देशातील पहिले ‘एआय मंदिर’ आता ‘व्हीआर दिव्यदर्शन’मुळे पुन्हा चर्चेत श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल युगाची नवी क्रांती; घरबसल्या मिळणार 360 अंशांचा दिव्य अनुभव आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
Featured general Latest News Popular Post- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
रात्री–पहाटे धडक कारवाई : ट्रॅव्हल बसेसची जळगाव पोलिसांकडून अचानक तपासणी
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्यास आमदारच अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडविण्याचे काम स्वतः आमदारांकडूनच करण्यात आले. तापी नदीवरील वाळू ठेक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध खड्डे करण्यात आले असून त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा अडविला गेला. तसेच वाळू वाहतुकीसाठी नदीपात्रात टाकण्यात आलेले रस्ते व बांध यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी नदीपात्रातील अवैध रस्ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते व बांध हटविल्यानंतर डोहातील पाण्याची पातळी वाढली असून आता शहराला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

“पाण्याचे राजकारण करू नये,” असा सल्ला देत सभापती कैलास पाटील यांनी आमदारांवर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतरच पाणीपट्टीबाबत कळवळा निर्माण झाला असून पाणीपट्टी ९०० रुपयांवरून १८०० रुपये करताना जनतेचा विचार केला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षपदाच्या काळात भर पावसाळ्यात नगरपरिषदेसमोर हंडा मोर्चा निघाल्याची आठवण करून देत त्यांनी आमदारांवर टीका केली.
२४x७ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आपणच शासनाकडे पाठविला होता, तसेच त्याकाळात स्वखर्चाने नदीपात्रात १४ बोअरवेल करण्यात आल्या व कलाली डोहातून ८.५० कोटी रुपयांची तातडीची योजना मंजूर करून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होत असल्याचे सांगत भविष्यात सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अमळनेरकरांना या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“आमचे शब्द हे केवळ आश्वासन नसून वचन आहे,” असे सांगत अमळनेरकर जनतेने दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा १० वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘प्रमोशन’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर येथील *पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय* संचलित *पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा* १० वा वर्धापन दिन शुक्रवार, ८ मे रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या केंद्राने गेल्या दशकभरात अनेक विद्यार्थ्यांना यशाची दिशा दिली असून, कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी *भाऊसाहेब देशमुख* उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमळनेरचे पोलीस निरीक्षक *दत्तात्रय निकम* यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील संधी, मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मंचावर ग्रंथालयाचे सचिव *प्रकाश वाघ*, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक *संदीप पाटील*, निवृत्त गटशिक्षणाधिकारी *अशोक बिऱ्हाडे*, पत्रकार तथा संचालक *ईश्वर महाजन*, संचालक *दीपक वाल्हे* आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. *जळगाव पोलीस दलात* निवड झालेल्या *ज्ञानेश्वर पाटील*, *मीराभाईंदर पोलीस दलात* निवड झालेल्या *कु. गीतांजली नितीन पाटील*, *ठाणे शहर पोलीस दलात* निवड झालेले *कल्पेश संजय पाटील* तसेच *टी.ए. आर्मीमध्ये* निवड झालेल्या *भूषण हरिश्चंद्र पाटील* यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच केंद्राचे माजी विद्यार्थी *ॲड. मंगेश पाटील*, *इंडियन नेव्हीतील मयूर लोहार* आणि *आयटीबीपीमध्ये कार्यरत महेंद्र नेरकर* यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित *वकृत्व स्पर्धा* आणि *सामान्य ज्ञान स्पर्धेला* विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यासोबतच स्पर्धा परीक्षा चळवळीला सहकार्य करणाऱ्या *पातोंडा परिसर विकास मंच*, *राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे*, *निवृत्त आर्मी ग्रुप अमळनेर* तसेच विविध मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक *संदीप पाटील* लिखित *‘प्रमोशन’* या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक *राजूदादा फाफोरेकर*, संचालक *बापू नागावकर*, तलाठी *एम. आर. पाटील* तसेच कवी व पत्रकार *अजय भामरे* यांच्या दातृत्वातून स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सचिव *प्रकाश वाघ* यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धांचे परीक्षक म्हणून *संदीप पाटील, गिरीश पाटील, उज्वल मार्कंडेय, किशोर पाटील, गोकुळ बोरसे, गजानन पाटील* आणि *महालपुरे सर* यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष *दिलीप सोनवणे*, सचिव *प्रकाश वाघ*, *दीपक वाल्हे*, *बापू नागावकर*, *सुमित धाडकर* आणि संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन *प्रिया परदेशी* व *कुशल भदाणे* यांनी केले. प्रास्ताविक *संदीप पाटील* यांनी तर आभार प्रदर्शन केंद्र संचालक *विजयसिंह पवार* यांनी केले.
जय योगेश्वर विद्यालयाचा दहावीच्या निकालात झंझावाती यश; ९८.६० टक्के निकालाने उज्वल परंपरा कायम! जयेश कोळी प्रथम, दीपक पारधी द्वितीय तर नैतिक पाटील तृतीय
Read More जय योगेश्वर विद्यालयाचा दहावीच्या निकालात झंझावाती यश; ९८.६० टक्के निकालाने उज्वल परंपरा कायम! जयेश कोळी प्रथम, दीपक पारधी द्वितीय तर नैतिक पाटील तृतीय

