ब्रेकिंग
साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार

 

अमळनेर – येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलचे उपशिक्षक दीपक रामभाऊ महाजन यांची आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील ‘अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन’ येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षणासाठी अधिकृत निवड झाली आहे.

           शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने या उच्चस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील निवडक शिक्षकांना “Constructivism in Hands On Teaching” (कृतीयुक्त शिक्षणातून ज्ञानरचनावाद) या विषयांतर्गत आधुनिक शैक्षणिक तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण दिनांक २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून, यात जळगाव जिल्ह्यातून दीपक महाजन यांची निवड झाली आहे. या प्रशिक्षणामुळे साने गुरुजी कन्या हायस्कूलमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना विज्ञान व गणित विषय अधिक सोप्या व रंजक पद्धतीने शिकण्यास मदत होणार आहे.

        या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात एका विशेष बैठकीत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील, ॲड.अशोक बावीस्कर, डॉ.एस.जे.शेख, किरण पाटील आणि दीपक सोनवणे यांनी त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक केले.

तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मनीष उघडे, संजय जगताप आणि हितेश पाटील यांनी महाजन सरांना पुढील प्रशिक्षणासाठी आणि प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाजन सरांच्या या निवडीमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमळनेरच्या तहसीलदारपदी उमा ढेकळे रुपेशकुमार सुराणा यांच्या निलंबनानंतर तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार ज्योती वसावे यांच्याकडे; आता उमा ढेकळे यांची नियुक्ती

 

अमळनेर : अमळनेरच्या तहसीलदारपदाची धुरा आता उमा ढेकळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना अमळनेर तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश प्राप्त झाले असून, लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत.

यापूर्वी उमा ढेकळे या जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. अमळनेरचे तत्कालीन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे निलंबन झाल्यानंतर तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार ज्योती वसावे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

दरम्यान, प्रशासनाकडून अमळनेर तहसीलदारपदासाठी उमा ढेकळे यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आता अमळनेरच्या महसूल प्रशासनाची धुरा त्यांच्या हाती येणार आहे. त्यामुळे महसूल विभागातील प्रलंबित कामांना गती मिळण्यासह नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांच्या निराकरणासाठी त्यांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष लागले आहे.

उमा ढेकळे यांचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता अमळनेर तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान व प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीचे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून स्वागत होत आहे.

गोकुळाष्टमीनिमित्त गोशाळेत गोसेवेचा भक्तिमय सोहळा श्रीमती भानुबेन बाबुलाल शहा गोशाळेत ४ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

अमळनेर : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचे प्रतीक असलेल्या पवित्र गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोसेवा, गोमाता पूजन व धार्मिक वातावरणाने नटलेला विशेष कार्यक्रम अमळनेर येथील पळासदळे रोडवरील श्रीमती भानुबेन बाबुलाल शहा गोशाळेत शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

गोकुळाष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून या कार्यक्रमात गोमातेची विधिवत सेवा, पूजा-अर्चना व पूजन करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक तथा गोसेवक गोविंद अग्रवाल आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोसेवेच्या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

गोमातेची सेवा ही भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.माध्यमातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

गोमातेची सेवा ही भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वावडे येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

 

अमळनेर : तालुक्यातील वावडे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मणिलाल लोटन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मणिलाल लोटन पाटील हे वावडे हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वावडे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमास रडावण येथील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र प्रल्हाद ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र फकिरा पाटील, आवास संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख, लिलाधर माळी, किशोर ठाकरे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बाबुलाल बिऱ्हाडे, उपशिक्षक समाधान छगन खैरनार, कविता मोतीलाल खैरनार, पाकिजा बाबुलाल पिंजारी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतात. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

⭕ एसटीच्या NCMC कार्डचा ‘रिचार्ज’ प्रश्न ऐरणीवर; लाखो ज्येष्ठ व महिलांना गैरसोयीचा फटका कार्डसाठी ₹२०० भरले, आता रिचार्जसाठीही फेऱ्या; ऑनलाइन रिचार्जची सुविधा देण्याची मागणी….

 

अमळनेर:- महाराष्ट्र शासनाने एसटी प्रवासात महिलांना निम्म्या दरात, तर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NCMC कार्डची व्यवस्था केली आहे. मात्र, हे कार्ड वापरणाऱ्या नागरिकांना रिचार्जच्या किचकट प्रक्रियेमुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.

NCMC कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना ₹२०० शुल्क भरावे लागते. तसेच एसटी प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी कार्डमध्ये किमान ₹१०० शिल्लक असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कार्डचा वापर सुरू ठेवण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी रिचार्ज करणे अपरिहार्य ठरते.

मात्र, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रिचार्जची प्रक्रिया त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक वेळी कार्ड रिचार्ज करण्यासाठी एसटी बसस्थानकावर जावे लागत असल्याने वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ रिचार्जसाठी बसस्थानक गाठणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे.

शासनाने नागरिकांना सवलतीचा प्रवास उपलब्ध करून दिला असला, तरी त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठीच वारंवार बसस्थानकाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर ही सुविधा खऱ्या अर्थाने ‘सुलभ’ कशी म्हणायची?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

NCMC कार्डसाठी UPI, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून थेट रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.

एसटी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन NCMC कार्डसाठी ऑनलाइन रिचार्जची सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्राध्यापक प्रकाश धर्माधिकारी यांनी केली आहे.

भाऊराव श्रीपत चव्हाण यांची सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी निवड

 

अमळनेर प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव श्रीपत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे (मुंबई), सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण धर्माळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बहारे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे तसेच जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी सांगवीकर यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मान्यवरांनी भाऊराव चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

चव्हाण यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण! डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार; केक कापून व पुस्तक भेट देत पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे अमळनेर शहराध्यक्ष तथा अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने नाविन्य हॉस्पिटल येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशांत निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रशांत निकम यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. पुस्तक भेट देत सामाजिक व वैचारिक बांधिलकीचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

दरम्यान, पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते रेहान शेख व मारुती पवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिघांनाही उपस्थित मान्यवरांनी पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट, जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ. चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शहर सरचिटणीस चिंधु आप्पा वानखेडे, जाकीर शेख, संदीप सोनवणे, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, खालील पठाण, नाशिक गणेश, धोंडू पाटील, श्यामकांत भावसार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला राजकीय उत्साहासोबतच आपुलकी आणि जिव्हाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या! शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांचे आवाहन; रस्ते, वीज व सार्वजनिक समस्यांवरही उपस्थितांच्या सूचना

 

अमळनेर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी अमळनेर शहरातील वाणी मंगल कार्यालयात दिनांक १ रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी गणेशोत्सव भक्तिभावाने, उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे आवाहन करताना ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन केले.

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा सांस्कृतिक वारसा जपतानाच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले.

बैठकीला उपअधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

रस्त्यांची दुर्दशा, वीज समस्येवरही आवाज

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षितता याबाबत उपस्थितांनी प्रशासनासमोर विविध सूचना मांडल्या. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच संभाव्य समस्या वेळीच दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

बैठकीत चेतन राजपूत, प्रवीण पाटील, दिनेश शेलकर, विक्रांत पाटील, शकील काजी, रणजीत शिंदे, नितीन भदाणे यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडत शहरातील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

‘उत्सव आपला, जबाबदारीही आपली’

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपरिषद, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ध्वनिप्रदूषण टाळणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत प्रशासनाचा ‘शांतता, सुरक्षितता आणि संस्कृतीचा सन्मान’ हा स्पष्ट संदेश अधोरेखित झाला.

मंगरूळ येथे जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन १ ते ४ सप्टेंबरदरम्यान काळ्या फिती लावून निषेध; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जोरदार मागणी

 

मंगरूळ, ता. अमळनेर | दि. १ सप्टेंबर २०२६ :

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंगरूळ येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली. स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथे आज या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागणीसाठी दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून आपले नियमित कामकाज करीत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

जुनी पेन्शनसाठी एकजुटीचा निर्धार

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी निगडित असलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. काळ्या फिती लावून कामकाज करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीबाबतची एकजूट, नाराजी आणि ठाम भूमिका व्यक्त केली.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील, श्री. अशोक सूर्यवंशी, श्री. प्रभुदास पाटील (अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना अमळनेर), संजय पाटील, श्री. राजेंद्र पाटील, सौ. सुषमा सोनवणे, सौ. शितल चव्हाण, सौ. सिमा मोरे, सौ. श्रुती पाटील, सौ. सिमा पाटील, वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील, तसेच श्री. प्रविण पाटील, श्री. मनोज पाटील, श्री. सुदर्शन पवार, श्री. प्रदीप पाटील, श्री. खुशाल पाटील आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

काळ्या फितीच्या माध्यमातून सुरू झालेले हे आंदोलन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीसाठीच्या संघर्षाला अधिक बळ देणारे ठरत आहे.

अमळनेरात २० डिसेंबरला ऑल मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेतर्फे ११ जोडप्यांचे निकाह; नावनोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत

 

अमळनेर : शहरातील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑल मुस्लिम समाजातील वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामूहिक विवाह सोहळा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला असून, संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख यांच्या अध्यक्षतेखाली ११ जोडप्यांचे सामूहिक निकाह पार पडणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळत असून, विवाहाचा अनावश्यक खर्च कमी करून समाजातील गरजू वधू-वरांना सन्मानाने संसाराची सुरुवात करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

संस्थेच्या वतीने प्रत्येक वधू-वरास पलंग सेट, कपाट तसेच संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक वधू-वराच्या कुटुंबातील शंभर-शंभर व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येते 

या सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींची नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांनी दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : ७५०७१५७७८६ / ९०४९९४९९४१

या उपक्रमासाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी व जुबेर पठाण, सचिव सैय्यद अजहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन तसेच सदस्य जाकिर शेख, हाजी मट्या खाटीक व इम्रान शेख परिश्रम घेत आहेत.