सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
मंगळग्रह मंदिरात ‘गो-सन्मान अभियान’चे उत्साहात उद्घाटन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा
मंगळग्रह मंदिरात ‘गो-सन्मान अभियान’चे उत्साहात उद्घाटन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दोधवद हद्दीतील गावठाण परिसरालगतच्या पडीत जंगलामध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. कोरडे गवत, पडीत जंगल आणि वेगवान वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत मोठ्या क्षेत्राला आपल्या विळख्यात घेतले. या दुर्घटनेत अनेक शेतकऱ्यांचे शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता आणि वाऱ्याचा वाढता वेग यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच समर्थ किचन ट्रॉलीचे संचालक जितेंद्र पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी (सीओ) यांच्याशी थेट संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. त्यांच्या विनंतीची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या.
घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलातील फायरमन दिनेश बिराडे, फारुक शेख, वाहन चालक सत्यम भाऊ, रफिक खान आणि आकाश संतांशू यांनी अत्यंत धाडसाने आणि जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. धूर, प्रचंड उष्णता आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आग रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या भीषण आगीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील **शेतीपंपांच्या वायरी, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन साहित्य, कुंपण तसेच इतर शेती उपयोगी साहित्य** जळून खाक झाले. वर्षानुवर्षे कष्ट करून उभे केलेले साहित्य काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी आपल्या डोळ्यांसमोर मेहनतीची कमाई राख होताना पाहून हळहळ व्यक्त करत होते.
या आगीने केवळ पडीत जंगल जाळले नाही, तर अनेक शेतकरी कुटुंबांच्या आशा, मेहनत आणि उद्याच्या स्वप्नांनाही मोठा फटका दिला आहे. सुदैवाने ग्रामस्थांची एकजूट, अग्निशमन दलाचे धाडस आणि प्रशासनाची तत्परता यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेच्या जखमा दोधवद परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मनावर दीर्घकाळ कायम राहणार आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.


सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – राकेश जगताप युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
अमळनेर : समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे व कट्टर पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँक, अमळनेरचे व्यवस्थापक राकेश जगताप यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. राहुल निकम आणि प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना “निबंध कसा लिहावा?” याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अर्बन बँकेचे संचालक तथा माजी व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य जाहीर केले. अशोक बिऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिशा संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील आणि डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या मोठ्या गटात पुणे, मुंबई, अमरावती, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर निबंध प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर लहान गटात अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मोठ्या गटातील विजेते
प्रथम क्रमांकाचे १,००० रुपयांचे बक्षीस (आबासाहेब व.ता. पाटील यांच्या स्मरणार्थ, प्रायोजक – नगरसेविका प्रा. योगिताताई कापडणेकर) शुद्धोधन मिलिंद बागुल (धुळे)यांना प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे ७५० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – योगराज (बाळासाहेब) संदानशिव) रुद्राणी विनोद राव राऊत (अमरावती) यांना मिळाले.
तृतीय क्रमांकाचे ५०० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – चिंधु वानखेडे) पल्लवी जगतराव शिंदे (हातेड) यांना प्रदान करण्यात आले.
उत्तेजनार्थ पुरस्कार संगीता विलास बाविस्कर (शिक्षिका, एन. टी. मुंदडा हायस्कूल, अमळनेर) व तरन्नुम मन्सूर शेख (शिक्षिका, जी. एस. हायस्कूल, अमळनेर) यांना देण्यात आले.
लहान गटातील विजेते
प्रथम क्रमांक – रोहिणी समाधान भोई (इयत्ता ११ वी विज्ञान, आश्रम शाळा, गडखांब)
द्वितीय क्रमांक – डिंपल कपिल पाटील (गडखांब)
तृतीय क्रमांक – आरोही राकेश गोसावी (इयत्ता ६ वी, भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा, अमळनेर)
उत्तेजनार्थ पुरस्कार – पियुष राजेंद्र मोरे (गडखांब) व मिताली विवेक गोसावी (स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर)
सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तके व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ही सर्व बक्षिसे युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात आली.
या समारंभाला चेतन जाधव, बापूराव ठाकरे, अजय भामरे, प्रा. उषा देवरे, हृदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, हरिश्चंद्र कढरे, राकेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश तसेच शाखा उद्घाटन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.
कार्यक्रमास आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे, तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले.
यावेळी चंद्रकांत मोरे, प्रा. शामकुमार जाधव (तालुका कार्याध्यक्ष), विशाल ब्रह्मे, महेश ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, लखन महाले, अमृत मेराळे, युवा अध्यक्ष विनोद बिऱ्हाडे, दिव्यांग आघाडी प्रमुख भट्टू बिऱ्हाडे, एकलव्य सेनेचे दयाराम ठाकरे, सरपंच भरवस, राहुल महाले, रमा आबा केदार, दीपक बिऱ्हाडे (ग्राम सदस्य, गडखांब), गौतम शिरसाठ, किरण बच्छाव, अंकुश बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी जुबेरभाई खान मेहमूद खान मेवाती, शाखाध्यक्षपदी मुबश्शीर खान गुलाम रसूल खान मेवाती, उपाध्यक्षपदी अफरोज खान जमील खान मेवाती, कार्याध्यक्षपदी शाबिर खान इस्माईल खान मेवाती, सचिवपदी जुबेर खान उमर खान मेवाती, सरचिटणीसपदी मुस्तकीम शाह, चिटणीसपदी गुलाम रसूल हशीर खान मेवाती, खजिनदारपदी वकील खान रौफ खान मेवाती, सहसचिवपदी फारुख खान नशीब खान मेवाती यांची निवड करण्यात आली. तसेच जुनेद खान याकूब खान मेवाती व फारुख खान गनी खान मेवाती यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, “जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. पक्ष मजबूत करताना गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने करावे.” त्यांनी युवकांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या मनोगतात युवकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. संघटनात्मक बळ वाढवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपण सर्व एक आहोत. समाजातील कोणतीही समस्या ही सर्वांची समस्या आहे. एकजुटीच्या बळावर आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी सर्वांनी संघटित राहून कार्य करणे काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



