आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
मंगळग्रह मंदिरात ‘गो-सन्मान अभियान’चे उत्साहात उद्घाटन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेर शेतकी संघावर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय आमदार अनिल पाटलांचे वर्चस्व कायम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा
नाशिक:- अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात महाराष्ट्रातील विविध सामाजिक, राजकीय आणि संविधान वादी संघटनांनी एकत्र राज्यव्यापी जन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दिनांक 5 जून रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आरक्षण उप वर्गीकरण हा सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या मूलभूत तत्वांना हरताळ फासणारा निर्णय असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या बैठकीत राज्यभर जनसंवाद, बैठका, निवेदन, अभ्यास वर्ग, संविधान जनजागृती कार्यक्रम आणि समाज संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. अनुसूचित जाती समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती समाज किंवा संघटने विरोधात नसून शासनाच्या धोरणात विरोधात लोकशाही आणि संविधानिक लढा असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सामाजिक सलोखा, बंधुता आणि एकात्मता अबाधित राखण्याचे आवाहनही उपस्थित त्यांनी केले. सोशल मीडियावर समाजात फूट पाडणारी, वैमानस्य निर्माण करणारी अथवा समाजाची एकजूट कमकुवत करणारी कोणतीही पोस्ट, भाष्य किंवा विधान करू नये असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

या बैठकीस विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व विद्यार्थी यांसह एड. सुरेश माने, कृष्णा शिंदे, कॅप्टन कुणाल गायकवाड, प्रबुद्ध साठे, माजी आमदार बाबुराव माने, मौलाना सलीम खान, एड. प्रवीण साळवे, डी. टी. गोतीस, काळुराम चौधरी, डॉ. प्रमिला पवार, एड. चंद्रकांत निकम, प्रा. गंगाधर अहिरे, अरुण भालेराव, डॉ. विशाल जाधव, एड. कृष्णा शिलावत, शरद गोरे, निलेश गांगुर्डे, लालचंद शिरसाट, विजय बागुल यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सर्वत्र जोरदार स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या स्वच्छता उपक्रमाद्वारे शहरातील धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता केली आहे. दररोज पहाटे उठून ‘ आप ‘ चे कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील एका ठिकाणी जाऊन तेथील परिसर स्वच्छ करत आहेत.
दरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या नसल्याने नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे. घंटा गाड्या केवळ नावाला असून काही भागात घंटागाळा येत नसल्याची आणि आल्या तरी थांबत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटा गाड्या नियमित आणि वेळेवर द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याचेही नियोजन करावे.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत हे यावेळी व्यक्त करण्यात आले. निवेदनावर आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, उपाध्यक्ष रामकृष्ण देवरे, राजेंद्र जाधव, मुकेश राजपूत, मोहन मनोरे, सुधाकर गजरे, प्रतिभा गजरे, लियाकत अली, शेजात खाटीक, प्रवीण सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अमळनेरच्या राजेंद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र पाटील यांना “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षणासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली’ आणि ‘प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अल्पबचत भवनात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तसेच पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अध्यापनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सहकार, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या याच बहुआयामी कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यास शिक्षक आमदार सत्यजित तांबे, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र सल्लागार प्रदीप सोनवणे, विराज कावडीया, रणजित सोनवणे, एच. जी. इंगळे, गोविंद पाटील आणि जितेंद्र बोरसे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांना मिळालेल्या या सन्मानामुळे अमळनेर तालुका, शिक्षक वर्ग, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रपरिवार, हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार अमळनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद असून शिक्षण क्षेत्रातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


