लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 hours ago
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 hours ago
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
Top 10 News
‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणातून महापुरुषांना अभिवादन; सरस्वती शिशुवाटीकेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी उलगडला महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी वारसा
अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील सरस्वती शिशुवाटीका येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांमधून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी शाळेतील प्रियंका बनसोडे, राधिका मोरे, नीरज बाविस्कर, तन्मयी पाटील, हर्षाली संदानशिव आणि दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणातून महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी व बोधपर प्रसंग सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास सौ. किरण भदाणे, सौ. माहेश्वरी राजपूत, सौ. काजल राठोड आणि सौ. आम्रपाली संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.



अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य
अमळनेर :- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.
यासाठी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील व उपाध्यक्ष वरून पाटील यांनी पुढाकार घेतला.या मदतकार्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आणि मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर,जैन सोशल ग्रुप तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व संस्थांच्या स्वयंसेवकांनी दिवसभरात वितरण व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्न व पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन गरजूंना मदतीचा हात देत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. जयनिल फाऊंडेशनसह सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, संकटाच्या काळात अशा सामाजिक एकोप्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयनिल फाऊंडेशनच्या टीमने दिवसभर पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना धीर दिला.एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मदत कार्यासाठी जेसीबी सह इतर मशिनरी उपलब्ध करून दिली.



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
अमळनेर ( प्रतिनिधी ) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, त्यांनी कधीही समरस तेला महत्व दिले नसून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा वक्त्या सुनिता मोरे यांनी केले.
येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या वतीने आज शहरातील साने गुरुजी शाळेत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप्पासो. गुणवंतराव गुलाबराव पाटील होते.
आपल्या व्याख्यानात सुनीता मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय व स्वाभिमानाची प्रेरणा दिल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेची मूल्ये जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला संचालक ॲड. अशोक बाविस्कर, पत्रकार किरण पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, उप मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक प्रतिनिधी जगताप सर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




