खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
अमळनेर नगर परिषदेत ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा; सफाई कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्डचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांच्या बदनामीप्रकरणी अनंत निकमविरोधात तक्रारी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संतप्त धोबी समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन..
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान
श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांच्या बदनामीप्रकरणी अनंत निकमविरोधात तक्रारी
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संतप्त धोबी समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन..
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘
जळगाव( प्रतिनिधी) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता, बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भंते, नागसेन ( सातपुडा पर्वत) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते धुळे लांडोर बंगला भीमस्मृती धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दिनांक 21 जुलै रोजी सकाळी आठ वाजता जळगाव येथील विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रारंभ होणार आहे.
ही पदयात्रा दिनांक 21 जुलै ते 31 जुलै २०२६ या कालावधीत सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करत पदयात्रेचा समारोप धुळे येथील लांडोर बंगला येथे होणार आहे. या पदयात्रेला पूज्य गुरुजी ज्ञानज्योती महाथेरो ( ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच देशभरातील अनेक मान्यवर भिक्खू संघ या पदयात्रेत सहभागी होणार असून त्यामध्ये भंते प्रियबोधी, भंते चार धम्मो, भंते सुगद बोधि, भंते सागर बोधी, भंते धम्म ज्योती, भंते आनंद, भंते धम्मदत्त, भंते संघरक्षित, भंते आर्यनाग, भंते सुमित बोधी यांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी, उपासक उपासिका आणि भीमसैनिक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
या ऐतिहासिक पदयात्रेचा समारोप दिनांक 31 जुलै रोजी धुळे येथील लांडोर बंगला परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून होणार आहे. ही पदयात्रा खानदेशातील सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास असून या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी):
अमळनेर नगरपालिकेतील अलीकडील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची गरज व्यक्त केली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांपेक्षा शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
महेंद्र साळुंखे यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये निवेदन देणे, आंदोलन करणे किंवा प्रशासनाकडे मागण्या मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, प्रशासकीय पदांचा सन्मान राखणे आणि लोकशाही मूल्यांचे भान ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या प्रतीकात्मक कृतींमुळे शहरातील गंभीर प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी अमळनेर शहरातील खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतेचे प्रश्न आणि आरोग्य व्यवस्थेतील अडचणी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनीही प्रशासकीय संस्थांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. विरोध हा विधायक पद्धतीने, सभागृहात आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वैयक्तिक टीका किंवा प्रसिद्धीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रसिद्धीपत्रकात आम आदमी पार्टीने अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन, दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्य सुविधा, स्वच्छ शहर आणि मूलभूत नागरी सुविधांवर भर देण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत विकासाभिमुख राजकारण करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले.




