समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 8 hours ago
लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चा 49 वा स्थापना दिवस उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात साजरा करीत संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 3 days ago
समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
अमळनेर | प्रतिनिधी
संस्कृत साहित्याची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख असून, महाकवी कालिदास यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेने या परंपरेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. ‘मेघदूत’ हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या उत्कट प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आणि निसर्गप्रेमाचा सर्वोच्च आविष्कार आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.
महाकवी कालिदास दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महाविद्यालय, अमळनेर येथे ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती, अमळनेर शाखेच्या वतीने करण्यात आले.
आपल्या व्याख्यानात दिनेश नाईक यांनी सांगितले की, महाकवी कालिदास यांनी कठोर साधना, अभ्यास आणि प्रतिभेच्या जोरावर संस्कृत साहित्यात अजरामर स्थान प्राप्त केले. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्गाचे रमणीय सौंदर्य, पर्वत, नद्या, ऋतू, प्रेम, शृंगार, मानवी भावना आणि तत्कालीन समाजजीवनाचे अत्यंत जिवंत व प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या साहित्याची सोप्या पण प्रभावी शब्दरचनेमुळे आणि विलक्षण कल्पनाशक्तीमुळे आजही जगभरातील वाचकांना भुरळ पडते.

ते पुढे म्हणाले की, महाकवी कालिदास यांनी दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके अशी सात अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. त्यापैकी ‘मेघदूत’ हे महाकाव्य त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या साहित्याचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून भारतीय साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध विषयांवरील दर्जेदार साहित्याचे नियमित वाचन करून आपले ज्ञान, विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य भारती अमळनेर शाखेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. वाचन, लेखन आणि प्रभावी संवाद कौशल्ये ही आधुनिक युगातील यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर सुनिल वाघ यांनी आभार मानले.
या प्रसंगी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Read More ‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
अमळनेर | प्रतिनिधी
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर आणि पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेले मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान हे समाजाला ‘नवदृष्टी’ देणारे अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.
रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर आणि ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण उपस्थित होते.
श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील अनेक गरजू नागरिकांना डोळ्यांच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित होणाऱ्या या मोफत शिबिरातून हजारो रुग्णांना नवजीवन आणि नवदृष्टी मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा प्रकाशाची अनुभूती देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ. अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड आणि नेत्रा गोडवे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. या शिबिरात एकूण १३७ नागरिकांनी सहभाग नोंदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ७२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदणी पूर्ण करण्यात आली.
यावेळी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. तसेच पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेनंतरचा उपचार, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले की, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.
संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेची श्रीकांत धिवरे यांनी केली पाहणी
शिबिरानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प, गोवरी निर्मिती विभाग, निसर्गसज्ज बैठक विभाग, गुलाब बाग, सेंद्रिय शेती, गोसेवा विभाग आदी उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी संस्थेच्या पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि अभिनव उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करत अशा कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे गौरवोद्गार काढले.



‘सुवर्णक्षणात’ जीवदानासाठी लायन्स क्लबचा पुढाकार; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर व फर्स्ट एड किट भेट ‘झिरो फॅटॅलिटी’ मोहिमेला बळ; अपघातग्रस्तांना तातडीची मदत, पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमळनेर | प्रतिनिधी
रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ (Golden Hour) तातडीची मदत मिळून मौल्यवान जीव वाचावेत, या सामाजिक उद्देशाने लायन्स क्लब, अमळनेर यांनी जळगाव जिल्हा पोलिसांच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला मोलाचे बळ दिले. क्लबच्या वतीने अमळनेर शहर पोलीस ठाण्यास दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात पोलीस ठाण्याच्या दोन्ही शासकीय वाहनांमध्ये स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य ठेवण्यात आले. त्यामुळे अपघातस्थळी जखमींना सुरक्षितपणे हलविणे आणि तातडीचे प्रथमोपचार देणे अधिक प्रभावी व जलद होणार आहे.
शहर व परिसरातील अपघातांमध्ये मदत करताना स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्याची कमतरता जाणवत असल्याची बाब पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत क्लबने या सूचनेची तात्काळ दखल घेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की, “अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे हेच सर्वात मोठे समाजकार्य आहे. लायन्स क्लबने दिलेल्या स्ट्रेचर व फर्स्ट एड किटमुळे ‘सुवर्णक्षणात’ जखमींना मदत करणे अधिक परिणामकारक ठरणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यास याचा निश्चितच हातभार लागेल.”
कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक उपक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, प्रोजेक्ट चेअरमन सुनील चौधरी, अभिषेक (राज) जैन, रजनीश वरलानी आणि प्रदीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ. मिलिंद नवसारीकर, महेंद्र पाटील, एस. डी. भरुचा, जितेंद्र जैन, प्रशांत सिंघवी, शेखर धनगर, डॉ. रवींद्र जैन, रवींद्र कॉलरा, प्रकाश शहा, कुमारपाल कोठारी, प्रकाश जैन, चंद्रकांत महाजन, दिनेश मणियार, दिलीप गांधी, विनोद अग्रवाल, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, शरद काकलीज, पोलीस हवालदार हितेश बेहरे, सिद्धार्थ शिसोदे, भटुसिंग तोमर, प्रमोद पाटील, योगेश बागुल यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लबच्या या सामाजिक योगदानाबद्दल पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त करत, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या अशा समन्वयातून अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळून ‘झिरो फॅटॅलिटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.



