अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेची विशेष मोहीम अपघाताच्या प्रमाणात वाढ, ट्रॅक्टर ट्रॉलींवर बसविले रिफ्लेक्टर
अमळनेर :- जळगाव जिल्ह्यासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अमळनेर शहर वाहतूक शाखेने विशेष जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी करण्यात आली. ज्या ट्रॅक्टर ट्रॉलींना मागील बाजूस रिफ्लेक्टर नव्हते त्यांना थांबवून तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात आले .
विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉली सहज दिसाव्यात आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना वेळेत त्यांचा अंदाज यावा यासाठी रिफ्लेक्टर अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या मोहिमेत पोलीस हवालदार संजय बोरसे, विनय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे आणि विलास बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती ही केली.


पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी उत्तुंग यश संपादन
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आणि दोन विद्यार्थी पाचवी कक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) पाटील आरव विठ्ठल 2) भामरे श्रावणी हेमंत
त्याचसोबत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी बसले होते एकूण 8 विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे नाव मराठे कैवल्य दिनेश हे असून सदर विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने शाळेचे नाव उज्वल करून शाळेसाठी ऐतिहासिक कार्य त्यांच्याद्वारे होऊन आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करून सर्वांच्या गुणगौरवास पात्र ठरुन त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
त्याचसोबत इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी राज्यातून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भामरे श्रावणी अजय हिस रोख राशी 1000 रुपये स्मृतीचिन्ह सन्मानपत्र अशा स्वरूपात भेट देऊन मा. मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अशी दुर्मिळ कामगिरी करणारी एकमेव विद्यार्थीनी ही अमळनेर तालुक्यातील ठरली असून शैक्षणिक क्षेत्रातून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून ही ऐतिहासिक कामगिरी करून शाळेचे नाव संबंध महाराष्ट्रात उंचावून एक आदर्श तिने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केले आहे. इयत्ता 5 वीचा विद्यार्थी यश चौधरी हा या उपरोक्त परीक्षेसाठी 16 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याला सुद्धा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरान्वीत करण्यात आले. सदर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खा. शि. मंडळाचे समस्त मान्यवर संचालक मंडळ यांनी केले.
सदर परीक्षेसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य परीक्षेसाठी ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध करून देण्यामध्ये शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी ,पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही एस अमृतकर , डिंपल देसाई, प्रशांत वंजारी , एस. एस. पारधी समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.


लोकसहभागातून ११ हजार झाडांचे संवर्धन; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा हरित उपक्रम ठरतोय प्रेरणादायी संरक्षणासाठी कंपाउंड ची लोकप्रतिनिधींकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी वृक्षसंवर्धन उपक्रम सध्या वेगाने सुरू आहे. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या जागेवर तब्बल ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे अकरा हजार झाडांचे संवर्धन संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षण कंपाऊंड उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाउंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आली असून त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सामाजिक जबाबदारी असून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन 25 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळाली नाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केली जात आहे असा सवाल उपस्थित करून यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही दर्शना पवार यांनी नमूद केले आहे.



