ब्रेकिंग
अमळनेर-नाशिक बस वेळेवरून संताप; धुळे-मुंबई रेल्वे जोडणीची मागणी तीव्र प्रशासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर येथून पहाटे ५:१५ वाजता सुटणारी अमळनेर-नाशिक एसटी बस प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयीची ठरत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या बसची वेळ धुळे-मुंबई या महत्त्वाच्या रेल्वेशी न जुळल्यामुळे शेकडो प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, वेळेत बदल न झाल्यास अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी दिला आहे.

सध्या अमळनेरहून सकाळी ५:१५ वाजता सुटणारी बस अमळनेर रेल्वे स्थानकावर साधारण ६ ते ६:१० दरम्यान पोहोचते. याच सुमारास धुळ्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सुटत असल्याने प्रवाशांची अक्षरशः धावपळ उडते. अनेक वेळा रेल्वे हुकत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बसची वेळ व मार्ग बदलण्याची मागणी करताना ॲड. सोनार यांनी स्पष्ट केले की, सदर बस पहाटे ५:१५ ऐवजी ४:४५ वाजता सोडण्यात यावी. तसेच बसने ‘बारापत्थर’ मार्ग टाळून थेट रेल्वे स्थानक गाठावे. या बदलामुळे प्रवाशांना वेळेत रेल्वे पकडता येईल आणि एसटी महामंडळालाही अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात वाढ होईल.

दरम्यान, ही मागणी अनेक दिवसांपासून आगार प्रशासनाकडे प्रलंबित असून, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या गंभीर प्रश्नात आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या भावना व्यक्त करताना ॲड. सारांश धनंजय सोनार म्हणाले,

“अमळनेरच्या प्रवाशांसाठी धुळे-मुंबई रेल्वे ही अत्यंत सोयीची आहे. मात्र बसच्या चुकीच्या वेळेमुळे हा लाभ घेता येत नाही. प्रशासनाने तात्काळ वेळ व मार्गात बदल केला नाही, तर आम्ही प्रवाशांच्या हितासाठी अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडू.”

आता या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens