‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांची शिवसेना शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दमदार नियुक्ती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरात आम आदमी पार्टीचा ‘झाडू अभियाना’चा धडाका; गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा विडा!
अमळनेर:
अमळनेर शहरामध्ये सध्या आम आदमी पार्टी (आप) च्या वतीने सुरू असलेल्या ‘झाडू अभियाना’ची चर्चा सर्वत्र होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून शहर स्वच्छतेचे व्रत पक्षाने स्वीकारले आहे. या अभियानाचे नेतृत्व स्वतः तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके आणि उपाध्यक्ष श्री. रामकृष्ण चिंतामण देवरे करत आहेत.

झाडू अभियान जुडो अभियान हा उद्देश पूर्ण झाला चांगले काम पाहता चांगला मित्र माझी आवड बघून तो आपल्या कामाने भाऊक होऊन दररोज येण्यासाठी तयार झाले आहे श्रीमंत प्रताप शेठजी स्मारक स्वच्छ पाण्याने धुण्यात आले.

गाडगे महाराजांचा वारसा, आमची जिद्द
या मोहिमेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके म्हणाले की, “संत गाडगे महाराजांनी आपल्या हातात झाडू घेऊन संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला आणि ते अमर झाले. गाडगे महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच आम्ही हे अभियान चालवत आहोत. आम्हाला कोणत्याही निवडणुकीचे वावडे नाही; पुढील चार-पाच वर्षे निवडणुका नसल्या तरीही आम्ही जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत.”
केवळ स्वच्छताच नाही, तर प्रश्नांची सोडवणूक
आम आदमी पार्टी कोणत्याही राजकीय युतीमध्ये सामील नसून, केवळ स्वबळावर सामान्यांचा आवाज उठवत आहे. सध्या पक्षाचे ध्येय आणि जिद्द एकच आहे – “स्वच्छ आणि सुंदर अमळनेर.” धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्व पदाधिकारी जसे की, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, मोहन मनोरे, ललित विसपुते, शेजात खाटीक आणि सुधाकर गजरे हे अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत.

जनतेच्या मूलभूत गरजांसाठी लढा
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दर दोन-तीन दिवसांच्या अंतराने प्रशासनाला निवेदने देऊन विकासकामांचा पाठपुरावा करत आहेत. स्वार्थी राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य देणाऱ्या या कार्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास वाढला आहे.
“झाडू” हा केवळ एक शब्द नसून तो क्रांतीचे प्रतीक आहे, ज्याद्वारे आम्ही शहरातील समस्यांचा कचरा दूर करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प केला आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रताप महाविद्यालयातील एनसीसी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक; ३५६ छात्र सैनिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे
अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून छात्र सैनिकांना शिस्त, देशसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात दि. २६ मे रोजी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे विशेष अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात ४८ महाराष्ट्र बटालियन धुळे, ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि ५० महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग असून तब्बल ३५६ छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे छात्र सैनिकांना प्रत्यक्ष अनुभवातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत.
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी उपस्थित छात्र सैनिकांना आगीचे विविध प्रकार, आग लागण्याची कारणे, आग विझविण्याच्या पद्धती तसेच अग्निशमन साहित्यांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख आणि आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आग नियंत्रण प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे समजावून सांगितली. छात्र सैनिकांनीही मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

शिबिराचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग तसेच परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्राथमिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी यावेळी केले. देशसेवेची प्रेरणा देणारे आणि संकटसमयी धैर्याने कार्य करण्याचे बळ देणारे हे प्रशिक्षण छात्र सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करण्यात आला.

‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट
अमळनेर | प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत मुंबई शहर पोलीस दलात तब्बल सात विद्यार्थ्यांची निवड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २७ मे रोजी रात्री १०.३० वाजता जाहीर झालेल्या निवड यादीत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला.
मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी
१) शितल पाटील
२) चेतन पाटील
३) कार्तिक पाटील
४) रोहित कुंभार
५) समाधान कुंभार
६) उमेश कुंभार
७) अजय कोळी
हे सर्व विद्यार्थी प्रताप महाविद्यालयाच्या सीसीएमसी विभागाचे नियमित विद्यार्थी असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा लाभ घेतला होता.
विशेष म्हणजे अमळगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही या यशात स्थान मिळविल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरीताई पाटील, कमल कोचर, विश्वस्त सौ. वसुंधराताई लांडगे, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, सौ. लीनाताई पाटील, पंकज मुंदडे, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार, कुलसचिव राकेश निळे, सीसीएमसी प्रमुख डॉ. विजय तुंटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Read More ‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट

