१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.
– शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत गुणवत्तेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण मिळवत मिळवले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसहित उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.
या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक श्री बजरंग जी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सौ सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील सर, मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या घवघवीत निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर मध्ये पुन्हा एकदा धुरंदर ठरले आहे.
