अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
५८ वर्षांची सेवापरंपरा कायम ठेवण्याचा निर्धार; लायन्स क्लबच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
अमळनेर | प्रतिनिधी
समाजसेवा, वैद्यकीय, आर्थिक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या मान्यवरांचा लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात भव्य गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाप्रती असलेली निष्ठा, सेवाभाव आणि विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण योगदानामुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य होत असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित व्यक्तींचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांना सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, सीए राजेश शाह, सीए अजय हिंदुजा, सीए रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव जयेश गुजराथी यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करत समाजहितासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक
अमळनेर:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू अशी ग्वाही गटनेत्या सौ जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शविआच्या बैठकीत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
दरम्यान नगरसेवक डॉ. डीगंबर महाले यांनी आजची बैठक राजकीय चिखल फेकीची नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.नगरपालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील नागरी समस्यांबाबत गटनेत्या सौ जयश्री पाटील व नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.नगरसेवकांच्या काही प्रश्नांवर अधिकार निरुत्तर होत होते.एकंदरीत पालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळेच पालिकेचा कारभार सुरळीत नसल्याचा उपस्थितांनी आरोप केला.
यंदाच्या उन्हाळ्यात संपुर्ण दोन महिने नागरिकांना 8 ते 12 दिवसाआड पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुख्याधिकारी शिंदे यांनी मोर्चा न काढण्याबाबत दिलेल्या विनंती पत्रास मान देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी प्रशासकिय बैठक बोलवावी अशी मागणी गटनेत्या सौ जयश्रीताई पाटील यांनी केल्याने दिनांक 30 जुन रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठा,टाकी सफाई नतंरही होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा,गटारी तुंबल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी,भुयार गटार,पाणीपुरवठा टीडीएस व प्रामुख्याने कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक , सफाई कामगारांचे मनमानी समायोजन,काही ठेकेदारांची अक्षम्य कर्तव्य कसूरी आदी समस्या नगरसेवकांनी अत्यंत आक्रमकतेने मांडल्या .विशेषत :विस्कळीत ,अशुद्ध व अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणारा पाणीपुरवठा आणि कचरा गाडीतून झालेली मृतदेहाची वाहतूक या प्रश्नांवर साऱ्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले.घनकचरा ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून गुन्हे दाखल करावेत तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्या साफ न करता नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली.
प्रामुख्याने सौ.जयश्रीताई पाटील यांचेसह नगरसेवक डॉ .डिगंबर महाले,विक्रांत पाटील,जितेंद्र ठाकूर,भरत ललवाणी,योगिता कापडणेकर,हाजी नसीरोद्दीन, जुबेदा आपा , नरेंद्र संदानशीव ,मुक्तार खाटीक, सचीन पाटील, शोभाबाई गढरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर इतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्यां मांडल्या.
शहरात मिळते चक्क 400 टीडीएस चे पाणी
अमळनेर शहरात सध्या नागरिकांना मिळत असलेल्या पाण्याचे टीडीएस किती हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाणी टाकीवरील पाणी बाटलीत आणून सभागृहातच ते चेक करण्यात आले असता त्याचे टीडीएस चक्क 400 पर्यंत आले.हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारले असता ते निरुत्तर झाले.खरे पाहता जास्तीजास्त 200 ते 250 टीडीएस पाणी असायला हरकत नाही परंतू 400 पर्यंत टीडीएस जात असेल तर लोकांच्या जीवाशी खेळ करू नका याकडे लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी द्या अशी मागणी सर्वानी केली.
शेवटी मुख्याधिकारी शिंदे सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देताना लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.व इतर प्रश्नांवर देखील गांभीर्याने कार्यवाही करण्याची हमी देत नागरी समस्यांबाबत प्रशासन कोणतीही कसुराई करणार नाही असे आश्वसित केले.
सदर बैठकीत
मुख्यधिकारी गणेश शिंदे,पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील,,प्रविणकुमार बैसाणे,आरोग्य निरीक्षक संतोष माणिक,किरण कंडारे,बांधकाम अभियंता सचिन गवांदे,दिवाबत्ती अभियंता कुणाल महाले,वसुली विभागाचे लौकिक समशेर,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,सभा लिपिक प्रमोद लटपटे उपस्थित होते.
तर बैठकीस श.वि.आ.च्या वतीने गटनेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका योगिता कापडणेकर, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, अफसाना खाटीक,नंदा संदानशिव, शोभाबाई गढरे,विजय पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, भरतकुमार ललवानी,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राष्ट्रवादी शहरध्यक्ष चेतन राजपूत, समाजसेवक जितेंद्र ठाकूर, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, नसरोद्दीन हाजी,विजय राजपूत, सयाजीराव कापडणेकर, भूषण भदाणे, सुनील शिंपी, संजय पुनाजी पाटील, गौरव महाजन आणि शुभम पाटील उपस्थित होते.
सदर सभागृहातील घड्याळ बंद असल्याचे शेतकी संघाचे संचालक संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रा. डॉ. अंजली जोशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम सेवानिवृत्त; महाविद्यालयात भावुक वातावरण
अमळनेर : येथील नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षे आपल्या ज्ञानदानाने शेकडो उत्तम शिक्षक घडविणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली जोशी मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोड स्वभाव, सुश्राव्य वाणी आणि अथांग ज्ञानसाधनेच्या बळावर त्यांनी विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालयातून एक आदर्श मार्गदर्शक निवृत्त होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा डॉ अंजली जोशी यांना महाविद्याल्याच्या वतीने प्रा डॉ नयना वाणी व प्रा डॉ सुनंदा तायडे यांनी पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार केला. तर पती गोविंद कुलकर्णी व भाऊ प्रसाद जोशी यांचे स्वागत महाविद्यालयाच्या तर्फे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी यांनी केले.
निरोप देतांना भावुक वातावरण
सेवा पूर्ती च्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ नयना वाणी, डॉ जितेश चव्हाण, डॉ सुनंदा तायडे, डॉ विजय गाढे यांनी जोशी मॅडममांच्या सहवासातील आठवणींना सश्रूनयनाने वाट मोकळी केली व पुढील आयुष्य सुखी समाधानी जाओ म्हणून मनोभावे ईश्वराला याचना केली. भाऊ प्रसाद जोशी यांनी बहिणीच्या सहवासातील बालपणा पासून आज पर्यंतचा आठवणी उपस्थितांच्या समोर मांडला. ईश्वरानेचे माझ्या आयुष्यात सर्वगुण संपन्न अश्या बहिणीला पाठविल्याचे सांगत अनेक चांगल्या स्वभाव गुणांचा पाढाच वाचला.बालपणा पासूनच परिवाराचा आधारवड म्हणून त्यांना उपमा दिली.
उच्च शिक्षणासोबतच आदर्श कुटुंबव्यवस्था आणि देशसेवा
प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम यांचे शिक्षण एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. असे उच्च दर्जाचे असून, त्यांनी सन १९९३ मध्ये या महाविद्यालयात अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली होती. जळगाव ते अमळनेर असा तब्बल ३३ वर्षांचा रेल्वेचा खडतर प्रवास करत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसुरी केली नाही. एका बाजूला उत्तम शिक्षक घडवून देशसेवेचे महत कार्य करत असतानाच, दुसऱ्या बाजूला अनेक कष्ट सोसून त्यांनी आपल्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व स्वावलंबी बनवले. एक सुशिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबासाठी कशी प्रेरणादायी ठरू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अंजली जोशी मॅडम आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
सहकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे व घट्ट नाते जपले. त्यांच्या गोड स्वभावामुळे त्या सर्वांच्याच लाडक्या प्राध्यापिका राहिल्या. अध्यापनासोबतच त्यांना संगीताचीही उत्तम आवड आहे. आपल्या गोड गळ्याने त्यांनी अनेकदा सहज एखादे गाणे गाऊन अवतीभवतीच्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे, अशा आठवणींना यावेळी सहकाऱ्यांनी उजाळा दिला.
निरोगी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना
सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रा. डॉ. जोशी मॅडम आज सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयातील प्रत्येकाचेच उर भरून आले होते. निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या पुढील वाटचालीस, निरामय, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी महाविद्यालयातील सर्वच स्तरांतून आणि उपस्थितांकडून ईश्वराजवळ प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी , प्राध्यापक वृंद डॉ नयना वाणी,डॉ सुंनंदा तायडे, डॉ जितेश चव्हाण, डॉ विजय गाढे, प्रा कैलास देवरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ.वनिता पाटील,किरण रावल, कैलास भोंगळ, अनिकेत पाटील, राजू पाटील, विनोद पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


