ब्रेकिंग
अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व अग्निशमन दिन उत्साहात साजरा!

अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक नाविद शेख, मोहन सातपुते, गुलाब पाटील, भरतसिंग परदेशी, योगराज सदाशिव, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सोमचंद संदनशिव, सुधीर चौधरी, अनिल बेंडवाल, राहुल कंजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

​महामानवाला अभिवादन आणि जवानांचा सन्मान

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यात आले.

​१४ एप्रिल हा दिवस देशभर ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त अमळनेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शौर्याचा, तत्परतेचा आणि निःस्वार्थ सेवाभावाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले की,

​”अग्निशमन दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. कोणतीही आपत्ती असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे जवान जनसेवेसाठी धावून जातात. त्यांच्या या अजोड कार्याचा समाजाने नेहमीच सन्मान राखला पाहिजे.”

​अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजप्रबोधन आणि कर्तव्यभावनेचा एक नवा आदर्श घालून दिला.

समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा

‘चवदार तळे’ नाटिकेतून सामाजिक न्यायाचा संदेश; विविध उपक्रमांनी जयंतीला मिळाला वैचारिक आयाम

अमळनेर, दि. १४ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेरात आयोजित कार्यक्रम केवळ औपचारिक अभिवादनापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर केला.

सकाळी आठ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारी ठरली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण, संघटन आणि संघर्ष” हा बाबासाहेबांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवत कर्तव्यांचीही जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते युवा कल्याण प्रतिष्ठान आणि संविधान जागर अभियान यांच्या वतीने सादर करण्यात आलेली ‘चवदार तळे’ ही नाटिका. या नाटिकेतून ऐतिहासिक संघर्षाचे प्रभावी चित्रण करत सामाजिक समतेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.

याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने आयोजित निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे युवकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.

महिलांची लक्षणीय उपस्थिती, युवकांचा उत्साह आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग यामुळे हा सोहळा सर्वसमावेशक ठरला. कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची केवळ आठवण न ठेवता त्यांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

एकूणच, अमळनेरातील हा जयंती सोहळा सामाजिक बांधिलकी, वैचारिक जागर आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा ठरला.

अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव

 महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा; शहरासह परिसरातून उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग घेत सामाजिक ऐक्य आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI काकडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदनशिव, सिद्धार्थ शिसोदे तसेच पत्रकार किरण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत युवक, युवती आणि विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पुरुष गटात नाशिकच्या तेसज सपकाळे यांनी उत्कृष्ट धाव करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगावचे खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप उमटवली. विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५००० आणि ३००० रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महिला गटातही स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. उन्नती पाटील यांनी प्रथम, आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्यासह अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप सदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी सहकार्य केले.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता नगराळे, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदींची उपस्थिती लक्षणीय होती.

ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणारे प्रभावी व्यासपीठ ठरली.

भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 भगवान महावीर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा सहभाग

अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेंटर, युवती सभा आणि आई जिजाऊ अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान परीक्षा उत्साहात संपन्न झाली. भगवान महावीर, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.

सकाळी १० ते ११:३० या वेळेत पार पडलेल्या या परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ज्ञानस्पर्धेला रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, रेक्टर डॉ. अमित पाटील, डॉ. माधव भुसनर, प्रा. भानुदास गुलाले व डॉ. आर. सी. सरवदे यांच्या हस्ते पूजन पार पडले.

यावेळी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या कार्यालयातही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेमक्या वेळेत सामान्य ज्ञान परीक्षेला सुरुवात झाली. कार्यक्रमास सीसीएम प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. धनंजय चौधरी, प्रा. सुनिल पाटील, प्रा. पंकज तायडे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रवी बाळसकर, डॉ. अनिल झळके, डॉ. रामदास सुरळकर, प्रा. दिपक कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बालाजी कांबळे, दिलीप शिरसाट, पराग पाटील, प्रा. हिमांशू गोसावी, विशाल अहिरे, डॉ. राखी घरटे, प्रा. इशिता घोष आणि तुषार संजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी रुपये १०००, द्वितीयसाठी ७०० आणि तृतीयसाठी ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सीसीएमसी विभागात होणार असून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शुभारंभ! जनतेचा आवाज आता आणखी बुलंद!

“आवाज जनतेचा, जागर सत्याचा” — लोकजागर न्यूजसोबत नव्या पर्वाची सुरुवात!

प्रिय वाचकहो, सस्नेह नमस्कार

गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. 2001 साली पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथे पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर अमळनेर येथे विविध दैनिकांमध्ये काम केले तसेच दोन वर्षे स्वतःचे साप्ताहिक यशस्वीपणे चालविले.

काही वैयक्तिक कारणांमुळे पत्रकारितेतून थोडा काळ विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा नव्या उर्जेने, नव्या जोमाने लेखणी हातात घेत आहे.

“लोकजागर न्यूज” या वेब पोर्टलच्या माध्यमातून मी पुन्हा आपल्यासमोर येत आहे.
जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सत्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून (14 एप्रिल 2026)
“लोकजागर न्यूज” या ऑनलाईन वेब पोर्टलचा शुभारंभ करत आहोत.

काही वर्षांच्या खंडानंतरही, तीच जिद्द, तोच उत्साह आणि काहीतरी वेगळं करण्याची तीच धडपड!
सामाजिक बांधिलकी जपत, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता आम्ही सातत्याने करत राहू.

“लोकजागर” च्या माध्यमातून तुमचा आवाज देशभर पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.

धन्यवाद!
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत…

हृदयनाथ मोरे
मुख्य संपादक
लोकजागर न्यूज

test
casino utan svensk licens