१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 5 hours ago
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 5 hours ago
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा
Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 3 days ago
अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured Latest Popular- Est 0 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा
अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव
भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
शाळेची विद्यार्थिनी अक्षरा भामरे ९८.२०% मिळवत अमळनेर- पारोळा विभागात प्रथम तर जिल्ह्यात पाचवी
प्रतिनिधी | अमळनेर
येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा २०२५-२६ निकाल शंभर टक्के (१००% ) लागला.माध्यमिक विभागातून अक्षरा भामरे हिने ९८.२०% मिळवत सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत अमळनेर-पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासह इयत्ता दहावीच्या निकालात पुढील ५ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. पलक पाटील ९६.४०% मोहित पवार ९५.२०% नैतिक सेनानी ९५.२०% व वैष्णवी माळी ९४.४०% मिळवत प्रथम पाच मध्ये येण्याचा मान पटकावला आहे.
अक्षरा हिने इंग्लिश आणि माहिती तंत्रज्ञानात १०० पैकी १०० तर पलक पाटील हिने मराठीत १०० पैकी १०० गुण मिळवले. यावर्षी देखील सीबीएसई माध्यमिक विभागात शाळेने पंचक्रोशीत १००% निकालाची परंपरा कायम राखली असून इयत्ता दहावीच्या निकालात नेत्रदीपक गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले. परीक्षेत एकूण १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांच्या यशात सर्व विषय शिक्षकांसह इतर सर्व शिक्षकांनी देखील मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री आणि प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण यांनी कौतुक व अभिनंदन केले.
१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.
– शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत गुणवत्तेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण मिळवत मिळवले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसहित उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.
या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक श्री बजरंग जी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सौ सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील सर, मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या घवघवीत निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर मध्ये पुन्हा एकदा धुरंदर ठरले आहे.
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर ने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेचे विषय होते (एक) महात्मा ज्योतिराव फुले जीवन व कार्य (दोन) डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1000 रुपयांचे तर द्वितीय 750 व तृतीय 500 शिवाय प्रमाणपत्र. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ राहुल निकम, अशोक बिऱ्हाडे यांनी काम पाहिले. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी युवा वक्ते तयार व्हावेत म्हणून सदर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक अखिलेश मनोज पाटील,द्वितीय क्रमांक सायली योगराज पाटील तर तृतीय क्रमांक पल्लवी रामकृष्ण पाटील यांनी पटकावला.स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व अनुक्रमे शाम जयंतराव पाटील, वंदना ठेंग व चिंधु वानखेडे यांनी स्वीकारले होते. विजेत्या स्पर्धकांना गोकुळ पाटील( माजी केंद्रप्रमुख) हरिश्चंद्र कढरे, प्रा अशोक पवार,दयाराम पाटील,बापूराव ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम, संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासकेत सपन्न झाला

