ब्रेकिंग
द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव

 

केक कापून, फुगे आकाशात झेपावत आणि ‘वर्धापन दिन चिरायू होवो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेचा ८२ वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या आणि अभिनव पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थीनी, शिक्षक, माजी विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने शाळेच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद जगदीश अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रोहिणी सुनील देशपांडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. शुभांगी निलेश राजपूत उपस्थित होत्या.

यावेळी ताईसाहेब माधुरी पाटील, कमलजी कोचर, ताईसाहेब वसुंधरा लाडगे, सी.ए. नीरजजी अग्रवाल, भाऊसाहेब जितेंद्र जैन, श्री. हरी आण्णा वाणी, श्री. प्रदीप अग्रवाल, श्री. विवेक भांडारकर, प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, श्री. विनोद भांडारकर, प्रा. व्ही. बी. मांटे, श्री. निलेश भांडारकर, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, श्री. व्ही. एम. पाटील, श्रीमती एस. पी. बाविस्कर, श्री. दत्तात्रय पवार, श्री. एस. पी. वाघ, श्री. कैलास पाटील, श्री. आर. जे. पाटील, श्री. एस. एम. पवार तसेच सौ. पी. पी. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, श्रीमंत प्रताप शेठजी, परमपूज्य सानेगुरुजी आणि श्रीमती द्रौपदीबाई भांडारकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून झाली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.

यावेळी शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्यात आली. हा अनोखा क्षण पाहताच विद्यार्थीनींनी “वर्धापन दिन चिरायू होवो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. के. पी. सनेर आणि श्रीमती पी. डी. शेवाळे यांनी करून दिला.

प्रमुख अतिथींनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना शिक्षण, संस्कार, कर्तृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. याच प्रसंगी शाळेच्या “फुलवात” या स्वलिखित वार्षिक अंकाच्या ८१ व्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

समारंभात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींसह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या क्रीडापटू विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना चिवडा व पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले, तर श्री. एस. पी. वाघ यांनी आभार मानले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, बक्षीस समिती प्रमुख श्रीमती पी. व्ही. साबे, सौ. व्ही. जे. पाटील, श्री. किरण पाठक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शाळेच्या ८२ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा हा वर्धापन दिन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *