेला चालना दिली जाणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे निर्देश देताना सांगितले की, आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक संस्थांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान जनआंदोलनात रूपांतरित करणे आवश्यक आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर कोणतीही तडजोड न करता विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर ठोस काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
🔥 उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्माघात (हीट स्ट्रोक) व डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गावोगावी दवंडी देऊन जनजागृती करण्याचे निर्देश देताना त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी व सायंकाळीच करावीत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या अभियानाच्या यशासाठी लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवा अधिक गतिमान करून ती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सरपंच प्रतिनिधी म्हणून सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत ग्रामस्तरावर अभियान राबविण्याच्या अनुभवांची माहिती दिली.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) भाऊसाहेब अकलादे, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन भूषण क्षत्रिय यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रमेश धापते यांनी केले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण आरोग्य उन्नतीसाठी राबविण्यात येणारे हे अभियान प्रभावीपणे राबल्यास जळगाव “आरोग्य संपन्न” जिल्हा म्हणून राज्यात आदर्श ठरणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे मुख्यमंत्री सहायता निधीच्या महा आरोग्य शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न
जळगाव, दि. 28 (जिमाका) — शहरात आयोजित करण्यात येणारे महा आरोग्य शिबिर हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून कार्य करावे, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन व सामंजस्य कराराबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दीपमाला काळे, सुरेश भोळे, तसेच निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीस मुख्यमंत्री सहायता निधी संलग्नित रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मदाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी मागील वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच यापूर्वी आयोजित महा आरोग्य शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीचा अनुभवही त्यांनी मांडला.
आमदार सुरेश भोळे यांनी हा उपक्रम शासकीय असला तरी सर्वांनी एकत्रितपणे टीमवर्कच्या माध्यमातून राबविणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व संसाधने आणि पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी केले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणाऱ्या महा आरोग्य शिबिरामुळे आरोग्य सेवांचा लाभ अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याचे चित्र आहे.


