बीड : वृक्ष लागवडीचा 70 वर्षांचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपला देश, आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला असं वक्तव्य अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं. निसर्गाच्या बाबतीतील कायदे हे रिवाईज व्हायला पाहिजेत आणि सरकारने सुद्धा गंभीरतेने घेतल पाहिजे. झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे कायदे असले पाहिजेत. शासकीय कर्मचारी असो वा सामान्य नागरिक वृक्षतोडी संदर्भात कठोर कायदे करा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.