ब्रेकिंग
युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर

 

महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर ने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेचे विषय होते (एक) महात्मा ज्योतिराव फुले जीवन व कार्य (दोन) डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1000 रुपयांचे तर द्वितीय 750 व तृतीय 500 शिवाय प्रमाणपत्र. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ राहुल निकम, अशोक बिऱ्हाडे यांनी काम पाहिले. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी युवा वक्ते तयार व्हावेत म्हणून सदर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक अखिलेश मनोज पाटील,द्वितीय क्रमांक सायली योगराज पाटील तर तृतीय क्रमांक पल्लवी रामकृष्ण पाटील यांनी पटकावला.स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व अनुक्रमे शाम जयंतराव पाटील, वंदना ठेंग व चिंधु वानखेडे यांनी स्वीकारले होते. विजेत्या स्पर्धकांना गोकुळ पाटील( माजी केंद्रप्रमुख) हरिश्चंद्र कढरे, प्रा अशोक पवार,दयाराम पाटील,बापूराव ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम, संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासकेत सपन्न झाला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test