ब्रेकिंग
सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

 

अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश तसेच शाखा उद्घाटन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.

कार्यक्रमास आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे, तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले.

यावेळी चंद्रकांत मोरे, प्रा. शामकुमार जाधव (तालुका कार्याध्यक्ष), विशाल ब्रह्मे, महेश ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, लखन महाले, अमृत मेराळे, युवा अध्यक्ष विनोद बिऱ्हाडे, दिव्यांग आघाडी प्रमुख भट्टू बिऱ्हाडे, एकलव्य सेनेचे दयाराम ठाकरे, सरपंच भरवस, राहुल महाले, रमा आबा केदार, दीपक बिऱ्हाडे (ग्राम सदस्य, गडखांब), गौतम शिरसाठ, किरण बच्छाव, अंकुश बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी जुबेरभाई खान मेहमूद खान मेवाती, शाखाध्यक्षपदी मुबश्शीर खान गुलाम रसूल खान मेवाती, उपाध्यक्षपदी अफरोज खान जमील खान मेवाती, कार्याध्यक्षपदी शाबिर खान इस्माईल खान मेवाती, सचिवपदी जुबेर खान उमर खान मेवाती, सरचिटणीसपदी मुस्तकीम शाह, चिटणीसपदी गुलाम रसूल हशीर खान मेवाती, खजिनदारपदी वकील खान रौफ खान मेवाती, सहसचिवपदी फारुख खान नशीब खान मेवाती यांची निवड करण्यात आली. तसेच जुनेद खान याकूब खान मेवाती व फारुख खान गनी खान मेवाती यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, “जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. पक्ष मजबूत करताना गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने करावे.” त्यांनी युवकांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या मनोगतात युवकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. संघटनात्मक बळ वाढवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपण सर्व एक आहोत. समाजातील कोणतीही समस्या ही सर्वांची समस्या आहे. एकजुटीच्या बळावर आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी सर्वांनी संघटित राहून कार्य करणे काळाची गरज आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *