जळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
नवीन मालमत्ता कर आकारणीवरून अमळनेरकरांच्या हक्काचा सवाल! ‘कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करा’; नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा — सोमचंद संदानशिव
अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या कर आकारणीसंदर्भात सध्या टी.पी. विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरकर नागरिकांनी केवळ सुनावणीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कर आकारणी प्रक्रियेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेऊन आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेमार्फत निविदेच्या माध्यमातून अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पद्धत, मोजणीचे निकष, कर निर्धारणाची गणना तसेच नागरिकांवर आकारण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासण्याची गरज असल्याचे सोमचंद संदानशिव यांनी स्पष्ट केले आहे.
सुनावणी सुरू; मात्र नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार का?
सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये नागरिकांना नेमकी किती सवलत मिळणार, कर आकारणीत कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आणि पूर्वी आकारण्यात आलेल्या कराचे पुनर्मूल्यांकन होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ सुनावणी घेऊन विषय संपविण्याऐवजी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची निविदा, कार्यपद्धती, मोजणीचे निकष आणि कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे तपासण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
मूलभूत सुविधा अपुऱ्या, मग कराचा वाढता बोजा कशासाठी?
विशेषतः शहरातील विविध कॉलनी परिसरांमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे. एका बाजूला आवश्यक नागरी सुविधा अपुऱ्या असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा बोजा पडत असल्यास, या कर आकारणीचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते!’
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते,’ असा इशारा देत सोमचंद संदानशिव यांनी अमळनेरकरांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे. कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची तसेच संबंधित निविदेची सखोल चौकशी करण्यात यावी. आवश्यक असल्यास सदर कामाचा फेरविचार करून नगरपरिषदेच्या सक्षम कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करावी आणि त्यानंतर पारदर्शक, वस्तुनिष्ठ व नियमानुसार कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिक समिती स्थापन करून लोकशाही मार्गाने आंदोलनाची गरज
या प्रश्नावर नागरिकांची समिती स्थापन करून सर्व करदात्यांना विश्वासात घेत लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. बाह्य संस्थेला देण्यात आलेल्या कामाचा खर्च अखेरीस नागरिकांच्या पैशातूनच होणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत अमळनेरकरांनी जागरूक राहून प्रशासनाला प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा प्रश्न कोण्या एका व्यक्तीचा नसून शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वस्तुनिष्ठ माहिती जाणून घ्यावी आणि अन्यायकारक वाटणाऱ्या कर आकारणीविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवावा,” असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
अमळनेर तालुक्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात! बुद्धिबळापासून मैदानी स्पर्धांपर्यंत विविध क्रीडा प्रकारांचा थरार; तालुक्यातील शाळा-ज्युनिअर कॉलेजांनी ऑनलाइन नोंदणी करून संघ सज्ज ठेवण्याचे आवाहन
अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ च्या शालेय शासकीय अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना लवकरच सुरुवात होत आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या विविध स्पर्धांसाठी शाळा व ज्युनिअर कॉलेजांनी तयारी सुरू केली आहे.
अशी होणार तालुकास्तरीय स्पर्धा
१) बुद्धिबळ स्पर्धा :
दि. १७ सप्टेंबर — सर्व गट मुले
दि. १८ सप्टेंबर — सर्व गट मुली
स्थळ : नोबल पोतदार स्कुल
२) बॅडमिंटन स्पर्धा :
दि. १८ सप्टेंबर — सर्व गट मुले
दि. १९ सप्टेंबर — सर्व गट मुली
स्थळ : प्रताप कॉलेज हॉल
३) कुस्ती स्पर्धा :
दि. २१ सप्टेंबर — सर्व गट
स्थळ : तालुका क्रीडा संकुल
४) फुटबॉल स्पर्धा :
दि. २३ सप्टेंबर — सर्व गट मुले
दि. २४ सप्टेंबर — सर्व गट मुली
स्थळ : प्रताप कॉलेज
५) हॉलीबॉल स्पर्धा :
दि. २६ सप्टेंबर — मुले
दि. २७ सप्टेंबर — मुली
स्थळ : जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय
६) कॅरम स्पर्धा :
दि. ३ ऑक्टोबर — सर्व गट मुले
दि. ५ ऑक्टोबर — सर्व गट मुली
स्थळ : अँड ललिता पाटील इ. स्कूल
७) कबड्डी स्पर्धा :
दि. ७ ऑक्टोबर — सर्व गट मुले
दि. ८ ऑक्टोबर — सर्व गट मुली
स्थळ : सायर देवी स्कूल
८) खो-खो स्पर्धा :
दि. १० ऑक्टोबर — सर्व गट मुले
दि. १२ ऑक्टोबर — सर्व गट मुली
स्थळ : आ.मा.पाटील आश्रम शाळा रणाईचे
९) क्रिकेट स्पर्धा :
दि. १३ ऑक्टोबर — सर्व गट मुले
दि. १४ ऑक्टोबर — सर्व गट मुली
स्थळ : प्रताप कॉलेज
१०) मैदानी स्पर्धा :
दि. १६ ऑक्टोबर — सर्व गट मुले
दि. १७ ऑक्टोबर — सर्व गट मुली
स्थळ : तालुका क्रीडा संकुल
ऑनलाइन नोंदणी करून संघ सज्ज ठेवण्याचे आवाहन
अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा तसेच ज्युनिअर कॉलेजांनी संबंधित क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन फी भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून स्पर्धेचे प्रवेश काढावेत. तसेच संघ व खेळाडू स्पर्धेसाठी तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी श्री जगदिश चौधरी सर, श्री एस पी वाघ सर व श्री संजय पाटील सर यांनी कळविले आहे.
तालुक्यातील विविध शालेय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मैदानांवर विद्यार्थ्यांचा उत्साह, कौशल्य आणि क्रीडास्पर्धेची रंगत पाहायला मिळणार असून, आगामी दिवसांत अमळनेर तालुक्यात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
नंदगावात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांची भव्य रॅली, भजन-आरती, काव्यवाचनासह विविध धार्मिक उपक्रम; विद्यार्थ्यांना बिस्किट व फळांचे वाटप
नंदगाव, ता. अमळनेर | दि. १२ सप्टेंबर २०२६
नंदगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे शु. द्वितीया ता. १२/९/२०२६ रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता जी.प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करत रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी चक्रधर स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय करून टाकले. रॅलीनंतर शाळेच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर, सदभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन पाटील यांनी गंध, अक्षदा व पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व नतमस्तक होऊन स्वामींना अभिवादन केले.
यानंतर शाळेतील विद्यार्थिनी कृतिका राजेश पाटील, इयत्ता सहावी हिने भगवान चक्रधर स्वामींच्या कार्याविषयी थोडक्यात प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणातून तिने चक्रधर स्वामींच्या लीळेतील ‘मुक्या प्राण्यावर दया करावी’ हा प्रसंग स्पष्ट व समर्पक शब्दांत मांडत उपस्थितांची दाद मिळविली. तिच्या या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल गावातील सदभक्त श्रीमान मनोहर मोतीराम खैरनार यांनी तिला ५१ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.
यावेळी गावातील सदभक्त व कवी शिवाभाऊ एस. ठाकरे यांनी श्री स्वामींची आरती, भजन तसेच विविध कविता सादर करून कार्यक्रमात भक्तिमय रंग भरला. यामध्ये “छाती ठोकून सांगतो मी मानभाव आहे” ही कविता विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या काव्य सादरीकरणाला गावातील भजनी मंडळाचे सदस्य श्री खुशाल व्यंकट पाटील यांनी सुरेल स्वरसाथ दिली.
कार्यक्रमादरम्यान गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन खैरनार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. तसेच श्रीमान महेंद्र शिवाजी बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, नंदगाव-लाडगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ग्रामसेवक साहेबांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश बन्सीलाल ठाकरे व हंसराज मोतीराम खैरनार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मोबाईलद्वारे शूटिंग करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या गावातील तरुण सदभक्त चि. सचिन सुरेश पाटील यांचेही उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
एकूणच, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमलेले नंदगाव, विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त रॅली, भक्तिमय आरती-भजन, काव्यवाचन आणि सामाजिक उपक्रमांमुळे अवतार दिवसाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.

