बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 hours ago
अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 hours ago
महिला विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन’; इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनजागृती उपक्रम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ताततीने दुष्काळी सवलती व मदत देण्याबाबत निवेदन सादर…
बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन
अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य
NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ताततीने दुष्काळी सवलती व मदत देण्याबाबत निवेदन सादर…
जळगांव : जळगांव जिल्ह्यातील यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पावसातील खंड, पावसाचे अनियमित स्वरूप व सततची उष्णता यामुळे जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भांगामध्ये पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून खरीप पिकांची वाढ खुंटलेली आहे. शेतक-यांनी बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी मोठा खर्च केलेला असताना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जनावरांच्या चा-याबरोवर पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.
जळगांव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करता प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी व पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतक-यांसाठी तातडीने मदत व सवलती देण्यात याव्यात ही नम्र विनंती.
प्रमुख मागण्या
१) जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा.
२ ) जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना हेक्टरी ५००००/- रूपये नुकसान भरपाई मिळावी.
३) पात्र शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबधीत विमा कंपनीने तातडीने कार्यवाही करावी.
४) पावसाअभावी निर्माण होणारी जनावरांच्या चा-याची समस्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध करून देण्यात यावा.
५) शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या सर्व सवलती व योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा.
६) शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ उर्वरीत यादी जाहीर करून शेतक-यांचा खात्यावर पैसे जमा करावे.
७) मागील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेला नुकसानाचे पैसे तात्काळ शेतक-यांना दयावे.
८ ) शेतक-यांचा मुलांना फी माफी व एस. टी. पास सवलत देण्यात यावी.
९) नियमित कर्मफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे.
जळगांव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शासनाकडे योग्य तो प्रस्ताव पाठवावा ही नम्र विनंती.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप खोडपे सर, विकास पवार, वाय एस महाजन सर, ईजाज मलिक, कल्पिताताई पाटील, सुनिल भैय्या माळी, विलास पाटील, डॉ सुभाष देशमुख, किरणभाऊ राजपूत, अन्वर खाटीक, राजु मोरे, गणेश पाटील, भगवान सोनवणे, मजहरभाई पठाण, रईस खाटीक, प्रा एन डी पाटील, विनायक पाटील, प्रतिभाताई शिरसाट, सुमनताई बनसोडे, माधुरीताई पाटील, कलाताई शिरसाट, नारायण चौधरी, प्रा गोपाल पाचवणे, नईम खाटीक, संजय जाधव, दिलीप ताकवाले, वाल्मिक आमले, अकबर खान अजमिरी खान, लक्ष्मणराव पाटील, रियाज देशमुख, मोहित पवार, राजेंद्र चौधरी, फहरान खान इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन
अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून दोन-तीन ठिकाणी बिबट्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः नंदगाव शिवारात एकावर हल्ला आणि परिसरातील शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आणि अंतुर्ली परिसरात डोळे चमकणारा प्राणी दिसल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय ढेकू रस्ता येथेही बकऱ्या चारणाऱ्याला दिसल्याची वार्ता पसरली.तसेच कालही पिळोदा ,धुपी ,देवळी शिवारात बिबट्याचा वावर आढळून पपईच्या शेतात तो लपला व त्यांनतर पळाला नंतर मक्याच्या शेतात दिसला,अशी वार्ता पसरल्याने शेतकरी भयभीत होऊन मजूरही घाबरलेले होते,.याठिकाणी देखील वन अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल होऊन सर्वत्र पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांचेशी संपर्क साधून संपुर्ण माहिती जाणून घेत त्यांना अधिक दक्ष होण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच जनतेला महत्त्वाचे आवाहनही केले आहे.
काय म्हणाले आमदार अनिल पाटील ?
“अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी ही बाब केवळ अफवा समजून बेसावध राहू नये, तसेच विनाकारण पॅनिक होऊन घाबरूनही जाऊ नये.सर्व नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना सोबत २-३ जणांनी जावे, हातात बॅटरी, काठी ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये. आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.”
वन विभाग सतर्क, दोन पिंजरे लावले
आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाला सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून पिंजऱ्यात सावज म्हणून बकरी कोंडण्यात आली आहे.मात्र रात्री-अपरात्री शेतरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे आणि वर्दळीमुळे तो हिंस्त्र प्राणी पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. लवकरात लवकर बिबट्याचा वावर असेलच तर त्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा दिला जाईल. नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
डिजिटल सुरक्षेसाठी NCC कॅडेट्सचा पुढाकार सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती; NCC कॅडेट्सचे ॲपद्वारे डिजिटल सुरक्षेकडे पाऊल
जळगाव : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर N.M. College, जळगाव येथे NCC कॅडेट्समध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात Cyber Warriors विद्या सोनवणे, साक्षी तानाजी पाटील, राहुल चोपडे आणि जय ठाकूर यांनी उपस्थित NCC कॅडेट्सना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींची सविस्तर माहिती देत, अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले.
सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या फेक कॉल, बनावट मेसेज, OTP फ्रॉड, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक, बनावट वेबसाइट, फेक ॲप तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक याबाबत कॅडेट्सना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती आणि त्यापासून सावध राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देण्यात आली.
डिजिटल व्यवहार करताना केवळ अधिकृत ॲप आणि वेबसाइटचा वापर करणे, आपले पासवर्ड सुरक्षित ठेवणे, OTP किंवा गोपनीय माहिती कोणालाही न देणे तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, यावर विशेष भर देण्यात आला. सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहार करताना सजगता व जबाबदारीने वागणे हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान Quick Heal Foundation Anti Fraud App ची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून अधिक प्रभावीपणे सावध राहण्यासाठी या ॲपचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी उपस्थित NCC कॅडेट्सकडून ॲपचे activation करण्यात आले.
या उपक्रमासाठी Field Work Volunteer भारती पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाला डॉ. आर. बी. आमले यांचे मार्गदर्शन लाभले.
डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम NCC कॅडेट्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरला. ‘सावधानता हीच सायबर सुरक्षेची गुरुकिल्ली’ या भावनेतून कॅडेट्सनी डिजिटल सुरक्षेचा संदेश आत्मसात करीत समाजातही सायबर जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प केला.

