ब्रेकिंग
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील

 

 अमळनेर : मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते होते” असे प्रतिपादन डॉ लीलाधर पाटील यांनी केले महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संविधान जागर अभियान व मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित संयुक्त कार्यशाळेत ते बोलत होते प्रताप महाविद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

महात्मा जोतीराव फुले यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या जात वर्ग व लिंगभावावर आधारित शोषणाचे मूळ शोधून शोषणतंत्र आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून उलगडून दाखवले. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानव मुक्तीचे व शोषण विध्वंसनाचे तत्त्वज्ञान मांडले. यावर उपाय म्हणून एका सुसंवादी, चिकित्सक व विवेकावर आधारित शिक्षण शिक्षण पद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला व अमलात देखील आणला. या देशातील शेतकऱ्यांच्या दुःखाला व शोषणाला वाचा फोडण्याचे काम तसेच पुरुषप्रधान जातीव्यवस्थेत शोषित असलेल्या महिलांना आवाज देणे हे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी या या तत्त्वांवर जगून प्रत्यक्ष कृतीतून संपूर्ण शोषणमुक्तीचा कृती कार्यक्रम दिल. आपल्या डोक्यात तर्क विवेक आणि चिकित्सा आणि हृदयात करुणा दया आणि मानवता यासारख्या तत्त्वांना घेऊन आदर्शवत जीवन जगणारे फुले या नवीन पिढीला समजावून सांगितल्यास एका सुदृढ व विवेकाधीष्टीत समाजाची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. महात्मा फुले यांच्या जीवनातील घटनांना जरी विशिष्ट स्थळ आणि वेळेची चौकट असली तरी त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानाला ही चौकट नाही आणि म्हणून त्यांच्या या द्विशताब्दी वर्षात या तत्त्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आव्हानही डॉ. पाटील यांनी केले.

युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले की, ” महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्षात २०o व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन, पथनाट्य, परीक्षा, गीते इत्यादी कार्यक्रम जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात राबवून सुमारे 2 लाख नागरिक, विद्यार्थी,महिला, शेतकरी, कष्टकरी यांचे पर्यंत पोहोचण्याचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले तर दिशा संदा न शिव, भारती कोळी, श्रद्धा रे रा, निवेदिता कापडणेकर, उषा देवरे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील,अशोक बिऱ्हाडे, प्रा अशोक पवार यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ हर्षवर्धन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि आपण वर्षभर महात्मा फुले विषयी जे कार्यक्रम आयोजित कराल त्यात प्रताप कॉलेजचा सहभाग असेल, मदत व सहकार्य असेल, असे सांगून कार्यशाळेच्या आयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यशाळेला पाचोरा कॉलेजचे माजी प्राचार्य बी एन पाटील, प्रा सुभाष पाटील, संदीप घोरपडे,सोमचंद सदा नशिव,डॉ भारती पाटील खलील देशमुख,वसुंधरा लांडगे, रामेश्वर भदाणे, योगेश पाटील, नगरसेविका योगिता पाटील, आरती पाटील,रियाज मौलाना, भीमराव महाजन,, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ सरवदे,वाल्मीक मराठे, डी एम पाटील, ईश्वर महाजन, पुरुषोत्तम माळी, रामकृष्ण महाजन,प्रकाश महाजन,आशा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम बाबुराव ठाकरे,श्रद्धा रे रा,दिशा संदानशिव,निखिल रांजणकर, अशोक बिऱ्हाडे,,सोपान भवरे गोकुळ पाटील,,गुणवंत पवार आदींनी परिश्रम घेतले प्रा डॉ राहुल निकम यांनी आभार प्रदर्शन केले प्रताप महाविद्यालयाचे साने गुरुजी सभागृह खचून भरले होते खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens