अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
खा शि मं. श्रीमती द्रौ ,रा. कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस साजरा …
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ संकल्पनेला बळ; मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची पल्स पोलिओ व हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम
मारवड (प्रतिनिधी):
“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे** यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
यावेळी दि. २८ जून २०२६ (रविवार) रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन करण्यात आले. आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी सार्वजनिक भिंतीवर “लस पाजा बाळा, पोलिओ टाळा” हा संदेश लिहून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
पल्स पोलिओ हा भारत सरकारचा राष्ट्रीय प्रतिरक्षण कार्यक्रम असून, या अभियानांतर्गत ० ते ५ वर्षांतील सर्व बालकांना ओरल पोलिओ व्हॅक्सीन (OPV) चे दोन थेंब दिले जातात. यामुळे पोलिओसारख्या गंभीर व कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारापासून बालकांचे संरक्षण होते. पोलिओ हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, घसा दुखणे, डोकेदुखी, उलट्या, हात-पाय दुखणे, स्नायू कमकुवत होणे आणि पक्षाघात ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
भारतामध्ये १९९५ पासून पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आले असून २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पोलिओमुक्त देश म्हणून प्रमाणित केले आहे. पोलिओ प्रतिबंधासाठी OPV (Oral Polio Vaccine) तसेच नियमित लसीकरणात IPV (Inactivated Polio Vaccine) चा वापर केला जातो.
यावेळी “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या” आणि “पोलिओमुक्त भारत, आपली सर्वांची जबाबदारी” हा संदेश देत पोलिओमुक्त मारवड घडविण्याचा संकल्प करण्यात आला. आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे व संजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असून हिवताप निर्मूलन धोरण २०३० च्या अनुषंगाने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. किटकशास्त्रीय सर्वेक्षण, डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबाबत मार्गदर्शन, गप्पी माशांचे महत्त्व, परिसर स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर, तसेच जलजन्य व किटकजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांना माहिती देण्यात आली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी साहील चौधरी, विदया देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, संजय जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक के. आर. साबळे, आरोग्य सहाय्यिका सुनिता गावित, आरोग्य सेवक योगेश कापडणे तसेच आशा सेविका राजेश्री पाटील, संगीता चौधरी, मंदाताई शिंदे, मनिषा पाटील, कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले.
आरोग्यदायी, रोगमुक्त आणि सुरक्षित गाव घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने करण्यात आले.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस शुक्रवार, दि. 26 जून रोजी सायंकाळी संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादिपती प. पू. प्रसाद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोपवाटिकेची पाहणी केली. तसेच रोपवाटिकेत तयार करण्यात आलेले स्वतंत्र विविध विभाग, परिसरातील सुशोभीकरण, पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि भाविकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबद्दल कौतुक करत मंगळग्रह सेवा संस्थेच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा देत कृपाशीर्वादही दिला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ग्रीनरी कन्स्लंटट श्री. सुबोध पाटील यांच्या सहकार्याने गेल्या 20 वर्षांपासून या रोपवाटिकेचे संगोपन केले जात होतेच. मात्र, रोपवाटिकेत विविध विभाग तयार करून ती अधिकाधिक भव्य-दिव्य स्वरूपात विकसित करावी, या उद्देशातून नुकतेच या रोपवाटिकेचे व्यापक नूतनीकरण करण्यात आले आहे. रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे, शोभिवंत वृक्ष, फळझाडे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे विविध विभाग विकसित करण्यात आले असून, भाविकांना निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने परिसराचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे.
संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी रोपवाटिकेतील विविध विभागांची पाहणी करून त्यामागील संकल्पना जाणून घेतली. मंदिर परिसरातील हरित उपक्रम, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात येऊन यथोचित स्वागत करण्यात आले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, हेमंत गोसावी, पवन शर्मा यांनी पौरोहित्य केले. यावेळी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानातील सुदाम पाटील महाराज, हर्षल जोशी महाराज, सारंग पाठक, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, ए. डी. भदाणे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोपवाटिकेतील विविध विभाग
संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेच्या नूतनीकरणात विविध विभाग नव्याने तयार केले आहेत. त्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प, गोवरी, प्लास्टिक क्रशिंग, गुलाब बाग, वृक्षारोपण, जैविक खतप्रणाली आदी विभागांसह रोपवाटिकेशेजारीच भाविकांना निसर्ग सान्निध्याचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशातून निसर्ग बैठक स्थळही तयार करण्यात आले असून, हे स्थळ विविध वृक्षराजीने सज्ज झालेले आहे.

Read More श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी
अमळनेरकरांसाठी आनंदाची बातमी: भाविक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ एसटी विनंती थांब्याचे अनावरण!
अमळनेर (प्रतिनिधी) : ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची, विशेषतः सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी महामंडळाची बस या ठिकाणी थांबून प्रवाशांना योग्य सुखसुविधा मिळावी या उद्देशाने आज या भागात ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ (एसटी विनंती थांबा) चे अधिकृत बोर्ड लावून लोकार्पण करण्यात आले.
हे जनहिताचे काम युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मा. श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी यांच्या प्रमुख पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांना आणि भाविकांना येण्या-जाण्यासाठी हक्काचा थांबा मिळावा यासाठी मनिषभाऊंनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी गावातील आणि परिसरातील प्रमुख नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामात मोलाचे सहकार्य आणि उपस्थिती लाभलेले मान्यवर खालीलप्रमाणे:
१) श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी (युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख)
२) श्री. मोहन मनोरे (आम आदमी पार्टी)
३) श्री. महेंद्र साळुंखे (भाग्यलक्ष्मी लॅब, आम आदमी पार्टी)
४) श्री. रामकृष्ण चिंतामण पाटील – देवरे साहेब (आम आदमी पार्टी)
५) श्री. राजेंद्र बाळकृष्ण जाधव
६) श्री. नागोराज राजाराम धनगर
७) श्री. अमोल नागोराज धनगर
८) श्री. हितेश चौधरी
९) श्री. इंजि. निखिल चौधरी
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
या नवीन ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ मुळे आता परिसरातील प्रवाशांना, महिलांना, वृद्ध नागरिकांना आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुखसुविधेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि मनिषभाऊ चौधरी यांचे समस्त अमळनेरकर नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.
“लोकांचे हित, हेच आमचे कर्तव्य!” या भावनेतून हे कार्य पूर्ण झाल्याचे याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले.



