खा शि मं. श्रीमती द्रौ ,रा. कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस साजरा …
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा
अमळनेर :- तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गडखांब – पातोंडा – धरणगाव या मार्गांच्या काँक्रिटीकरण आला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची मागणी केली जात होती.
हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी च नाही तर उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या प्रकल्पामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शेतमालाची वाहने तसेच प्रवासी वाहतूक होत असते. हा रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर असून आता धरणगाव फाटा ते अमळनेर या महत्त्वाच्या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे – अमळनेर- चोपडा तसेच धरणगाव कडे जाणारा मार्ग अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकरी व उद्योजकांना होणार फायदा
अमळनेर आणि परिसरातील केळी, कापूस, मका, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण होणार आहे. शेतमाल बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांना वेळ व वाहतूक खर्च वाचणार आहे. तसेच दर्जेदार रस्त्यांमुळे या भागात औद्योगिक मालवाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना गती मिळून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सदर प्रकल्पाकडे उत्तर महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Read More अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा
अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत
अमळनेर:-येथील ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाले असल्याने 20 अतिरिक्त पदाना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून यामुळे 4 तज्ञ डॉक्टर व इतर स्टाफ वाढून येथील आरोग्य सेवा अधिक वृद्धिंगत होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश दिनांक 24 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाला असून यात राज्यातील काही रुग्णालयांचा समावेश आहे.राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित अथवा श्रेणी वर्धीत आरोग्य संस्था करिता पदनिर्मिती करण्यात आली असून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर याचे बांधकाम देखील 90 टक्के पूर्ण झाले असल्याने या पद वाढीस मंजुरी मिळाली आहे.विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर ही पद वाढ झाली आहे.
चार अतिरिक्त डॉक्टरांमुळे रुग्णांना मिळणार लाभ
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आधी एकूण 29 पदे होती त्यात एक वर्ग 1 चे वैद्यकीय अधीक्षक 1,वर्ग 2 चे 3 वैद्यकीय अधिकारी आणि इतर स्टाफ चा समावेश होता.आता 20 पदे वाढली असून त्यात 4 डॉक्टर असतील यात 1 सर्जन, 1 फिजिशियन आणि 2 एमबीबीएस डॉक्टर्सचा समावेश असेल याशिवाय इतर नर्सिंग व अन्य कर्मचारी असतील.सदर रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कंत्राटी 20 आहेत आधीची आहेत.म्हणजेच आरोग्य सेवेची मोठी टीम अमळनेर रुग्णालयात कार्यरत असणार आहेत.
दरम्यान अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालयात रूपांतर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी पाठपुरावा केल्याने त्यास यश आले त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम देखील सुरू होऊन तेही पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.व आता आमदारांच्याच प्रयत्नांनी पदे देखील वाढल्याने अमळनेर परिसरातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.याकामी पाठपुरावा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश ताळे व इतर स्टाफ चे सहकार्य लाभल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. सदर मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार,आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.


आरोप प्रत्यारोप पुरे झाले, आता कृती हवी! अमळनेरच्या पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करा: आम आदमी पार्टीची मागणी
अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यापेक्षा तात्काळ सोडवून शहरातील सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची त्वरित स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे यांनी केली आहे.
शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या तळाशी साचलेला एक फुटाचा गाळ हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. “आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा पिण्याच्या पाण्याची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट करत, आपच्या कार्यकर्त्यांनी आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. टाक्या पूर्ण भरल्यावर त्यात मिसळणारा गाळ, क्षार आणि जंतू यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
प्रशासनासमोर ठोस उपाययोजनांची मागणी:
१. तात्काळ स्वच्छता: सर्व पाणी साठवणूक टाक्यांचे तांत्रिक ऑडिट करून त्यांची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी.
२. नियमित वेळापत्रक: वर्षातून एकदाच नव्हे, तर दर तीन महिन्यांनी नियमितपणे टाक्या स्वच्छ करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.
३. पारदर्शकता: ही स्वच्छता शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याची खात्री स्थानिक नागरिकांच्या समितीमार्फत करून घ्यावी.
आमचा निर्धार:
आम्हाला कोणावरही आरोप करण्यात रस नाही, तर जनतेला स्वच्छ पाणी मिळण्यात रस आहे. जर प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम पूर्ण केले, तर ते अमळनेरकरांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरेल. मात्र, यापुढेही केवळ कागदी घोडे नाचवून दुर्लक्ष केले, तर या प्रश्नासाठी कोणत्याही टोकाची भूमिका घ्यायला आम आदमी पार्टी मागे हटणार नाही.



