रात्री–पहाटे धडक कारवाई : ट्रॅव्हल बसेसची जळगाव पोलिसांकडून अचानक तपासणी
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
🎓 जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९९% — यशाची परंपरा कायम!
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
प्रताप महाविद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा राखली कायम
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान; यात्रोत्सवात पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
डी.आर. कन्या शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
Top 10 News
तहानलेल्या मुक्या जीवांना आधार — बजरंग दलाचा पाणी कुंडे उपक्रम
रात्री–पहाटे धडक कारवाई : ट्रॅव्हल बसेसची जळगाव पोलिसांकडून अचानक तपासणी
🎓 जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९९% — यशाची परंपरा कायम!
प्रताप महाविद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा राखली कायम
बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान; यात्रोत्सवात पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
तहानलेल्या मुक्या जीवांना आधार — बजरंग दलाचा पाणी कुंडे उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असताना शहरात फिरणाऱ्या मुक्या पशु व गोवंशांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होते. ही गरज ओळखून विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेर यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी सिमेंटचे पाण्याचे कुंडे बसवण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत अमळनेर शहरातील प्रमुख चौक, रस्ते व मोकळ्या जागांमध्ये पाण्याने भरलेली कुंडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उन्हामुळे त्रस्त असलेल्या जनावरांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
संघटनेचे कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कुंड्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन कुंड्यांमध्ये पाणी भरून मुक्या जीवांची तहान भागवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश दिला जात असून, शहरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर भाविकांनी गजबजले देशभरातून भाविकांची उपस्थिती; दुर्मिळ योगामुळे पूजाअर्चेला विशेष महत्त्व
अमळनेर (प्रतिनिधी): अंगारक संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त मंगळवार, दि. ५ मे रोजी येथील श्री मंगळग्रह मंदिर भाविकांच्या प्रचंड गर्दीने गजबजून गेले. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून दर्शन व पूजाअर्चा केली. यंदाच्या २०२६ वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असून, दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते.
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष स्थान आहे. त्यातही चतुर्थी मंगळवारी आल्यास ती ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखली जाते. वैशाख वद्य चतुर्थीला आलेल्या या शुभ योगामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक भाविक सोमवार, दि. ४ मे रोजी रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले होते.
पहाटे ५.२५ वाजता चतुर्थीचा प्रारंभ होताच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेच्या शुभ मुहूर्तावर श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमान, तसेच श्री मंगळग्रह देवतेचे यजमानांच्या हस्ते विधिवत विशेष पूजन करण्यात आले. यानंतर भाविकांनी मंदिर परिसरातील भगवान श्री गुरुदत्त-श्री अनघालक्ष्मी माता, श्री कालभैरवनाथ-श्री माता भैरवी, श्री स्वामी समर्थ महाराज तसेच मंगळेश्वर महादेव यांचेही दर्शन घेतले.

ही चतुर्थी बुधवार, दि. ६ मे रोजी सकाळी ७.५१ वाजेपर्यंत असल्याने ‘अहोरात्र अंगारकी’चा योग जुळून आला होता. याशिवाय या दिवशी शिवयोग व बुधादित्य योगही असल्याने भाविकांसाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला. रात्री सुमारे १०.३५ वाजता चंद्रोदय झाल्यानंतर अनेक भाविकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला.
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व
स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी भगवान गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला ‘अंगारकी’ म्हणून ओळख दिली. या दिवशी व्रत केल्याने कर्जमुक्ती, आत्मविश्वास वाढ आणि अडथळ्यांवर मात होते, अशी श्रद्धा आहे. भक्तांनी २१ दुर्वा व मोदकांचा नैवेद्य अर्पण करून गणेशपूजन करावे आणि चंद्रोदयानंतर व्रत सोडावे, अशी परंपरा आहे.
यंदा तीन अंगारकी चतुर्थी
पंचांगानुसार २०२६ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्टी चतुर्थी आहेत. पहिली ६ जानेवारी रोजी झाली असून, दुसरी ५ मे रोजी साजरी करण्यात आली. तिसरी अंगारकी चतुर्थी २९ सप्टेंबर २०२६ रोजी येणार आहे. ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती आणि मंगळवार व चतुर्थीचा योग यामुळे हा दुर्मिळ योग घडत असल्याचे जाणकार सांगतात.
अमळनेर-नाशिक बस वेळेवरून संताप; धुळे-मुंबई रेल्वे जोडणीची मागणी तीव्र प्रशासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर येथून पहाटे ५:१५ वाजता सुटणारी अमळनेर-नाशिक एसटी बस प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयीची ठरत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या बसची वेळ धुळे-मुंबई या महत्त्वाच्या रेल्वेशी न जुळल्यामुळे शेकडो प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, वेळेत बदल न झाल्यास अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी दिला आहे.
सध्या अमळनेरहून सकाळी ५:१५ वाजता सुटणारी बस अमळनेर रेल्वे स्थानकावर साधारण ६ ते ६:१० दरम्यान पोहोचते. याच सुमारास धुळ्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सुटत असल्याने प्रवाशांची अक्षरशः धावपळ उडते. अनेक वेळा रेल्वे हुकत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
बसची वेळ व मार्ग बदलण्याची मागणी करताना ॲड. सोनार यांनी स्पष्ट केले की, सदर बस पहाटे ५:१५ ऐवजी ४:४५ वाजता सोडण्यात यावी. तसेच बसने ‘बारापत्थर’ मार्ग टाळून थेट रेल्वे स्थानक गाठावे. या बदलामुळे प्रवाशांना वेळेत रेल्वे पकडता येईल आणि एसटी महामंडळालाही अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात वाढ होईल.
दरम्यान, ही मागणी अनेक दिवसांपासून आगार प्रशासनाकडे प्रलंबित असून, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या गंभीर प्रश्नात आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या भावना व्यक्त करताना ॲड. सारांश धनंजय सोनार म्हणाले,
“अमळनेरच्या प्रवाशांसाठी धुळे-मुंबई रेल्वे ही अत्यंत सोयीची आहे. मात्र बसच्या चुकीच्या वेळेमुळे हा लाभ घेता येत नाही. प्रशासनाने तात्काळ वेळ व मार्गात बदल केला नाही, तर आम्ही प्रवाशांच्या हितासाठी अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडू.”
आता या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

