नवी मुंबई पोलिसांनी दूरसंचार विभागाच्या माहिती वरून आंतर राष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून अनेक जण भाड्याच्या जागेत कॉल सेंटर चालू करून परदेशातून येणाऱ्या अनेक जणांच्या कॉलला आपल्या बसवलेल्या सॉफ्टवेअर मधून स्थलांतरित करून भारतीय दूरसंचार कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान केले असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 8 लाखांचा मुद्देमाल, मोबाईल आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. यात भारतीय दूरसंचार विभागाची महत्वाची भूमिका राहिली असून नवी मुंबई पोलीस सायबर सेल आणि गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. अशा घटनांमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका पोहचू शकतो, त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईत आणखी प्रगती करणे महत्वाचे आहे.