देशातील पहिले ‘एआय मंदिर’ आता ‘व्हीआर दिव्यदर्शन’मुळे पुन्हा चर्चेत श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल युगाची नवी क्रांती; घरबसल्या मिळणार 360 अंशांचा दिव्य अनुभव आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
Featured general Latest News Popular Post- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर नगरपालिकेचा पाणीपुरवठा उशिराने होणार
अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेतील जुन्या मुख्य जलवाहिनीवरील मेन 150 एम एम (6″) इंच व्हॉल्व नादुरुस्त झाला असल्याने सदरील व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी बुधवारी युद्ध पातळीवर काम केले जाणार आहे. त्यासाठी मुख्य जलवाहिनी वॉश आऊट करणे आवश्यक आहे. त्यामुळे या वॉल व वरून फरशी रोड, बेलदार मोहल्ला, पान खिडकी, बाहेर पुरा तसेच यात्रेत होणारा पाणीपुरवठा तसेच झामी चौक जलकुंभ, लालबाग जलकुंभ, रामवाडी जलकुंभ, तांबेपूरा जलकुंभ यावरून होणारा पाणीपुरवठा एक दोन दिवस उशिराने होईल याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा विभागाचे सभापती कैलास नामदेव पाटील यांनी केले आहे.
शिक्षण, समाजकार्य व महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव डॉ. अर्चना सूर्यवंशी यांना ‘इंडिया प्राइड अवॉर्ड’ प्रदान
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर येथील सूर्या फाउंडेशन तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पाळधी येथील नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी (प्रशांत सूर्यवंशी) यांना शिक्षण, समाजकार्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा *‘इंडिया प्राइड अवॉर्ड’* प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथे आयोजित भव्य *‘सुपर मॉम सुपर वुमन 2026 – सीझन 4’* या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री Mahima Chaudhry यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जळगावचे आमदार Raju Mama Bhole प्रमुख उपस्थित होते.
दि. ८ मे रोजी जळगाव येथील Hotel President Cottage येथे संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन *आर व्ही एंटरटेनमेंट* यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापक सौ. रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३९ महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण मिळावे या ध्येयाने डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी उभे केलेले कार्य विशेष प्रेरणादायी ठरले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समाजहितासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेली त्यांची तळमळ याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल शाळा परिवार, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्यास आमदारच अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडविण्याचे काम स्वतः आमदारांकडूनच करण्यात आले. तापी नदीवरील वाळू ठेक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध खड्डे करण्यात आले असून त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा अडविला गेला. तसेच वाळू वाहतुकीसाठी नदीपात्रात टाकण्यात आलेले रस्ते व बांध यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी नदीपात्रातील अवैध रस्ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते व बांध हटविल्यानंतर डोहातील पाण्याची पातळी वाढली असून आता शहराला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

“पाण्याचे राजकारण करू नये,” असा सल्ला देत सभापती कैलास पाटील यांनी आमदारांवर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतरच पाणीपट्टीबाबत कळवळा निर्माण झाला असून पाणीपट्टी ९०० रुपयांवरून १८०० रुपये करताना जनतेचा विचार केला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षपदाच्या काळात भर पावसाळ्यात नगरपरिषदेसमोर हंडा मोर्चा निघाल्याची आठवण करून देत त्यांनी आमदारांवर टीका केली.
२४x७ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आपणच शासनाकडे पाठविला होता, तसेच त्याकाळात स्वखर्चाने नदीपात्रात १४ बोअरवेल करण्यात आल्या व कलाली डोहातून ८.५० कोटी रुपयांची तातडीची योजना मंजूर करून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होत असल्याचे सांगत भविष्यात सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अमळनेरकरांना या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“आमचे शब्द हे केवळ आश्वासन नसून वचन आहे,” असे सांगत अमळनेरकर जनतेने दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.

